शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

विदर्भात कुठे मुसळधार तर कुठे रिमझिम पाऊस; ब्रम्हपुरीत सर्वाधिक १४४.४ मि.मी. पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 10:27 IST

पुढचे तीन दिवस संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट

नागपूर : हवामान खात्याने संपूर्ण विदर्भात पुढचे तीन दिवस यलो अलर्ट दिला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. रविवारी दिवसभरात नागपुरातही भरपूर पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. दुसरीकडे पश्चिम विदर्भात यवतमाळ वगळता अमरावती, वर्धा येथे हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. पण रविवारी सकाळपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात १४४.४ मि.मी. करण्यात आली आहे. त्यानंतर गोंदियामध्येही ८७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

- गोंदियात २४ तासांत ६३.०३ मि.मी. पावसाची नोंद

जुलै महिना अर्धा संपत असताना आणि केलेल्या पेरण्या करपण्याच्या मार्गावर असल्याने जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष वरुणराजाच्या प्रतीक्षेत महिनाभरापासून लागले होते. अखेर महिनाभराच्या कालावधीनंतर पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने बळीराजासह जिल्हावासीय सुद्धा सुखावले आहेत. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवार (दि. १६) सकाळपर्यंत कायम राहिल्याने जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६३.०३ मिमी पाऊस झाला असून आठपैकी पाच तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पुजारीटोला धरणाचे चार व कालीसरार धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे.

पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी- बोळुंदा नाल्यावर तयार केलेला रपटा वाहून गेल्याने या दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. गडचिराेलीमध्ये रविवारी पहाटे व सकाळी बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील बहुतांश नद्या ओसंडून वाहत आहेत. वैनगंगा, गाेदावरी, वर्धा या नद्यांमध्येही धरणाचे पाणी साेडल्याने या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दमदार पावसामुळे धान राेवणीच्या कामांना वेग आला आहे.

- यवतमाळात मुसळधार, अमरावतीत तूट

अमरावती जिल्ह्यात अजूनही सरासरीच्या तुलनेत २८ टक्के पावसाची तूट आहे. २४ तासांत सरासरी ३.३ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत २८८ मिमी पावसाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात २०७ मिमी पाऊस झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत ११ मंडळांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे शेतजमीन खरडून गेली. यात शेतातील उभे पीकही वाहून गेले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. अतिवृष्टीने लोही, कलगाव, तुपटाकळी, मालखेड खु., पांढरकवडा, पाटणबोरी, पहापळ आणि घोटी या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या ठिकाणी एकाच दिवशी ६५ ते ९७ मिमी पावसाची नोंद काही तासांत करण्यात आली. रविवारी सकाळपासूनच पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यात २४ तासांत ढगाळ वातावरण होते. पावसाच्या नाममात्र सरी बरसल्या. पण मुसळधार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे.

नागभीड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग झाला होता बंद

जिल्ह्यात शनिवारी रात्री तसेच रविवारी सकाळी सर्वदूर पाऊस कोसळला. दरम्यान, नागभीड, सिंदेवाही, चिमूर तालुक्यांतील काही रस्ते बंद झाल्याने अनेक गावांतील संपर्क तुटला. बाह्मणी नाल्यावरील पुरामुळे नागपूर-नागभीड मार्ग रविवारी सकाळी ६ वाजता बंद झाला. यामुळे या मार्गाने प्रवास करणारे शेकडो प्रवासी बाह्मणीत अडकले होते. तळोधी- बाळापूर हा मार्गही बंद झाला. नवेगाव पांडव फाट्यावरून बाळापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वेच्या बोगद्यात पाणी साचून असल्याने बाळापूर मार्ग दिवसभर बंद होता. सिंदेवाही तालुक्यातील नदीला, नाल्यांना आलेल्या पुरामुळे सिंदेवाहीकडून जाणारा रामाळा, गडबोरी, वासेरा मार्ग बंद झाला. तालुक्याचा १५ गावांचा संपर्क तुटला होता.

गोसेखुर्द धरणाचे ३१ दरवाजे उघडले

भंडारा जिल्ह्यात गेल्या ३६ तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गोसेखुर्द धरणाचे ३१ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणweatherहवामानRainपाऊसVidarbhaविदर्भ