शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

'वसुलीभाईं'च्या तटस्थ भूमिकेमुळेही गुन्हेगारीत वाढ; शस्त्र घेऊन बिनधास्त फिरतात गुन्हेगार

By नरेश डोंगरे | Updated: January 9, 2023 22:53 IST

नरेश डोंगरे ! नागपूर : सावज टिपण्यासाठी चाैकाचाैकात आडोशाला उभे राहून 'वसुलीभाईं'ची भूमीका वठविणारे वाहतूक शाखेचे पोलीसही उपराजधानीतील गुन्हेगारी ...

नरेश डोंगरे !नागपूर : सावज टिपण्यासाठी चाैकाचाैकात आडोशाला उभे राहून 'वसुलीभाईं'ची भूमीका वठविणारे वाहतूक शाखेचे पोलीसही उपराजधानीतील गुन्हेगारी वाढविण्यासाठी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा खुद्द पोलीस दलातच केली जात आहे. गुन्हेगार शस्त्र घेऊन बिनधास्त शहरातून फिरत असताना वाहतूक पोलीस मात्र तटस्थ भूमिकेत राहतात. त्यांनी दुचाकीचालकांचे लायसन्स तपासण्यासोबतच संशयितांची झडती घेतल्यास हत्या, हत्येचे प्रयत्न, यासारखे अनेक गंभीर गुन्हे टळू शकतात, असा सूरही आता उमटू लागला आहे.

शहरातील शिर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांकडून 'क्राईम कंट्रोल'साठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे. मात्र, नेत्यांनी 'क्राईम कॅपिटल'चा ठपका ठेवलेल्या नागपूर शहरातील गुन्हेगारी थांबायला तयार नाही. ती वारंवार उफाळून येत आहे. विधानसभेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने सरकार नागपुरात आले असताना वाडीत दोघांची हत्या करून गुन्हेगारांनी राज्यकर्त्यांना हिंसक सलामी दिली. त्यानंतर सरकार असेपर्यंत कोतुलवारची हत्या अन् हत्येच्या प्रयत्नाच्या घटना घडतच राहिल्या. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचपावलीत राजेश विनोद मेश्राम नामक तरुणाची हत्या झाली. दोन दिवसांपूर्वी कळमन्यात झालेल्या हत्येच्या घटनेची शाई वाळत नाही तोच आता पुन्हा कुख्यात घनचक्करने अविनाश जुमडे नामक गुन्हेगाराची हत्या केली. हत्येच्या या घटना सर्वसामान्यांच्या काळजात धडकी भरविणाऱ्या आहेत.

गुन्हेगारी नियंत्रणाचा दावा केला जात असला तरी गुन्हेगार मात्र अनियंत्रित असल्याचे वास्तव यातून उघड होत आहे. अत्यंत गंभीर बाब म्हणजे, गुन्हेगार बिनधास्त रस्त्याने घातक शस्त्रे घेऊन फिरत असताना पोलिसांना ते का दिसत नाही, असाही प्रश्न चर्चेला आला आहे. या प्रश्नामुळे गस्तीवर असणाऱ्या तसेच चाैकाचाैकात उभे राहणाऱ्या पोलिसांच्या कर्तव्यावर, सतर्कतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शहरातील कोणत्याही वर्दळीच्या भागात फिरल्यास टपोरी टाईपचे तरुण बिनधोक ट्रिपल सिट फिरताना दिसतात. चाैकाचाैकात सिग्नल तोडणाऱ्या सावजाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या वाहतूक पोलिसांनी कर्तव्यनिष्ठता दाखवून त्यांची झाडाझडती घेतल्यास शहरात रोज अनेक शस्त्रधारी गुन्हेगारांची मानगुट पकडण्यास मदत होऊ शकते. मात्र, गुन्हेगारांना पकडण्याची आपली जबाबदारी नाही, असा वाहतूक पोलिसांचा अविर्भाव असतो. त्यामुळे शस्त्र घेऊन फिरणारे गुन्हेगार गाडीचा कट लागल्यामुळे किंवा रागाने पाहिल्याचे क्षुल्लक कारणावरून भर रस्त्यावर निर्दोष व्यक्तीची हत्या करताना दिसत आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांचा हा जीवघेणा तटस्थपणा आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीतही चर्चेला आला होता, हे विशेष !

ईन्स्टाग्रामवर चाकू अपलोड -कळमन्यातील हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीने दोन महिन्यापूर्वी त्याच्या ईन्स्टाग्राम अकाउंटवर चाकूचा फोटो अपलोड केला होता, अशी माहिती पुढे आली आहे. शहरातील कोणत्याच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्याला गुन्हा घडण्यापूर्वी हे दिसले नाही, ही दुसरी एक धक्कादायक बाब ठरावी. 

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस