शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही : राष्ट्रवादीच्या बैठकीत सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 21:26 IST

गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शहरातून साफ झाली. आती दीड वर्षांनी पुन्हा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. संघटन कसेबसे सुरू आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्दे निष्ठावान कार्यकर्त्यांना सन्मान मिळावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शहरातून साफ झाली. आती दीड वर्षांनी पुन्हा निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. संघटन कसेबसे सुरू आहे. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे, अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी काटोल रोड चौकातील जंक्शन फंक्शन हॉलमध्ये झाली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, शहर अध्यक्ष अनिल अहीरकर, माजी आ. प्रकाश गजभिये, प्रवक्ते प्रवीण कुंटे, दिलीप पनकुले, शब्बीर विद्रोही, दुनेश्वर पेठे, वेदप्रकाश आर्य, अशोक काटले, महिला अध्यक्ष अलका कांबळे, नूतन रेवतकर, रिजवान अन्सारी, रवींद्र इटकेलवार, मधुकर भावसार आदी उपस्थित होते.सत्ता नव्हती तेव्हा लोक भाजपच्या तंबूत दिसायचे. आता सत्ता व गृहमंत्रिपद मिळाल्यामुळे बैठकांमधील गर्दी वाढू लागली आहे. नवनवे चेहरे येऊ लागले आहेत. मात्र, पडतीच्या काळात सोबत राहिलेल्या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळावा, अशी अपेक्षा प्रमुख पदाधिकाºयांनी व्यक्त केली. समित्या, मंडळ, महामंडळावरील नियुक्ती त्वरित करा. पक्ष कार्यकारिणीवरही स्थान द्या तसेच विविध आंदोलनात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे परत घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली.शहरासाठी कोअर कमिटीमहापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष संघटना मजबूत करून प्रत्येक बूथवर नियोजन करण्यासाठी नागपूर शहरासाठी कोअर कमिटी नेमली जाईल. त्यात महत्त्वाच्या पदावर असलेल्या तसेच अनुभवी लोकांना स्थान दिले जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.१५० वर कार्यकर्त्यांना परवानगी कशी ?शहरात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गर्दी टाळण्याचे, उपाय योजण्याचे आवाहन प्रशासनातर्फेकेले जात आहे. एवढेच नव्हे तर लग्न सोहळ्यासाठीही फक्त ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची अट आहे. असे असताना राष्ट्रवादीच्या या बैठकीला १५० वर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विनापरवानगी झालेल्या या गर्दीची आता महापालिका प्रशसन दखल घेणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसnagpurनागपूर