शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

लहान मुलांमध्ये डिप्रेशनचा धोका वाढलाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:42 IST

क्रिश या अवघ्या १४ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे समाजमन ढवळून निघाले असून आधुनिक तंत्रज्ञान व जीवनशैलीमुळे बदलणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. १३-१४ वर्षाच्या मुलांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे ही धोक्याची घंटा असून पालकांनी सावधानता बाळगण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. लहान मुलांना डिप्रेशन (नैराश्य) येत नाही, हा समज खोटा असून पालकांनी मुलांच्या वर्तणुकीत होणाऱ्या बदलांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे.

ठळक मुद्देनागपुरातील क्रिशच्या आत्महत्येमुळे प्रश्न : पालकांनो मुलांच्या वर्तणुकीतील फरक ओळखा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्रिश या अवघ्या १४ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्यामुळे समाजमन ढवळून निघाले असून आधुनिक तंत्रज्ञान व जीवनशैलीमुळे बदलणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. १३-१४ वर्षाच्या मुलांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे ही धोक्याची घंटा असून पालकांनी सावधानता बाळगण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. लहान मुलांना डिप्रेशन (नैराश्य) येत नाही, हा समज खोटा असून पालकांनी मुलांच्या वर्तणुकीत होणाऱ्या बदलांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन मानसोपचार तज्ज्ञांनी केले आहे.याबाबत लोकमतने शहरातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांच्याशी संवाद साधून नेमक्या कारणांची मीमांसा केली आहे. क्रिशची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्याच्या बाबतीत नेमके काय घडले, याबाबत माहीत नसल्याने त्याच्या आत्महत्येमागे काय कारण आहे ते नेमके सांगता येणार नाही. मात्र मुलांमध्ये वाढलेल्या नैराश्याचा आणि इंटरनेट सुविधेसह असलेला मोबाईल, संगणक व टीव्ही स्क्रिन अ‍ॅडीक्शनचा धोका पालकांनी लक्षात घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.मुलांमध्ये बालनैराश्याची शक्यतासाधारणत: ४० ते ५० वर्षापूर्वी मुलांमध्ये नैराश्य येत नाही असे समजले जायचे. मात्र आज हा समज पूर्णपणे खोटा ठरणारा आहे. ज्याप्रमाणे २० ते २५ वर्षाच्या तरुणांपासून ६० ते ७० वर्षाच्या ज्येष्ठांना नैराश्याचा आजार होण्याची शक्यता आहे, त्याप्रमाणे १२ ते १५ वर्षाच्या मुलांना बालनैराश्य (चाईल्ड डिप्रेशन)चा आजार होण्याची शक्यता आहे. किंबहुना गेल्या काही वर्षात हे प्रमाण जगभरात वाढले असून सर्वेक्षणाने ते सिद्धही झाले आहे. भारतातही हा धोका वाढला आहे. मुलांची लक्षणे प्रौढांपेक्षा वेगळी असतात. मोठी माणसे कदाचित सांगूही शकतील, पण मुले त्यांचा त्रास शब्दात व्यक्त करू शकत नाही. मात्र त्यांच्या रोजच्या दिनचर्येतून आणि वर्तणुकीतील बदलातून हा त्रास सहज लक्षात येऊ शकणारा असल्याचे डॉ. अविनाश जोशी यांनी स्पष्ट केले.कारणे आणि इतर गोष्टीघरात आईवडिलांमध्ये होणारी भांडणे किंवा घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलांच्या मानसिकेतवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याशिवाय परिसरात किंवा शाळेत मुलांनी सामूहिकपणे टार्गेट केल्यास किंवा चिडविल्यास नैराश्य येण्याची शक्यता असते. याची अनुवांशिक कारणेही असू शकतात. मोबाईल, टीव्ही स्क्रिनचे व्यसनही धोकादायक ठरणारे असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.मुलांचे नैराश्य कसे ओळखावे?मुलांच्या रोजच्या दिनचर्येतून व वर्तणुकीतून हा त्रास लक्षात येऊ शकतो. मुलांमध्ये अचानक चिडचिड वाढणे, हट्टीपणा, जेवणाच्या वेळा न सांभाळणे, झोपेचा त्रास, अभ्यास आणि शाळेकडे लक्ष नसणे, एकलकोंडेपणा वाढणे यासारखा फरक जाणवला की काहीतरी समस्या आहे, ही बाब पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे. हे एका दिवसात होत नाही तर महिने-दोन महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून त्यांचा त्रास असण्याची शक्यता आहे.१०० टक्के दूर करता येते नैराश्यगैरसमज आणि माहितीच्या अभावामुळे पालक मुलांमध्ये घडणाऱ्या बदलाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. मात्र त्यांच्या वर्तणुकीत थोडासा जरी फरक जाणवला तर पालकांनी याची गंभीरता ओळखणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांसोबत मानसोपचार तज्ज्ञांशी भेट घ्यावी. निदान जवळच्या बालरोगतज्ज्ञाचा तरी सल्ला घेणे आवश्यक आहे. यावर कौन्सिलिंग व औषधोपचार करून नैराश्यातून बाहेर काढता येते. सल्ल्यानुसार घरचे निराशाजनक वातावरण बदलल्यास मुलांना सकारात्मक करणे शक्य होते. यासाठी मुलांच्या बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असल्याची भावना डॉ. जोशी यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर