शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

राज्यात 'जुमला'विरोधी कायदा करा : विधान परिषदेत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 23:23 IST

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय बाबींवर बोलण्याची चढाओढ दिसून आली. या चर्चेदरम्यान विविध सदस्यांनी आपली मते मांडली. राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी तर राज्यात ‘जुमला’विरोधी कायदाच करण्याची मागणी केली.

ठळक मुद्देराज्यपालांच्या अभिभाषणावर राजकीय टोमणे-चिमटे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विधान परिषदेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकीय बाबींवर बोलण्याची चढाओढ दिसून आली. या चर्चेदरम्यान विविध सदस्यांनी आपली मते मांडली. राष्ट्रवादीचे किरण पावसकर यांनी तर राज्यात ‘जुमला’विरोधी कायदाच करण्याची मागणी केली. निवडणुकांत मतदानापूर्वी नेते मतदारांना आमिषे दाखवितात व त्यानंतर हात वर करतात. अशाप्रकारे खोटी आश्वासने देऊन निवडून येणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांचा रोख हा केंद्र सरकारकडे होता.या चर्चेला उत्तर देत असताना सभागृह नेते सुभाष देसाई यांनीदेखील विरोधकांना राजकीय चिमटेदेखील काढले. तीन पक्षांच्या सरकारवर टीका करणारे नेते केंद्रातील २१ पक्षांचा समावेश असलेल्या रालोआ व पर्यायाने पंतप्रधान मोदींच्या धोरणांना हरकत घेत आहेत का, असा प्रश्न त्यांनी केला.विरोधक नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत सवाल करीत आहेत. परंतु मागील पाच वर्षांतच येथील स्थिती बिघडली आहे. यात संपूर्ण दोष सेनेवर टाकण्यापेक्षा अर्धी जबाबदारी घ्या, असे देसाई म्हणाले. मित्रांशी कसे वागायचे, याची त्यांना शिस्त नाही. मागील पाच वर्षांत प्रसिद्धी कशी मिळवायची, हे आम्ही शिकलो नाही. माजी मुख्यमंत्री ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणाले. त्यांनी ‘आम्ही पुन्हा येऊ’ असे म्हटले असते तर चित्र वेगळे असते, असे म्हणत मागील पाच वर्षांत भाजपने शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचादेखील त्यांनी आरोप केला.भाजपचे गिरीश व्यास यांनी तीन पक्षांचे हे सरकार ‘तीन तिगाडा, काम बिगाडा’ असल्याचे म्हणत शासन किती ‘रिमोट’ने चालत आहे, असा प्रश्न केला. तर सरकारचे एक रिमोट ‘सिल्व्हर ओक’ व दुसरे रिमोट दिल्लीतील ‘१० जनपथ’ येथे असल्याचा टोला सुजितसिंह ठाकूर यांनी लगावला. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर सरकारच्या तीनचाकी गाडीची चाके वेगळी होणार, असे प्रसाद लाड म्हणाले. राज्यात पाली विद्यापीठाची निर्मिती व्हावी व नागपुरातील श्याम हॉटेल येथे धम्मक्रांतीचे स्मारक व्हावे, अशी मागणी जोगेंद्र कवाडे यांनी केली. या प्रस्तावावर हेमंत टकले, रवींद्र फाटक, रामहरी रुपनवर, सदाभाऊ खोत, कपिल पाटील, अंबादास दानवे, दत्तात्रय सावंत, अनिल सोले, सुधीर तांबे, रमेश पाटील, अनिकेत तटकरे, निरंजन डावखरे, जगन्नाथ शिंदे यांनीदेखील आपली मते मांडली.‘राईट टू रिप्लाय’वरून विरोधक आक्रमकसभागृह नेते उत्तर देत असताना विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी १० मिनिटे बोलण्याची विनंती केली. परंतु यात त्यांना ‘राईट टू रिप्लाय’चा अधिकार नाही, असे म्हणत सभापतींनी ती नाकारली. यावरुन विरोधक आक्रमक झाले व शेतकऱ्यांना २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत कधी मिळणार, असा प्रश्न करत सभात्याग केला. हेमंत टकले यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे त्यांना ‘राईट टू रिप्लाय’चा अधिकार आहे. विरोधी पक्षनेत्यांना बोलता येणार नाही असे म्हणत सभापतींनी झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदार