शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

मुलांना शाळेत पाठविताय? स्कूल बॅगेत 'या' वस्तू ठेवायला विसरू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 17:02 IST

नवीन कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळा सुरू करताना कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला पाठविल्या आहेत. पालकांनीही मुलांना शाळेत पाठवितांना काही खबरदारी घ्यायची आहे.

नागपूर : शहरात अजूनही १ ते ७ च्या शाळा सुरू झाल्या नाहीत. पण ८ ते १२ चे वर्ग सुरू झाले आहे. मात्र ग्रामीणमध्ये आता १ ते १२ चे सर्वच वर्ग प्रत्यक्षात सुरू झाले आहे. नवीन कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळा सुरू करताना कोरोना प्रतिबंधात्मक मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला पाठविल्या आहेत. शिक्षण विभाग शाळांकडून त्या पूर्णही करून घेईल. पण पालकांनीही मुलांना शाळेत पाठवितांना काही खबरदारी घ्यायची आहे.

सॅनिटायझर

शालेत सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. शाळेत सॅनिटायझर असेल नसेल पण मुलांच्या सोबत त्याच्या स्कूल बॅगमध्ये सॅनिटायझरची बॉटल नक्कीच पाठवा आणि मुलांना सॅनिटायझर वापरण्याची सवय करा.

एक मास्क तोंडाला, दुसरा बॅगेत

विद्यार्थ्यांना शाळेत मास्क अत्यावश्यक केले आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आता दोन मास्क ठेवावे लागणार आहे. एक मास्क विद्यार्थ्यांच्या तोंडाला तर दुसरा स्कूल बॅगेत ठेवावा लागणार आहे. विशेष म्हणजे याबाबत शाळेने पालकांना सूचना केल्या आहेत.

डबा शेअरींग बंद

शाळांमध्ये पूर्वी डबा खायची सुट्टी होती. परंतु शासनाने कोरोनाची खबरदारी लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेतला. शाळेचा कालावधी ३ ते ४ तासांचा ठेवला आहे. त्यात डबा खाण्याची सुट्टी बंद केली आहे. याबाबतच्या सूचना आरोग्य विभागानेही केल्या आहेत.

सर्दी, डोकेदुखी असेल तर शाळेला बुट्टी

शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्दी, डोकेदुखी, ताप असल्यास त्यांनी शाळेत जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षण व आरोग्य विभागाने केल्या आहेत. तरीही पालकांनीही व शिक्षकांनीही त्यांना शाळेत पाठविण्यासाठी अथवा येण्यासाठी आग्रह धरू नये.

प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पौष्टीक आहार सेवन करणे आवश्यक आहे. हिरव्या ताज्या पालेभाज्या कडधान्य तसेच अंडीचा आहारात समावेश असावा. नियमित व्यायाम, योगासने केल्याने आरोग्य चांगले राहून रोग प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

डॉ. संदीप मोगरे, बालरोग तज्ञ

दिवसातून एकदा प्राणायाम हवाच

नियमित प्राणायाम केल्याने रोग प्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिवसातून एकदा प्राणायाम करणे आवश्यक आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यSchoolशाळाStudentविद्यार्थीEducationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस