शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

विदर्भात कुठे मुसळधार तर कुठे रिमझिम पाऊस; ब्रम्हपुरीत सर्वाधिक १४४.४ मि.मी. पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 10:27 IST

पुढचे तीन दिवस संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट

नागपूर : हवामान खात्याने संपूर्ण विदर्भात पुढचे तीन दिवस यलो अलर्ट दिला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून पूर्व विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. रविवारी दिवसभरात नागपुरातही भरपूर पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. दुसरीकडे पश्चिम विदर्भात यवतमाळ वगळता अमरावती, वर्धा येथे हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. पण रविवारी सकाळपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात १४४.४ मि.मी. करण्यात आली आहे. त्यानंतर गोंदियामध्येही ८७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

- गोंदियात २४ तासांत ६३.०३ मि.मी. पावसाची नोंद

जुलै महिना अर्धा संपत असताना आणि केलेल्या पेरण्या करपण्याच्या मार्गावर असल्याने जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष वरुणराजाच्या प्रतीक्षेत महिनाभरापासून लागले होते. अखेर महिनाभराच्या कालावधीनंतर पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने बळीराजासह जिल्हावासीय सुद्धा सुखावले आहेत. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवार (दि. १६) सकाळपर्यंत कायम राहिल्याने जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ६३.०३ मिमी पाऊस झाला असून आठपैकी पाच तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने पुजारीटोला धरणाचे चार व कालीसरार धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे.

पावसामुळे सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी- बोळुंदा नाल्यावर तयार केलेला रपटा वाहून गेल्याने या दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता. गडचिराेलीमध्ये रविवारी पहाटे व सकाळी बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील बहुतांश नद्या ओसंडून वाहत आहेत. वैनगंगा, गाेदावरी, वर्धा या नद्यांमध्येही धरणाचे पाणी साेडल्याने या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दमदार पावसामुळे धान राेवणीच्या कामांना वेग आला आहे.

- यवतमाळात मुसळधार, अमरावतीत तूट

अमरावती जिल्ह्यात अजूनही सरासरीच्या तुलनेत २८ टक्के पावसाची तूट आहे. २४ तासांत सरासरी ३.३ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत २८८ मिमी पावसाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात २०७ मिमी पाऊस झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत ११ मंडळांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे शेतजमीन खरडून गेली. यात शेतातील उभे पीकही वाहून गेले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी पिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. अतिवृष्टीने लोही, कलगाव, तुपटाकळी, मालखेड खु., पांढरकवडा, पाटणबोरी, पहापळ आणि घोटी या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या ठिकाणी एकाच दिवशी ६५ ते ९७ मिमी पावसाची नोंद काही तासांत करण्यात आली. रविवारी सकाळपासूनच पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यात २४ तासांत ढगाळ वातावरण होते. पावसाच्या नाममात्र सरी बरसल्या. पण मुसळधार पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना प्रतीक्षा आहे.

नागभीड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग झाला होता बंद

जिल्ह्यात शनिवारी रात्री तसेच रविवारी सकाळी सर्वदूर पाऊस कोसळला. दरम्यान, नागभीड, सिंदेवाही, चिमूर तालुक्यांतील काही रस्ते बंद झाल्याने अनेक गावांतील संपर्क तुटला. बाह्मणी नाल्यावरील पुरामुळे नागपूर-नागभीड मार्ग रविवारी सकाळी ६ वाजता बंद झाला. यामुळे या मार्गाने प्रवास करणारे शेकडो प्रवासी बाह्मणीत अडकले होते. तळोधी- बाळापूर हा मार्गही बंद झाला. नवेगाव पांडव फाट्यावरून बाळापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वेच्या बोगद्यात पाणी साचून असल्याने बाळापूर मार्ग दिवसभर बंद होता. सिंदेवाही तालुक्यातील नदीला, नाल्यांना आलेल्या पुरामुळे सिंदेवाहीकडून जाणारा रामाळा, गडबोरी, वासेरा मार्ग बंद झाला. तालुक्याचा १५ गावांचा संपर्क तुटला होता.

गोसेखुर्द धरणाचे ३१ दरवाजे उघडले

भंडारा जिल्ह्यात गेल्या ३६ तासांपासून पावसाची संततधार सुरू आहे. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. गोसेखुर्द धरणाचे ३१ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

टॅग्स :environmentपर्यावरणweatherहवामानRainपाऊसVidarbhaविदर्भ