शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

कळमना बाजारात शेतकऱ्यांचे लाखो क्विंटल धान वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 17:08 IST

ढगाळ वातावरणामुळे नुकसानीची भीती : कुठलीही सुरक्षा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेले धान दोन पैसे मिळावेत म्हणून कळमन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला आणले आहे. हजारो पोत्यांमध्ये भरलेले लाखो क्विंटल धानसाठा मार्केटमध्ये उघड्यावर पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. येत्या ५ डिसेंबरपर्यंत परिस्थिती कायम राहणार आहे. अशात अवकाळी पाऊस झाल्यास मोठे नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

नागपूर व भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी आपला माल विकण्यासाठी कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणतात. दलालाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना धान विकले जाते. कळमन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत दलालांचे वर्चस्व आहे. दलाल आपल्या फायद्यासाठी शेतमालाच्या किमती पाडतो. त्यामुळे शेतकरी अपेक्षित भाव मिळावा म्हणून माल बाजार समितीतच पुढे काही दिवस ठेवतो. सध्या कळमना बाजारात धानाची आवक सुरू झाली आहे. किमान १० हजारांवर धानाची पोती सध्या बाजारात उघड्यावर आहे. दक्षिण भारतात जोरदार पाऊस सुरू आहे, तर हवामान खात्याने नागपुरात ५ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तविला आहे. फंगल हे चक्रीवादळ अरबी समुद्राकडे सरकल्यास ढगाळ वातावरण आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे.

गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ भागात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याचा अंदाज नागपुरात नसला तरी सध्या असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पावसाची भीती आहे. तीन वर्षांपूर्वी याच सिजनमध्ये अवकाळी पाऊस झाला होता आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले होते. सध्या कळमन्याच्या पार्किंग एरियामध्ये धान साठविले जात आहे आणि ते उघड्यावर आहे. 

"एवढा मोठा शेतमाल शेतकरी आणत असताना त्यांच्या मालाच्या सुरक्षेची जबाबदारी समितीची आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आल्या होत्या; परंतु त्या आता शेतकयांच्या पिळवणुकीचे अड्डे झालेल्या आहेत, असेच म्हणावे लागेल. शेतकऱ्यांच्या भरवशावर दलालांच्या संपत्तीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांसाठी सुविधा न पुरविल्याने त्यांनी घाम गाळून पिकविलेले अन्न कवडीमोल ठरत आहे."- संजय सत्यकार, शेतकरी

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डnagpurनागपूरfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र