शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

मास्कसाेबत घरात हवा चांगली खेळती ठेवणेही महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 09:50 IST

Coronavirus in Nagpur मास्क आवश्यक आहेच पण घरात हवा चांगली खेळती राहावी (व्हेंटिलेशन) हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे उच्च गुणवत्तेचे मास्कच विषाणूला दूर ठेवतील

मेहा शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : अनेक प्रयत्न करूनही काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने सामाजिक प्रसार थांबवायचा कसा, हा प्रश्न सरकार आणि प्रशासकीय यंत्रणेलाही पडला आहे. सरकारने नुकतेच घरामध्ये वावरतानाही मास्कचा वापर करावा, अशा सूचना केल्या आहेत. याबाबत लाेकमतने तज्ज्ञ डाॅक्टरांशी संवाद साधला. मास्क आवश्यक आहेच पण घरात हवा चांगली खेळती राहावी (व्हेंटिलेशन) हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

कान, नाक, घसा तज्ज्ञ डाॅ. नितीन देवस्थळे यांच्या मते सामाजिक प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कुटुंबातील एखादा सदस्य बाहेर जाणारा असेल आणि त्याच्यात लक्षणे आढळत नसली तरी घरातील इतरांना संक्रमित करण्यास कारणीभूत ठरू शकताे. त्यामुळे ही आजारापूर्वीचा उपाय आहे. दुसऱ्या लाटेतील ९० टक्के रुग्ण असिम्टमॅटिक असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील विषाणूचा स्ट्रेन वेगळा आहे. मात्र मृत्युदर १.५ टक्के असला तरी हा हवेतूनही पसरू शकताे आणि प्रसार वेगाने हाेताे. यामुळे संक्रमित हाेण्याची शक्यता अधिक आहे. मुले हे सुपर स्प्रेडर आहेत आणि त्यांच्यात संक्रमित हाेण्याची क्षमता अधिक आहे. ते पालक व ज्येष्ठांच्या संपर्कात सहज येतात व त्यातून ज्येष्ठांना संक्रमणाचा धाेका अधिक असल्याचे मत डाॅ. देवस्थळे यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते एन-९५ मास्क हा पूर्ण सुरक्षित आहे पण याेग्य मास्क ओळखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे एका मास्कवर विसंबून न राहता दाेन मास्क वापरणे अधिक याेग्य आहे.

संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डाॅ. नितीन शिंदे यांच्या मते घरामध्ये नियमित मास्क वापरणे व्यवहार्य ठरणारे नाही. मात्र द्वितीय स्तराचा संसर्ग राेखणे महत्त्वाचे आहे. एक सदस्य पाॅझिटिव्ह असेल तर घरातील इतर चार सदस्यांनीही मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र कुटुंबात संसर्ग राेखण्यासाठी घरातील हवा खेळती ठेवणे, हा सर्वाेत्तम पर्याय आहे. डाॅ. शिंदे यांनी हवेची गुणवत्ता राखण्यावर भर दिला आहे. आपण टाईल्स आणि वस्तूंची साफसफाई करताना हवेच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करताे. अनेकदा सॅनिटायझेशनही आवश्यक नाही तर केवळ हवेची गुणवत्ता राखणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. स्वत: फिट राहिले तर विषाणूला दूर ठेवता येते. तुम्ही काेणता मास्क वापरता हे मॅटर करीत नाही. तुम्ही एन-९५ मास्क घेतला पण ताे गुणवत्तापूर्ण नसेल तर सुरक्षित राहण्याचा तुमचा उद्देश सफल हाेणार नाही. पूर्णपणे पॅक असलेला मास्क घेणे आणि बाहेर जाताना त्याचा नेहमी वापर करणे आवश्यक आहे. बाहेर तासाभरासाठी जरी मास्क काढला तरी तुमची सुरक्षिता धाेक्यात आली म्हणून समजा.

- आकडेवारीनुसार बाेलणाऱ्या दाेन्ही व्यक्तींनी मास्क घातला तर संसर्ग हाेण्याचे प्रमाण १.५ टक्के म्हणजे अत्यल्प असते. संक्रमित व्यक्तीने घातला व सुदृढ व्यक्तीने वापरला नाही तर संसर्गाची शक्यता ५ टक्के असते. सुदृढ व्यक्तीने वापरला आणि संक्रमित रुग्णाने वापरला नसेल तर संसर्गाचा धाेका ३० टक्के असताे. मात्र संक्रमित व सुदृढ अशा दाेघांनीही मास्क वापरला नाही तर धाेका ९० टक्क्यांनी वाढताे.

- यूएस सेंटर फाॅर डिसीज कन्ट्राेल ॲण्ड प्राेटेक्शन (सीडीसी) कडूनही अशाच प्रकारचे निर्देश देण्यात आले आहेत. सीडीसीच्या मते जरी तुम्ही ६ फुटांचे अंतर राखून असले तरी मास्क वापरणे अनिवार्य आहे. विशेषत: जर घरी तुमच्या आसपास घराबाहेरील व्यक्ती असेल तर मास्क वापरणे नितांत गरजेचे आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस