शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कळमना बाजारात शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 17:08 IST

ढगाळ वातावरणामुळे नुकसानीची भीती : कुठलीही सुरक्षा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेले धान दोन पैसे मिळावेत म्हणून कळमन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला आणले आहे. हजारो पोत्यांमध्ये भरलेले लाखो क्विंटल धानसाठा मार्केटमध्ये उघड्यावर पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. येत्या ५ डिसेंबरपर्यंत परिस्थिती कायम राहणार आहे. अशात अवकाळी पाऊस झाल्यास मोठे नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

नागपूर व भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आपला माल विकण्यासाठी कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणतात. दलालाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना धान विकले जाते. कळमन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दलालांचे वर्चस्व आहे. दलाल आपल्या फायद्यासाठी शेतमालाच्या किमती पाडतो. त्यामुळे शेतकरी अपेक्षित भाव मिळावा म्हणून माल बाजार समितीतच पुढे काही दिवस ठेवतो. सध्या कळमना बाजारात धानाची आवक सुरू झाली आहे. किमान १० हजारांवर धानाची पोती सध्या बाजारात उघड्यावर आहे. दक्षिण भारतात जोरदार पाऊस सुरू आहे, तर हवामान खात्याने नागपुरात ५ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तविला आहे. फंगल हे चक्रीवादळ अरबी समुद्राकडे सरकल्यास ढगाळ वातावरण आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे.

गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ भागात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याचा अंदाज नागपुरात नसला तरी सध्या असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पावसाची भीती आहे. तीन वर्षांपूर्वी याच सिजनमध्ये अवकाळी पाऊस झाला होता आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले होते. सध्या कळमन्याच्या पार्किंग एरियामध्ये धान साठविले जात आहे आणि ते उघड्यावर आहे. 

"एवढा मोठा शेतमाल शेतकरी आणत असताना त्यांच्या मालाच्या सुरक्षेची जबाबदारी समितीची आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आल्या होत्या; परंतु त्या आता शेतकयांच्या पिळवणुकीचे अड्डे झालेल्या आहेत, असेच म्हणावे लागेल. शेतकऱ्यांच्या भरवशावर दलालांच्या संपत्तीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांसाठी सुविधा न पुरविल्याने त्यांनी घाम गाळून पिकविलेले अन्न कवडीमोल ठरत आहे."- संजय सत्यकार, शेतकरी

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डnagpurनागपूरfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र