शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

भारतीय रंगभूमी अस्तित्ववादात बांधली गेली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 11:51 IST

अस्तित्ववाद किंवा आदर्शवाद मनुष्याला एका कंसात बंदिस्त करण्यासारखे आहे. मनुष्याला एका निश्चित रूपात बांधणे म्हणजे त्याच्या स्वातंत्र्याला बांधणे होय.

ठळक मुद्देसतीश पावडे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अस्तित्ववाद किंवा आदर्शवाद मनुष्याला एका कंसात बंदिस्त करण्यासारखे आहे. मनुष्याला एका निश्चित रूपात बांधणे म्हणजे त्याच्या स्वातंत्र्याला बांधणे होय. अस्तित्ववादाने सामाजिक अंतरसंबंधांना धक्का लावला होता. आदर्शवादाच्या विपरीत निरर्थकता किंवा मिथ्यावाद मनुष्याच्या जीवनाला अर्थ देणारा असतो. भारतीय रंगभूमीने नेहमीच या मिथ्यावादाला महत्त्व दिले आहे, असे मत वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. रजनीशकुमार शुक्ल यांनी व्यक्त केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नागपूरच्यावतीने रविवारी नाटककार डॉ. सतीश पावडे यांच्या ‘दि थिएटर आॅफ दि अ‍ॅब्सर्ड’ आणि ‘नाट्यप्रसंग’ या दोन पुस्तकांचे धनवटे सभागृह, शंकरनगर येथे प्रकाशन झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी गिरीश गांधी, प्रसिद्ध साहित्यिक अरुण वेलणकर, ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, श्रीपाद अपराजित, प्रेमबाबू लुनावत, सलीम शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. शुक्ल यांनी डॉ. सतीश पावडे यांच्या पुस्तकातील रंगभूमीच्या अ‍ॅब्सर्ड प्रवाहावर मुख्यत्वे भाष्य केले. आधुनिकतेने व्यक्तीचे महत्त्व संपविले आहे. राज्य व विधीचे महत्त्व वाढले आहे. मनुष्याच्या संवेदना, संवेदनशील जीवन व आतमध्ये असलेले आनंदाचे प्रवाह मशीनप्रमाणे प्रस्तुत होऊ लागले. मनुष्याच्या अस्मितेला निर्धारीत करणाऱ्या या विकासाच्या मॉडेलचा महात्मा गांधी यांनी विरोध केला होता. विकासाचे मॉडेल विध्वंसक होतात तेव्हा ही निरर्थकता, अ‍ॅब्सर्डिटी महत्त्वाची वाटते. भारतीय रंगभूमीने नेहमीच या अ‍ॅब्सर्ड प्रवाहाचा स्वीकार केल्याचे ते म्हणाले. अस्तित्ववादाचे दुष्परिणाम पाश्चात्त्यांपूर्वी भारतीयांना भोगावे लागतात. आधुनिकतेच्या दबावात वैयक्तिक अनुभव व विविधतेला विद्रुप रूपात प्रस्तुत केले जाते. मिथ्यावादाचा स्वीकार करून आनंद घेण्याचा प्रवाह महत्त्वाचा आहे व रंगभूमी याच प्रवाहात अभिव्यक्त झाली आहे. डॉ. पावडे यांनी रंगभूमीचा हा प्रवाह मांडण्याचा चांगला प्रयत्न केला, असे मनोगत त्यांनी मांडले.अरुण वेलणकर यावेळी म्हणाले, सगळ जग अ‍ॅब्सर्ड नाही. अनेकांना अर्थपूर्णता महत्त्वाची वाटते. अनेक पाश्चात्त्य नाटककारांच्या नाटकांनी येथे वादळ उठविली. पण मराठी रंगभूमीने आपले भारतीयत्व पुन्हा शोधले व पुढेही शोधले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. गिरीश गांधी यांनी डॉ. सतीश पावडे हे संवेदनशील लेखक व अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी डॉ. पावडे यांनी पुस्तकामागची भूमिका मांडली. संचालन डॉ. प्रदीप विटाळकर यांनी केले.

टॅग्स :literatureसाहित्य