शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

कळमना बाजारात शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 17:08 IST

ढगाळ वातावरणामुळे नुकसानीची भीती : कुठलीही सुरक्षा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेले धान दोन पैसे मिळावेत म्हणून कळमन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला आणले आहे. हजारो पोत्यांमध्ये भरलेले लाखो क्विंटल धानसाठा मार्केटमध्ये उघड्यावर पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. येत्या ५ डिसेंबरपर्यंत परिस्थिती कायम राहणार आहे. अशात अवकाळी पाऊस झाल्यास मोठे नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

नागपूर व भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आपला माल विकण्यासाठी कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणतात. दलालाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना धान विकले जाते. कळमन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दलालांचे वर्चस्व आहे. दलाल आपल्या फायद्यासाठी शेतमालाच्या किमती पाडतो. त्यामुळे शेतकरी अपेक्षित भाव मिळावा म्हणून माल बाजार समितीतच पुढे काही दिवस ठेवतो. सध्या कळमना बाजारात धानाची आवक सुरू झाली आहे. किमान १० हजारांवर धानाची पोती सध्या बाजारात उघड्यावर आहे. दक्षिण भारतात जोरदार पाऊस सुरू आहे, तर हवामान खात्याने नागपुरात ५ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तविला आहे. फंगल हे चक्रीवादळ अरबी समुद्राकडे सरकल्यास ढगाळ वातावरण आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे.

गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ भागात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याचा अंदाज नागपुरात नसला तरी सध्या असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पावसाची भीती आहे. तीन वर्षांपूर्वी याच सिजनमध्ये अवकाळी पाऊस झाला होता आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले होते. सध्या कळमन्याच्या पार्किंग एरियामध्ये धान साठविले जात आहे आणि ते उघड्यावर आहे. 

"एवढा मोठा शेतमाल शेतकरी आणत असताना त्यांच्या मालाच्या सुरक्षेची जबाबदारी समितीची आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आल्या होत्या; परंतु त्या आता शेतकयांच्या पिळवणुकीचे अड्डे झालेल्या आहेत, असेच म्हणावे लागेल. शेतकऱ्यांच्या भरवशावर दलालांच्या संपत्तीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांसाठी सुविधा न पुरविल्याने त्यांनी घाम गाळून पिकविलेले अन्न कवडीमोल ठरत आहे."- संजय सत्यकार, शेतकरी

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डnagpurनागपूरfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र