शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांमध्ये डिप्रेशनचा धोका वाढलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:42 IST

क्रिश या अवघ्या १४ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे समाजमन ढवळून निघाले असून आधुनिक तंत्रज्ञान व जीवनशैलीमुळे बदलणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. १३-१४ वर्षाच्या मुलांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे ही धोक्याची घंटा असून पालकांनी सावधानता बाळगण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. लहान मुलांना डिप्रेशन (नैराश्य) येत नाही, हा समज खोटा असून पालकांनी मुलांच्या वर्तणुकीत होणाऱ्या बदलांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे.

ठळक मुद्देनागपुरातील क्रिशच्या आत्महत्येमुळे प्रश्न : पालकांनो मुलांच्या वर्तणुकीतील फरक ओळखा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रिश या अवघ्या १४ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे समाजमन ढवळून निघाले असून आधुनिक तंत्रज्ञान व जीवनशैलीमुळे बदलणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. १३-१४ वर्षाच्या मुलांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे ही धोक्याची घंटा असून पालकांनी सावधानता बाळगण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. लहान मुलांना डिप्रेशन (नैराश्य) येत नाही, हा समज खोटा असून पालकांनी मुलांच्या वर्तणुकीत होणाऱ्या बदलांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे.याबाबत लोकमतने शहरातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांच्याशी संवाद साधून नेमक्या कारणांची मीमांसा केली आहे. क्रिशची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्याच्या बाबतीत नेमके काय घडले, याबाबत माहीत नसल्याने त्याच्या आत्महत्येमागे काय कारण आहे ते नेमके सांगता येणार नाही. मात्र मुलांमध्ये वाढलेल्या नैराश्याचा आणि इंटरनेट सुविधेसह असलेला मोबाईल, संगणक व टीव्ही स्क्रिन अ‍ॅडीक्शनचा धोका पालकांनी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.मुलांमध्ये बालनैराश्याची शक्यतासाधारणत: ४० ते ५० वर्षापूर्वी मुलांमध्ये नैराश्य येत नाही असे समजले जायचे. मात्र आज हा समज पूर्णपणे खोटा ठरणारा आहे. ज्याप्रमाणे २० ते २५ वर्षाच्या तरुणांपासून ६० ते ७० वर्षाच्या ज्येष्ठांना नैराश्याचा आजार होण्याची शक्यता आहे, त्याप्रमाणे १२ ते १५ वर्षाच्या मुलांना बालनैराश्य (चाईल्ड डिप्रेशन)चा आजार होण्याची शक्यता आहे. किंबहुना गेल्या काही वर्षात हे प्रमाण जगभरात वाढले असून सर्वेक्षणाने ते सिद्धही झाले आहे. भारतातही हा धोका वाढला आहे. मुलांची लक्षणे प्रौढांपेक्षा वेगळी असतात. मोठी माणसे कदाचित सांगूही शकतील, पण मुले त्यांचा त्रास शब्दात व्यक्त करू शकत नाही. मात्र त्यांच्या रोजच्या दिनचर्येतून आणि वर्तणुकीतील बदलातून हा त्रास सहज लक्षात येऊ शकणारा असल्याचे डॉ. अविनाश जोशी यांनी स्पष्ट केले.कारणे आणि इतर गोष्टीघरात आईवडिलांमध्ये होणारी भांडणे किंवा घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या मानसिकेतवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याशिवाय परिसरात किंवा शाळेत मुलांनी सामूहिकपणे टार्गेट केल्यास किंवा चिडविल्यास नैराश्य येण्याची शक्यता असते. याची अनुवांशिक कारणेही असू शकतात. मोबाईल, टीव्ही स्क्रिनचे व्यसनही धोकादायक ठरणारे असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.मुलांचे नैराश्य कसे ओळखावे?मुलांच्या रोजच्या दिनचर्येतून व वर्तणुकीतून हा त्रास लक्षात येऊ शकतो. मुलांमध्ये अचानक चिडचिड वाढणे, हट्टीपणा, जेवणाच्या वेळा न सांभाळणे, झोपेचा त्रास, अभ्यास आणि शाळेकडे लक्ष नसणे, एकलकोंडेपणा वाढणे यासारखा फरक जाणवला की काहीतरी समस्या आहे, ही बाब पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे. हे एका दिवसात होत नाही तर महिने-दोन महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून त्यांचा त्रास असण्याची शक्यता आहे.१०० टक्के दूर करता येते नैराश्यगैरसमज आणि माहितीच्या अभावामुळे पालक मुलांमध्ये घडणाऱ्या बदलाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. मात्र त्यांच्या वर्तणुकीत थोडासा जरी फरक जाणवला तर पालकांनी याची गंभीरता ओळखणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांसोबत मानसोपचार तज्ज्ञांशी भेट घ्यावी. निदान जवळच्या बालरोगतज्ज्ञाचा तरी सल्ला घेणे आवश्यक आहे. यावर कौन्सिलिंग व औषधोपचार करून नैराश्यातून बाहेर काढता येते. सल्ल्यानुसार घरचे निराशाजनक वातावरण बदलल्यास मुलांना सकारात्मक करणे शक्य होते. यासाठी मुलांच्या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची भावना डॉ. जोशी यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर