शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात संत्रा, मोसंबीने शेतकऱ्यांना केले मालामाल; वातावरणाचा उत्पादनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2023 20:26 IST

Nagpur News वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, वाढते तापमान यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी काही शेतकऱ्यांनी उच्चांकी उत्पादनदेखील घेतल्याचे वास्तव आहे.

नागपूर :  जिल्ह्यात २९,३५२ हेक्टरवर फलोत्पादन घेतले जाते. यामध्ये सर्वाधिक २१,९७३ हेक्टरमध्ये संत्र्याचे उत्पादन आहे. वातावरणातील बदल, अवकाळी पाऊस, वाढते तापमान यामुळे संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी काही शेतकऱ्यांनी उच्चांकी उत्पादनदेखील घेतल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यात जिरायती क्षेत्र किमान ८० टक्के आहे. त्यामुळे उर्वरित २० टक्के क्षेत्रात बहुवार्षिक तसेच फळपिकांचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये सर्वाधिक २१ हजार हेक्टरमध्ये संत्र्याचे क्षेत्र आहे. याशिवाय मोसंबी, केळी, कागदी लिंबू, आंबा, डाळींबाचेही उत्पादन शेतकरी घेतात. मात्र, सर्वाधिक कल हा संत्रा व त्यापाठोपाठ मोसंबीकडे आहे. त्यामध्येही काटोल, नरखेड, कळमेश्वर व सावनेर या चार तालुक्यांत प्रामुख्याने संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. संरक्षित सिंचनासाठी विहीर, त्यानंतर सूक्ष्म सिंचनासाठी सुविधा, फळबाग लागवडीसाठी कलमा, याशिवाय जुन्या संत्रा बागांच्या पुनरूज्जीवनासाठी शासन अनुदान देते.

सर्वाधिक क्षेत्र संत्र्याचे

जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्र संत्र्याचे आहे. वातावरण संत्र्यासाठी पोषक असल्याने दोन बहर, विविध योजनांचा लाभ यामुळे संत्रा व मोसंबीचे क्षेत्र वाढत आहे.

विदेशातही निर्यात

संत्र्याची सर्वाधिक निर्यात बांगलादेशमध्ये केली जाते. अलीकडे तेथील सरकारने संत्र्यावरील आयात कर वाढविल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. याचा निर्यातीवर परिणाम झाला आहे.

 

केंद्राने बांगलादेशातील शुल्क कमी करावे

विदर्भात उत्पादित होणारा ‘ए’ ग्रेडचा संत्रा बांगलादेशला निर्यात केला जातो. बांगलादेश भारतीय संत्र्यावर आयात शुल्क प्रति किलो ६२ रुपये आकारत होता. आता ते प्रति किलाे ८५ रुपये केले आहे. त्यामुळे वैदर्भीय संत्रा बांगलादेशात महाग झाला आहे. याचा निर्यातीवर परिणाम झाला आहे. केंद्र सरकारने बांगलादेश सरकारसोबत बोलून भारतीय संत्र्यावरील आयात शुल्क कमी करावे, अशी संत्रा उत्पादकांची मागणी आहे.

- मान्सून लांबल्याचा परिणाम संत्राच्या मृग बहरावर झाला आहे. शेतकरी पावसाची वाट पाहत आहे. आंबिया बहर चांगला आला. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के कमीच आहे. त्यामुळे भाव चांगला मिळेल. विदर्भातील संत्रा बांगलादेशला निर्यात केला जातो. मात्र, बांगलादेशने भारतीय संत्र्यावर आयात शुल्कात प्रति किलो तब्बल २३ रुपयांनी वाढ केली आहे. यात केंद्राने हस्तक्षेप करून शुल्क कमी करण्याची गरज आहे.

- मनोज जवंजाळ, संचालक, महाऑरेंज

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र