शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपूर जिल्ह्यात संत्रा, मोसंबीने शेतकऱ्यांना केले मालामाल; वातावरणाचा उत्पादनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2023 20:26 IST

Nagpur News वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, वाढते तापमान यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी काही शेतकऱ्यांनी उच्चांकी उत्पादनदेखील घेतल्याचे वास्तव आहे.

नागपूर :  जिल्ह्यात २९,३५२ हेक्टरवर फलोत्पादन घेतले जाते. यामध्ये सर्वाधिक २१,९७३ हेक्टरमध्ये संत्र्याचे उत्पादन आहे. वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, वाढते तापमान यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी काही शेतकऱ्यांनी उच्चांकी उत्पादनदेखील घेतल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यात जिरायती क्षेत्र किमान ८० टक्के आहे. त्यामुळे उर्वरित २० टक्के क्षेत्रात बहुवार्षिक तसेच फळपिकांचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये सर्वाधिक २१ हजार हेक्टरमध्ये संत्र्याचे क्षेत्र आहे. याशिवाय मोसंबी, केळी, कागदी लिंबू, आंबा, डाळींबाचेही उत्पादन शेतकरी घेतात. मात्र, सर्वाधिक कल हा संत्रा व त्यापाठोपाठ मोसंबीकडे आहे. त्यामध्येही काटोल, नरखेड, कळमेश्वर व सावनेर या चार तालुक्यांत प्रामुख्याने संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. संरक्षित सिंचनासाठी विहीर, त्यानंतर सूक्ष्म सिंचनासाठी सुविधा, फळबाग लागवडीसाठी कलमा, याशिवाय जुन्या संत्रा बागांच्या पुनरूज्जीवनासाठी शासन अनुदान देते.

सर्वाधिक क्षेत्र संत्र्याचे

जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्र संत्र्याचे आहे. वातावरण संत्र्यासाठी पोषक असल्याने दोन बहर, विविध योजनांचा लाभ यामुळे संत्रा व मोसंबीचे क्षेत्र वाढत आहे.

विदेशातही निर्यात

संत्र्याची सर्वाधिक निर्यात बांगलादेशमध्ये केली जाते. अलीकडे तेथील सरकारने संत्र्यावरील आयात कर वाढविल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याचा निर्यातीवर परिणाम झाला आहे.

 

केंद्राने बांगलादेशातील शुल्क कमी करावे

विदर्भात उत्पादित होणारा ‘ए’ ग्रेडचा संत्रा बांगलादेशला निर्यात केला जातो. बांगलादेश भारतीय संत्र्यावर आयात शुल्क प्रति किलो ६२ रुपये आकारत होता. आता ते प्रति किलाे ८५ रुपये केले आहे. त्यामुळे वैदर्भीय संत्रा बांगलादेशात महाग झाला आहे. याचा निर्यातीवर परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने बांगलादेश सरकारसोबत बोलून भारतीय संत्र्यावरील आयात शुल्क कमी करावे, अशी संत्रा उत्पादकांची मागणी आहे.

- मान्सून लांबल्याचा परिणाम संत्राच्या मृग बहरावर झाला आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. आंबिया बहर चांगला आला. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के कमीच आहे. त्यामुळे भाव चांगला मिळेल. विदर्भातील संत्रा बांगलादेशला निर्यात केला जातो. मात्र, बांगलादेशने भारतीय संत्र्यावर आयात शुल्कात प्रति किलो तब्बल २३ रुपयांनी वाढ केली आहे. यात केंद्राने हस्तक्षेप करून शुल्क कमी करण्याची गरज आहे.

- मनोज जवंजाळ, संचालक, महाऑरेंज

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र