शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

...पण सारंकाही शांत झालंय आता

By admin | Updated: July 15, 2015 03:30 IST

कवयित्री अरुणा देशमुख यांच्या निधनाने हळहळ : साहित्य वर्तुळात सुन्नता

नागपूर : मृत्यू शाश्वत असतो आणि कदाचित जीवनही. लौकिकार्थाने केवळ मानवी देहाचे असणे म्हणजे जीवन असे मानले गेले तरी अध्यात्मशास्त्राप्रमाणे जीवनही शाश्वतच असते. विविध विचारधारांमध्ये हा वादाचा मुद्दा असला तरी मानवी जीवनच सर्वार्थाने मान्य केले गेले आहे.मृत्यू हा छोटासा थांबा आणि पुन्हा जीवनाला नव्याने प्रारंभ होतो, असेही मानले जाते. अर्थात विज्ञानाचा आधार घेतला तर ऊर्जा कधीच संपत नाही पण त्याचे रूपांतर दुसऱ्या स्वरूपात होते. तरीही माणसाला कायम भौतिक जीवनाची, देहाची आसक्ती असते. प्रत्येकालाच इतक्या उंच पातळीवर जाता येणे शक्य नाही पण एखाद्या निमित्ताने मानवाला हा आत्मप्रत्यय दिला आणि त्यातून सृजनशील कविता जन्माला आली तर ती वाचकांना विचार करायला भाग पाडते. डॉ. अरुणा देशमुख यांनी कॅन्सरशी संघर्ष करताना आलेल्या अनुभवांचा, वेदनांचा आणि मृत्यूच्या जवळ असण्याचा अनुभव कवितेच्या माध्यमातून व्यक्त केला. अवघ्या तीन-चार महिन्यांपूर्वीच त्यांच्या या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले आणि आज नियतीने त्यांना आपल्यापासून हिरावले. त्यांच्याच कवितेच्या ओळीत ‘पण सार काही शांत झालय आता...’‘हा उधळता वादळी वारा थांबलाय आता, ठेवल्या आहेत त्याने वादळाच्या खाणाखुणा, पण सारं काही शांत झालय आता....। जगण्याच्या आदिम इच्छांचे जुळतील तंबोरे आणि रंगेल मेहफिल पुन्हा एकदा माझ्यातल्या जीवस्पंदाची...’ अरुणातार्इंच्या ‘कॅन्सरच्या कविता’ या कवितासंग्रहातील अखेरच्या कवितेची ही अखेरची ओळ. जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि आशावादही त्यांनी यातून व्यक्त केला पण नियतीपुढे सारेच हतबल ठरतात. कॅन्सरच्या वेदना आणि मृत्यूशी येणारा सबंध, त्यातली अनिश्चितता कवी ग्रेस यांनीही ललितबंधातून व्यक्त केली. अनेकांनी हा आत्मप्रत्यय लेखनातून मांडला पण एखाद्या कवयित्रीने जीवनाचा आशावाद आणि मृत्यूच्या शाश्वतेची प्रत्यक्ष अनूभूती घेऊन कविता लिहिणे, हा मराठीतला कदाचित पहिलाच आणि त्यामुळेच महत्त्वाचा प्रसंग आहे. ही प्रत्यक्ष अनुभूती कवितेच्या माध्यमातून रसिकांपर्यंत येते तेव्हा रसिकही विचारप्रवृत्त होतात. बुद्धीप्रामाण्यवादी लेखन करणाऱ्या डॉ. देशमुख यांच्या कवितेत जगण्याची तीव्र इच्छा आहे. व्यक्तीच्या दु:खातून समष्टीपर्यंत जाताना स्व ला ओळखण्याचाही प्रयत्न आहे. त्यांची कविता देहभानातून अस्तित्व भानाकडे जाणारी आहे. मृत्यू येणार असतोच, तो टाळता येत नाही पण त्याच्याशी लढण्याची आणि त्याला अजून काही वर्षे थोपवून धरण्याच्या जीवनेच्छेची ही कविता लिहिणाऱ्या अरुणाताई आता अनंतात विलीन झाल्या आहेत. कॅन्सरवर मात करण्याची त्यांची जिद्द पाहता त्या यातून नक्कीच बाहेर पडतील, असा विश्वास असताना त्यांचे निघून जाणे धक्का देणारे आहे. स्वत:ला आपला स्व सापडणे आणि त्याचा प्रत्यय होणे यापेक्षा अधिक काही शोधायचे उरत नाही. अरुणातार्इंना ही वाट गवसली होती, हे त्यांच्या कवितेतून जाणवते. कदाचित त्यामुळेच असेल कॅन्सर झाल्यावर त्या गर्भगळीत झाल्या नाहीत. जगण्याचे सौंदर्य आणि त्यातली अर्थपूर्णता त्यांनी ताकदीने व्यक्त केली आणि मृत्यूचे चिंतनही तितक्याच ताकदीने व्यक्त केले पण त्यात निराशावाद नाही. पुन्हा नव्याने जगण्याच्या आशावादाचे पंख व्यक्त करताना त्यांच्यातले आत्मबलही सुजाण रसिकांना जाणविल्याशिवाय राहात नाही. हा त्यांचा अखेरचा कवितासंग्रह होता. यानंतर अरुणाताई नसतील पण त्यांची कविता आणि त्यांचा विचार प्रेरणा देत राहणारा आहे. विदर्भाच्या साहित्य सृष्टीत त्यांच्या जाण्याने एक सुन्नता आली आहे. (प्रतिनिधी)