शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
TATA Stock Listing: आधी डिमर्जर, मग नाव बदललं, आता टाटांच्या 'या' कंपनीची शेअर बाजारात होणार एन्ट्री; उद्या लिस्टिंग
4
१८ वर्षांनंतर निठारी हत्याकांडात मोठा निर्णय; एका प्रकरणातही कोली दोषी नाही, कोर्टाकडून फाशीची शिक्षा रद्द
5
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
6
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
7
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
8
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
9
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
10
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
11
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
12
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
13
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
14
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
15
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
16
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
17
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
18
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
19
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
20
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम

नागपूर जिल्ह्यात संत्रा, मोसंबीने शेतकऱ्यांना केले मालामाल; वातावरणाचा उत्पादनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2023 20:26 IST

Nagpur News वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, वाढते तापमान यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी काही शेतकऱ्यांनी उच्चांकी उत्पादनदेखील घेतल्याचे वास्तव आहे.

नागपूर :  जिल्ह्यात २९,३५२ हेक्टरवर फलोत्पादन घेतले जाते. यामध्ये सर्वाधिक २१,९७३ हेक्टरमध्ये संत्र्याचे उत्पादन आहे. वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, वाढते तापमान यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी काही शेतकऱ्यांनी उच्चांकी उत्पादनदेखील घेतल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यात जिरायती क्षेत्र किमान ८० टक्के आहे. त्यामुळे उर्वरित २० टक्के क्षेत्रात बहुवार्षिक तसेच फळपिकांचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये सर्वाधिक २१ हजार हेक्टरमध्ये संत्र्याचे क्षेत्र आहे. याशिवाय मोसंबी, केळी, कागदी लिंबू, आंबा, डाळींबाचेही उत्पादन शेतकरी घेतात. मात्र, सर्वाधिक कल हा संत्रा व त्यापाठोपाठ मोसंबीकडे आहे. त्यामध्येही काटोल, नरखेड, कळमेश्वर व सावनेर या चार तालुक्यांत प्रामुख्याने संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. संरक्षित सिंचनासाठी विहीर, त्यानंतर सूक्ष्म सिंचनासाठी सुविधा, फळबाग लागवडीसाठी कलमा, याशिवाय जुन्या संत्रा बागांच्या पुनरूज्जीवनासाठी शासन अनुदान देते.

सर्वाधिक क्षेत्र संत्र्याचे

जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्र संत्र्याचे आहे. वातावरण संत्र्यासाठी पोषक असल्याने दोन बहर, विविध योजनांचा लाभ यामुळे संत्रा व मोसंबीचे क्षेत्र वाढत आहे.

विदेशातही निर्यात

संत्र्याची सर्वाधिक निर्यात बांगलादेशमध्ये केली जाते. अलीकडे तेथील सरकारने संत्र्यावरील आयात कर वाढविल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याचा निर्यातीवर परिणाम झाला आहे.

 

केंद्राने बांगलादेशातील शुल्क कमी करावे

विदर्भात उत्पादित होणारा ‘ए’ ग्रेडचा संत्रा बांगलादेशला निर्यात केला जातो. बांगलादेश भारतीय संत्र्यावर आयात शुल्क प्रति किलो ६२ रुपये आकारत होता. आता ते प्रति किलाे ८५ रुपये केले आहे. त्यामुळे वैदर्भीय संत्रा बांगलादेशात महाग झाला आहे. याचा निर्यातीवर परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने बांगलादेश सरकारसोबत बोलून भारतीय संत्र्यावरील आयात शुल्क कमी करावे, अशी संत्रा उत्पादकांची मागणी आहे.

- मान्सून लांबल्याचा परिणाम संत्राच्या मृग बहरावर झाला आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. आंबिया बहर चांगला आला. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के कमीच आहे. त्यामुळे भाव चांगला मिळेल. विदर्भातील संत्रा बांगलादेशला निर्यात केला जातो. मात्र, बांगलादेशने भारतीय संत्र्यावर आयात शुल्कात प्रति किलो तब्बल २३ रुपयांनी वाढ केली आहे. यात केंद्राने हस्तक्षेप करून शुल्क कमी करण्याची गरज आहे.

- मनोज जवंजाळ, संचालक, महाऑरेंज

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र