शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांतून वाहतेय पाणी की विष? जलप्रदूषणात महाराष्ट्र अव्वल

By सुनील चरपे | Updated: March 9, 2026 13:05 IST

Nagpur : जीवनदायिनी असलेल्या नद्यांमधील पाण्याचा प्रवाह औद्योगिकीकरणाचा हव्यास आणि शासन व प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षित धोरणांमुळे विषारी झाला आहे.

सुनील चरपेनागपूर : जीवनदायिनी असलेल्या नद्यांमधील पाण्याचा प्रवाह औद्योगिकीकरणाचा हव्यास आणि शासन व प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षित धोरणांमुळे विषारी झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२५ च्या अहवालानुसार देशभरातील ६२३ प्रमुख व मोठ्या नद्यांच्या अभ्यासाअंती २७१ नद्यांमध्ये २९६ प्रदूषित पट्टे आढळून आले आहेत. यात महाराष्ट्रातील ५४ तर विदर्भातील सात प्रमुख नद्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या सर्व नद्यांचे पाणी विविध शहरांसह छोट्या-मोठ्या गावांना पिण्यासाठी पुरविण्यात येते. या नद्यांच्या पाण्यात विविध घातक रसायने मिसळली जात असून, ती जलशुद्धीकरणात पूर्णपणे नष्ट होत नसल्याने त्यांचा मानवी आरोग्यावर आजारांच्या रूपाने वाईट परिणाम दिसून येत आहे. शिवाय, त्या नद्यांमधील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. 

पाण्याचे प्रदूषण ओळखतात कसे?

प्रदूषण ओळखण्यासाठी पाण्यातील बीडीओ (बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड) आणि सीओडी (केमिकल ऑक्सिजन डिमांड) चे प्रमाण मोजले जाते. बीडीओमध्ये पाण्यातील जिवंत सेंद्रिय कचरा (उदा. सांडपाणी) तर सीडीओ (केमिकल ऑक्सिजन डिमांड ऑक्सिजन डिमांड) मध्ये पाण्यातील औद्योगिक रसायने किंवा इतर न कुजणारे पदार्थ व घटक मोजले जातात. पाण्यात बीडीओचे प्रमाण ३ एमजी/लिटरपेक्षा कमी असेल तर ते पाणी स्वच्छ मानले जाते. हे प्रमाण ३ ते १० एमजी/लिटर असेल तर मध्यम प्रदूषित आणि १० एमजी/लिटरपेक्षा जास्त असेल तर अतिप्रदूषित मानले जाते. पाण्यात सीओडीचे प्रमाण १० ते २० एमजी/लिटर असेल तर ते पाणी स्वच्छ आणि त्यापेक्षा अधिक असेल तर प्रदूषित मानले जाते.

प्रदूषण तीव्रता

भारतातील नद्यांपैकी ४६ ते ५० नद्यांचे पाणी औद्योगिक कचरा व प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे दूषित झाले आहे. प्राधान्य-१ व प्राधान्य-२ या श्रेणीतील नद्या सर्वाधिक प्रदूषित मानल्या जातात. या श्रेणीत ३७ पट्टयांचा समावेश असून, यातील पाण्यात बोओडीचा म्हणजेच जैविक ऑक्सिजनचा तुटवडा अत्यंत जास्त आहे. प्राधान्य-३ व प्राधान्य-४ या श्रेणीतील नद्या मध्यम प्रदूषित मानल्या जातात.

जलप्रदूषणात महाराष्ट्र अव्वल

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या २०२५ च्या अहवालानुसार नद्यांच्या प्रदूषणात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात एकूण ५४ नद्या अति व मध्यम प्रदूषित असून, दुसऱ्या क्रमांकावर ३१ प्रदूषित नद्या असलेले केरळ, तिसऱ्या क्रमांकावर प्रत्येकी १८ प्रदूषित नद्या आलेले मध्य प्रदेश व मणिपूर आणि चौथ्या क्रमांकावर प्रत्येकी १७ प्रदूषित नद्या असलेल्या उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेश आणि पाचव्या क्रमांकावर १६ प्रदूषित नद्या असलेले ओडिशा आहे.

महाराष्ट्रातील प्रदूषित नद्या

अतिप्रदूषित म्हणजे प्राधान्य-१ श्रेणीत मिठी (मुंबई), काळू (ठाणे), कुंडलिका (रायगड), साबरमती, इंद्रायणी, प्राधान्य-२ मध्ये मुळा, मुठा, पवना, भीमा, मुळा-मुठा, इंद्रायणी, वैनगंगा, वर्धा, प्राधान्य-३ मध्ये गोदावरी, कृष्णा, तापी, पूर्णा, कन्हान, कोलार, वेणा, उर्मोडी, घोड, वाघूर, प्राधान्य- ३ व ४ मध्ये कोयना, चंद्रभागा, दारणा, बिंदुसरा, सीना, पेल्हार, गिरणा, हिवरा, तिठूर, बोरी, वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, पंचगंगा, अंबा, भातसा, पांझरा, सूर्या, तानसा, मांजरा, रंगवली, गोमाई, कान, नागनदी व मोरना या नद्यांचा समावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Rivers Choked: Pollution Surges, Threatening Water Supply and Health

Web Summary : Maharashtra's rivers face severe pollution, leading the nation with 54 affected waterways. Industrial waste and untreated sewage contaminate drinking water sources, posing health risks and endangering aquatic life. Urgent action is needed.
टॅग्स :water pollutionजल प्रदूषणriverनदीnagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र