शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत तणाव! "फाटाफूट कराल तर स्वतंत्र निवडणूक लढू..."; शिंदेसेनेचा थेट युती तोडण्याचा इशारा?
2
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
4
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
5
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
6
विशेष लेख: बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण अन‌् फडणवीस
7
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
8
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
9
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
10
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
11
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
12
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
13
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
14
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
15
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
16
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
17
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
18
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
19
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
20
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
Daily Top 2Weekly Top 5

भारत-बांगलादेश सामन्यात जामठा स्टेडियम परिसर झाला ‘जाम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 10:34 IST

भारत आणि बांगलादेश दरम्यान रविवारी नागपुरातील जामठा स्टेडियमवर आयोजित एक दिवसीय क्रिकेट सामन्याला पाहण्यासाठी गर्दी केलेल्या नागरिकांमुळे जामठा परिसर जाम झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भारत आणि बांगलादेश दरम्यान रविवारी नागपुरातील जामठा स्टेडियमवर आयोजित एक दिवसीय क्रिकेट सामन्याला पाहण्यासाठी गर्दी केलेल्या नागरिकांमुळे जामठा परिसर जाम झाला होता. वर्धा मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. ती सुटायला बराच कालावधी जावा लागला. दोन पोलीस उपायुक्त, १८ पोलिस निरीक्षक, ५२ सहाय्यक निरीक्षक, ३९९ पोलिस पुरुष व ८१ महिला पोलिस यांच्यावर बंदोबस्ताची जबाबदारी होती. ही वाहतूक सुरळित व्हायला मध्यरात्र उजाडली होती.रविवारी सायंकाळी ५ नंतर पाच हजारांपेक्षा जास्त वाहने जामठ्यांकडे निघाल्याने वर्धा मार्ग वाहनांनी अक्षरश: फुलला होता. तर, एवढ्या मोठ्या संख्येतील वाहने वाहतुकीत अडसर निर्माण करू शकतात, हे ध्यानात घेऊन पोलिसांनी विशिष्ट टप्प्यांवर वाहने थांबवून टप्प्याटप्प्याने ती स्टेडियमकडे मार्गस्थ केल्याने वाहतुकीची कोंडी टळली.भारत आणि बांगला देशदरम्यान रविवारी येथील जामठा स्टेडियमवर होणाऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यासाठी ५० हजार प्रेक्षक येण्याची अपेक्षा असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याची भीती व्यक्त केली जात होती. अर्धेअधिक क्रिकेट रसिक आपापल्या वाहनांनी स्टेडियमवर येतात, असा यापूर्वीचा अनुभव असून एकाच वेळी हजारो वाहने रस्त्यावर आल्याने वाहतुकीची कोंडी होते. अपघाताची भीती वाढते. वाहतूक रखडल्यास रुग्ण घेऊन येणारी अ‍ॅम्ब्युलन्स अडकते, त्यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो. हा एकूणच प्रकार लक्षात घेऊन वाहतुकीत होणारा अडसर टाळण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र, पोलिसांनी अभ्यासपूर्ण नियोजन करून वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. सामना पाहण्यासाठी येणाऱ्यांच्या पार्किंगची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. पार्किंग वगळता रस्त्यावर कुठे वाहने उभी केल्यास ती पोलीस उचलून नेतील. त्यासाठी पोलिसांनी क्रेनची व्यवस्था केली.वाहतूक शाखेच्या ४५० कर्मचाºयांना वर्धा मार्गावर तैनात करण्यात आले. त्यांनी सामन्यादरम्यान जड वाहनांना दूरवर अडवून ठेवले. चिंचभूवन ते जामठा स्टेडियम या दरम्यानच्या विशिष्ट अंतरावर तीन ते पाच मिनिटांसाठी वाहने थांबवून टप्प्याटप्प्याने वाहने पुढे सोडली. सामना संपल्यानंतरही प्रत्येकाला घाई सुटते. त्यामुळे अपघाताची भीती असते.अपघात झाल्यास वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे दोन्ही बाजूने वाहनांसाठी मार्ग खुला करण्यात आला. परिणामी काही मिनिटांचा अपवाद वगळता पहिल्यांदाच जाम लागला नाही, असा दावा रविवारी रात्री उशिरा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी लोकमतशी बोलताना केला.

पोलिसांचे परिश्रम फळाला !आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची सुरक्षा पोलिसांसाठी अत्यंत संवेदनशील विषय असतो. मात्र, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर, अतिरिक्त आयुक्त शशिकांत महावरकर, अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त विवेक मासाळ, उपायुक्त चिन्मय पंडित यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने रविवारी दुपारी ३ वाजतापासून तो रात्री ११.५० पर्यंत परिश्रम घेतले. त्यामुळे कसलीही गडबड गोंधळ किंवा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. 

टॅग्स :India vs Bangladeshभारत विरुद्ध बांगलादेश