शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
2
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
3
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
4
पतीच्या मृत्यूचा धक्का झाला नाही सहन, शोकाकुल पत्नीनंही संपवलं जीवन, एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
5
ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- "प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला..."
6
तुमचेही पैसे ब्लूस्मार्ट वॉलेटमध्ये अडकलेत? रिफंडसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस फॉलो करा
7
लेख: श्रीमंत जिल्ह्यांना खुराक आणि गरीब जिल्हे मात्र उपाशीच?
8
"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव
9
"मी अमितचा हात धरला, बॉयफ्रेंडने गळा दाबला..."; नवऱ्याचा काटा काढणाऱ्या बायकोची कबुली
10
Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
11
५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे
12
मोठी कारवाई! बीड सायबर ठाण्यातील वादग्रस्त PSI रणजीत कासले पोलिस खात्यातून डिसमिस
13
Usha Thakur : "पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, कुत्रे, मांजर बनतील; जे लोकशाही...
14
बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली; नीलम गोऱ्हे यांची सावध प्रतिक्रिया
15
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
16
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
17
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
18
सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..."
19
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
20
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

जागतिक वन दिन विशेष : जंगलतोडीमुळे काही रोगांना मिळाले आदर्श निवासस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 10:18 IST

केवळ काेराेनाच नाही, तर मलेरिया, चिकुनगुनिया, डेंग्यू, झिका आणि एड्ससारखे आजारही वन्यजीवांकडून माणसांमध्ये आले असून, वनक्षेत्रात झालेली घट यासाठी कारणीभूत ठरली आहे.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय संशाेधन वन क्षेत्राची घट ठरते आजारांच्या प्रसाराला कारणीभूत

निशांत वानखेडे

नागपूर : काेराेना विषाणूचा प्रकाेप सारे जग मागील दाेन वर्षांपासून अनुभवत आहे. हा आजार कसा आला, यावर संशाेधन सुरू आहे; पण चीनमधून प्रसारित झालेला हा विषाणू वटवाघूळ किंवा इतर वन्यप्राण्यांकडून माणसांमध्ये आल्याचे वैज्ञानिकांचे ठाम मत आहे. केवळ काेराेनाच नाही, तर मलेरिया, चिकुनगुनिया, डेंग्यू, झिका आणि एड्ससारखे आजारही वन्यजीवांकडून माणसांमध्ये आले असून, वनक्षेत्रात झालेली घट यासाठी कारणीभूत ठरली आहे. जंगलताेडीमुळे अनेक आजारांना मानवी वस्तीमध्ये आदर्श निवासस्थान मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही.

वन क्षेत्र घटल्यामुळे केवळ हवामान बदल, अतिवृष्टी, महापूर किंवा ग्लाेबल वार्मिंग यांसारख्याच समस्या निर्माण झाल्या नाहीत, तर मानवी आराेग्याचे माेठे प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्रीय वने, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाच्या समितीचे सदस्य सुरेश चाेपणे यांच्या मते माेठ्या प्रमाणात हाेणारी जंगलताेड ही अनेक आजारांच्या प्रसारासाठी कारणीभूत आहे.

माणसांमध्ये सामान्य असलेले आजार वन्यप्राण्यांकडून येणारे आहेत. वन क्षेत्र घटल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीत आले आहेत. त्यांचा संपर्क पाळीव प्राण्यांशी येत असून, त्यामुळे माणसेही बाधित हाेत आहेत. प्राण्यांवरती वाढणारे जंगलातील डास मानवांपर्यंत पाेहोचले आहेत. जंगलातील प्राण्यांमध्ये वाढणारे विषाणू, जिवाणू वेगवेगळ्या माध्यमातून माणसांमध्ये येत आहेत. पुढील जागतिक महामारी जंगलातून बाहेर पडू शकते आणि त्वरित जगभर पसरू शकते, अशी भीती सुरेश चाेपणे यांनी व्यक्त केली.

जगभरातील संशाेधन काय सांगते

- १९९० च्या दशकात पेल्च्या एका भागात अचानक मलेरियाचा उद्रेक झाला. त्या भागातील घनदाट जंगलात रस्ता तयार करण्यासाठी वृक्षताेड केल्यामुळे हा उद्रेक झाल्याचे संशाेधकांचे मत हाेते.

- लंडन स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन अँड हायजीनच्या शास्त्रज्ञांच्या मते मॅकाक नावाच्या प्राइमेट्सकडून मलेरियाचा डास माणसांमध्ये पाेहोचला व जगभर पसरला.

- जंगलातून मानवामध्ये आजारांचे वाहक केवळ डास नाहीत, तर वटवाघूळ, सस्तन प्राणी (प्राइमेट्स), गाेगलगायीदेखील आजारांच्या वाहक आहेत.

- वटवाघळांमध्ये इबोला विषाणूचा प्रादुर्भाव असल्याचे मानले जाते, ज्याने लाखाे लोकांचा बळी घेतला. सार्सचा विषाणूदेखील वन्यप्राण्यांपासून मानवात आला.

- जंगल साफ केल्यानंतर या सर्व प्रजातींमध्ये संक्रमणाची गतिशीलता बदलते. वन क्षेत्रात जेवढ्या प्रजाती, तेवढे आजार अधिक.

- लॅटिन अमेरिकेत उद्रेक झालेला झिका विषाणू हा १९४० च्या दशकात युगांडाच्या जंगलातून उदयास आला.

- डासांमुळे पसरणारे डेंग्यू, चिकुनगुनिया, पिवळा ताप व इतर आजारदेखील आफ्रिकेच्या जंगलातून बाहेर आले असावेत.

- जगभरात २५ दशलक्षाहून अधिक लाेकांचा बळी घेणारा एड्स हा आजारदेखील झुडपी प्राण्यांचे मांस खाणाऱ्या चिंपांझीसारख्या सस्तन प्राण्यांमुळे मानवात आला.

मानवामध्ये असलेले बहुतेक आजार वन्यप्राण्यांकडून आलेले आहेत. वन्यप्राण्यांतून माकडात व त्यांच्याकडून माणसात आलेला कॅसनूर आजार. वटवाघळातून रेबीज, इबाेला आलेला आहे. रेबीजचे धाेके पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहेत, कारण वन्यप्राण्यांचा संपर्क वाढला आहे. डेंग्यू चिकुनगुनिया, येलाे फिव्हर, झिका, जापनीज एनसाफलायटिस हे आजार प्राण्यांमधून माणसात आले आहेत. जंगल कापले की जमीन गरम हाेते, ह्यूमॅडिटी वाढते, यामुळे डासांसह विषाणू, जिवाणू, फंगस यांची वाढ हाेण्यास चांगले वातावरण मिळते.

- डाॅ. हेमंत जैन, व्हेटर्नरी सर्जन

टॅग्स :environmentपर्यावरणSocialसामाजिकInternational Forest Dayआंतरराष्ट्रीय वन दिनforestजंगल