शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
7
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
8
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
9
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
10
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
11
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
12
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
13
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
14
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
15
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
16
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
17
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
18
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
19
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
20
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया

वंचित घटकांना न्याय मिळवून देणार ‘न्यायदूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:28 AM

स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही समाजातील एक मोठा वर्ग मुख्य प्रवाहापासून फार लांब आहे. त्यांना स्वत:च्या घटनात्मक अधिकारांची पूर्णपणे माहिती नाही. त्यामुळे त्यांची जागोजागी फसवणूक होत आहे. त्यांना छोट्याछोट्या गोष्टी मिळविण्यासाठी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक अडचणीमुळे न्यायालयात जाणे त्यांच्याकरिता अशक्य आहे. शिवाय अनेकांना न्यायालय व वकिलांपर्यंत कसे पोहचावे हेदेखील माहीत नाही. हे विदारक चित्र बदलविण्यासाठी हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूर यांनी पुढाकार घेतला आहे. असोसिएशनने वंचित घटकांकरिता ‘न्यायदूत’ योजना आखली आहे.

ठळक मुद्दे‘एचसीबीए’ची योजना : पहिल्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यात शिबिरे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही समाजातील एक मोठा वर्ग मुख्य प्रवाहापासून फार लांब आहे. त्यांना स्वत:च्या घटनात्मक अधिकारांची पूर्णपणे माहिती नाही. त्यामुळे त्यांची जागोजागी फसवणूक होत आहे. त्यांना छोट्याछोट्या गोष्टी मिळविण्यासाठी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करावा लागत आहे. आर्थिक अडचणीमुळे न्यायालयात जाणे त्यांच्याकरिता अशक्य आहे. शिवाय अनेकांना न्यायालय व वकिलांपर्यंत कसे पोहचावे हेदेखील माहीत नाही. हे विदारक चित्र बदलविण्यासाठी हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूर यांनी पुढाकार घेतला आहे. असोसिएशनने वंचित घटकांकरिता ‘न्यायदूत’ योजना आखली आहे. या योजनेंतर्गत वंचित घटकांना न्याय्य हक्कांविषयी मार्गदर्शन करणे व त्यांना न्याय मिळवून देणे याकरिता पहिल्या टप्प्यामध्ये २१ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्यातील १० दुर्गम गावांमध्ये शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.ही संघटना आतापर्यंत एका विशिष्ट चौकटीतच कार्य करीत होती. ती वकिलांच्या समस्यांबाहेर क्वचितच गेली असेल. या चौकटीला पहिल्यांदा तोडण्यात आले आहे. संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांच्या व्यापक नेतृत्वाने वकिलांना समाजातील दुर्लक्षित घटकाच्या मदतीस धावून जाण्यासाठी प्रेरित केले आहे. हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबविला जाणार आहे. दुर्लक्षित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चमू तयार करण्यात येणार असून प्रत्येक चमूत १० वकिलांचा समावेश राहणार आहे. या चमू एकाच वेळी १० गावांमध्ये शिबिरे आयोजित करतील. एका ठिकाणच्या शिबिरामध्ये आजूबाजूची सर्व गावे सामावून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. परिणामी एकाचवेळी १५० ते २०० गावांतील नागरिकांच्या समस्या सोडविता येतील. शिबिर २ ते ३ तास चालेल. या शिबिरामुळे नागरिकांच्या कुटुंब, जमीन, भरपाई इत्यादीशी संबंधित छोट्याछोट्या समस्या जागेवरच सुटतील. मोठ्या समस्या सोडविण्यासाठी कुठे जायचे, काय करायचे, कुणाला भेटायचे याचे योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमामुळे न्यायालयात दाखल होणाऱ्या प्रकरणांचे प्रमाण कमी होईल व पक्षकारांची आर्थिक बचत होईल असा संघटनेला विश्वास आहे. या उपक्रमात स्थानिक वकील व विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. उपक्रमावर देणग्यांतून मिळणारी रक्कम खर्च केली जाणार आहे.योजनेत या बाबींचा समावेश१ - सामाजिक व आर्थिक मागास, अपंग, अशिक्षित, वृद्ध, निराधार आदी व्यक्तींना न्याय मिळवून देणे.२ - शेतकरी, शेतमजूर, महिला, पुरुष यांना न्याय्य हक्कांची जाणीव करून देणे. अत्याचार दूर करण्यासाठी त्यांना मदत करणे. त्यांना मुख्य प्रवाहात आणणे.३ - महिला अत्याचार व बाल मजुरी या समस्यांवर मार्गदर्शन करून ही समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करणे.४ - समाजाला शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे. पात्र व्यक्तींना योजनेचा लाभ मिळवून देणे.५ - समस्या सोडविण्यासाठी आवश्यकता भासल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणे.शनिवारी या गावात शिबिरेयेत्या शनिवारी गडचिरोली जिल्ह्यातील अडपल्ली, साखरा, जेप्रा, गिलगाव, ब्राह्मणी, खुर्सा, मेंढा (बोधली), चुरचुरा, अमिर्झा व टेंभा या गावांतील प्राथमिक शाळांमध्ये सकाळी ११.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत शिबिरे आयोजित करण्यात येतील. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण उपाध्ये यांच्या हस्ते अडपल्ली येथे सकाळी १०.३० वाजता उपक्रमाचे उद्घाटन करण्यात येईल.कार्यशाळेत मोठ्या संख्येत उपस्थितीमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील बार रुममध्ये गुरुवारी न्यायदूत उपक्रमावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत वकील मोठ्या संख्येत उपस्थित होते. त्यांना उपक्रमाचा उद्देश, संवाद कौशल्य, कार्यपद्धती, शिबिरे आयोजन इत्यादीबाबत सखोल माहिती देण्यात आली. या उपक्रमाविषयी प्रत्येकजण उत्साही असल्याचे चित्र दिसून आले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयadvocateवकिल