शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

'वसुलीभाईं'च्या तटस्थ भूमिकेमुळेही गुन्हेगारीत वाढ; शस्त्र घेऊन बिनधास्त फिरतात गुन्हेगार

By नरेश डोंगरे | Updated: January 9, 2023 22:53 IST

नरेश डोंगरे ! नागपूर : सावज टिपण्यासाठी चाैकाचाैकात आडोशाला उभे राहून 'वसुलीभाईं'ची भूमीका वठविणारे वाहतूक शाखेचे पोलीसही उपराजधानीतील गुन्हेगारी ...

नरेश डोंगरे !नागपूर : सावज टिपण्यासाठी चाैकाचाैकात आडोशाला उभे राहून 'वसुलीभाईं'ची भूमीका वठविणारे वाहतूक शाखेचे पोलीसही उपराजधानीतील गुन्हेगारी वाढविण्यासाठी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा खुद्द पोलीस दलातच केली जात आहे. गुन्हेगार शस्त्र घेऊन बिनधास्त शहरातून फिरत असताना वाहतूक पोलीस मात्र तटस्थ भूमिकेत राहतात. त्यांनी दुचाकीचालकांचे लायसन्स तपासण्यासोबतच संशयितांची झडती घेतल्यास हत्या, हत्येचे प्रयत्न, यासारखे अनेक गंभीर गुन्हे टळू शकतात, असा सूरही आता उमटू लागला आहे.

शहरातील शिर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांकडून 'क्राईम कंट्रोल'साठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. मात्र, नेत्यांनी 'क्राईम कॅपिटल'चा ठपका ठेवलेल्या नागपूर शहरातील गुन्हेगारी थांबायला तयार नाही. ती वारंवार उफाळून येत आहे. विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने सरकार नागपुरात आले असताना वाडीत दोघांची हत्या करून गुन्हेगारांनी राज्यकर्त्यांना हिंसक सलामी दिली. त्यानंतर सरकार असेपर्यंत कोतुलवारची हत्या अन् हत्येच्या प्रयत्नाच्या घटना घडतच राहिल्या. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचपावलीत राजेश विनोद मेश्राम नामक तरुणाची हत्या झाली. दोन दिवसांपूर्वी कळमन्यात झालेल्या हत्येच्या घटनेची शाई वाळत नाही तोच आता पुन्हा कुख्यात घनचक्करने अविनाश जुमडे नामक गुन्हेगाराची हत्या केली. हत्येच्या या घटना सर्वसामान्यांच्या काळजात धडकी भरविणाऱ्या आहेत.

गुन्हेगारी नियंत्रणाचा दावा केला जात असला तरी गुन्हेगार मात्र अनियंत्रित असल्याचे वास्तव यातून उघड होत आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, गुन्हेगार बिनधास्त रस्त्याने घातक शस्त्रे घेऊन फिरत असताना पोलिसांना ते का दिसत नाही, असाही प्रश्न चर्चेला आला आहे. या प्रश्नामुळे गस्तीवर असणाऱ्या तसेच चाैकाचाैकात उभे राहणाऱ्या पोलिसांच्या कर्तव्यावर, सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शहरातील कोणत्याही वर्दळीच्या भागात फिरल्यास टपोरी टाईपचे तरुण बिनधोक ट्रिपल सिट फिरताना दिसतात. चाैकाचाैकात सिग्नल तोडणाऱ्या सावजाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या वाहतूक पोलिसांनी कर्तव्यनिष्ठता दाखवून त्यांची झाडाझडती घेतल्यास शहरात रोज अनेक शस्त्रधारी गुन्हेगारांची मानगुट पकडण्यास मदत होऊ शकते. मात्र, गुन्हेगारांना पकडण्याची आपली जबाबदारी नाही, असा वाहतूक पोलिसांचा अविर्भाव असतो. त्यामुळे शस्त्र घेऊन फिरणारे गुन्हेगार गाडीचा कट लागल्यामुळे किंवा रागाने पाहिल्याचे क्षुल्लक कारणावरून भर रस्त्यावर निर्दोष व्यक्तीची हत्या करताना दिसत आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांचा हा जीवघेणा तटस्थपणा आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीतही चर्चेला आला होता, हे विशेष !

ईन्स्टाग्रामवर चाकू अपलोड -कळमन्यातील हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीने दोन महिन्यापूर्वी त्याच्या ईन्स्टाग्राम अकाउंटवर चाकूचा फोटो अपलोड केला होता, अशी माहिती पुढे आली आहे. शहरातील कोणत्याच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याला गुन्हा घडण्यापूर्वी हे दिसले नाही, ही दुसरी एक धक्कादायक बाब ठरावी. 

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस