शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

मास्कसाेबत घरात हवा चांगली खेळती ठेवणेही महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 09:50 IST

Coronavirus in Nagpur मास्क आवश्यक आहेच पण घरात हवा चांगली खेळती राहावी (व्हेंटिलेशन) हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे उच्च गुणवत्तेचे मास्कच विषाणूला दूर ठेवतील

मेहा शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : अनेक प्रयत्न करूनही काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सामाजिक प्रसार थांबवायचा कसा, हा प्रश्न सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेलाही पडला आहे. सरकारने नुकतेच घरामध्ये वावरतानाही मास्कचा वापर करावा, अशा सूचना केल्या आहेत. याबाबत लाेकमतने तज्ज्ञ डाॅक्टरांशी संवाद साधला. मास्क आवश्यक आहेच पण घरात हवा चांगली खेळती राहावी (व्हेंटिलेशन) हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कान, नाक, घसा तज्ज्ञ डाॅ. नितीन देवस्थळे यांच्या मते सामाजिक प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कुटुंबातील एखादा सदस्य बाहेर जाणारा असेल आणि त्याच्यात लक्षणे आढळत नसली तरी घरातील इतरांना संक्रमित करण्यास कारणीभूत ठरू शकताे. त्यामुळे ही आजारापूर्वीचा उपाय आहे. दुसऱ्या लाटेतील ९० टक्के रुग्ण असिम्टमॅटिक असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील विषाणूचा स्ट्रेन वेगळा आहे. मात्र मृत्युदर १.५ टक्के असला तरी हा हवेतूनही पसरू शकताे आणि प्रसार वेगाने हाेताे. यामुळे संक्रमित हाेण्याची शक्यता अधिक आहे. मुले हे सुपर स्प्रेडर आहेत आणि त्यांच्यात संक्रमित हाेण्याची क्षमता अधिक आहे. ते पालक व ज्येष्ठांच्या संपर्कात सहज येतात व त्यातून ज्येष्ठांना संक्रमणाचा धाेका अधिक असल्याचे मत डाॅ. देवस्थळे यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते एन-९५ मास्क हा पूर्ण सुरक्षित आहे पण याेग्य मास्क ओळखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे एका मास्कवर विसंबून न राहता दाेन मास्क वापरणे अधिक याेग्य आहे.

संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डाॅ. नितीन शिंदे यांच्या मते घरामध्ये नियमित मास्क वापरणे व्यवहार्य ठरणारे नाही. मात्र द्वितीय स्तराचा संसर्ग राेखणे महत्त्वाचे आहे. एक सदस्य पाॅझिटिव्ह असेल तर घरातील इतर चार सदस्यांनीही मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र कुटुंबात संसर्ग राेखण्यासाठी घरातील हवा खेळती ठेवणे, हा सर्वाेत्तम पर्याय आहे. डाॅ. शिंदे यांनी हवेची गुणवत्ता राखण्यावर भर दिला आहे. आपण टाईल्स आणि वस्तूंची साफसफाई करताना हवेच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करताे. अनेकदा सॅनिटायझेशनही आवश्यक नाही तर केवळ हवेची गुणवत्ता राखणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. स्वत: फिट राहिले तर विषाणूला दूर ठेवता येते. तुम्ही काेणता मास्क वापरता हे मॅटर करीत नाही. तुम्ही एन-९५ मास्क घेतला पण ताे गुणवत्तापूर्ण नसेल तर सुरक्षित राहण्याचा तुमचा उद्देश सफल हाेणार नाही. पूर्णपणे पॅक असलेला मास्क घेणे आणि बाहेर जाताना त्याचा नेहमी वापर करणे आवश्यक आहे. बाहेर तासाभरासाठी जरी मास्क काढला तरी तुमची सुरक्षिता धाेक्यात आली म्हणून समजा.

- आकडेवारीनुसार बाेलणाऱ्या दाेन्ही व्यक्तींनी मास्क घातला तर संसर्ग हाेण्याचे प्रमाण १.५ टक्के म्हणजे अत्यल्प असते. संक्रमित व्यक्तीने घातला व सुदृढ व्यक्तीने वापरला नाही तर संसर्गाची शक्यता ५ टक्के असते. सुदृढ व्यक्तीने वापरला आणि संक्रमित रुग्णाने वापरला नसेल तर संसर्गाचा धाेका ३० टक्के असताे. मात्र संक्रमित व सुदृढ अशा दाेघांनीही मास्क वापरला नाही तर धाेका ९० टक्क्यांनी वाढताे.

- यूएस सेंटर फाॅर डिसीज कन्ट्राेल ॲण्ड प्राेटेक्शन (सीडीसी) कडूनही अशाच प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत. सीडीसीच्या मते जरी तुम्ही ६ फुटांचे अंतर राखून असले तरी मास्क वापरणे अनिवार्य आहे. विशेषत: जर घरी तुमच्या आसपास घराबाहेरील व्यक्ती असेल तर मास्क वापरणे नितांत गरजेचे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस