शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

शिक्षेपेक्षा तरुणांना गुन्हेगारीपासून दूर ठेवणे महत्त्वाचे : पोलीस आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:08 IST

तरुण पिढीमध्ये नैतिकता आणि सामाजिक दायित्वाची भावना कमी होत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे त्यांची वाटचाल वाढत आहे. त्यामुळे ते ड्रग्स, मादक पदार्थांचे सेवन व तस्करी तसेच सायबर गुन्हेगारीकडे वळत आहेत. समाजासाठी हे धोक्याचे संकेत आहेत. मात्र वाममार्गाकडे वळणाऱ्या तरुणांना दंडात्मक कारवाई व शिक्षा देण्यापेक्षा त्यांना गुन्हेगारीपासून दूर ठेवणे अधिक महत्त्वाचे असून, तेच आमचे ध्येय असल्याची ग्वाही शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.

ठळक मुद्दे‘छात्र पोलीस’ संकल्पनेशी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जोडणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तरुण पिढीमध्ये नैतिकता आणि सामाजिक दायित्वाची भावना कमी होत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीकडे त्यांची वाटचाल वाढत आहे. त्यामुळे ते ड्रग्स, मादक पदार्थांचे सेवन व तस्करी तसेच सायबर गुन्हेगारीकडे वळत आहेत. समाजासाठी हे धोक्याचे संकेत आहेत. मात्र वाममार्गाकडे वळणाऱ्या तरुणांना दंडात्मक कारवाई व शिक्षा देण्यापेक्षा त्यांना गुन्हेगारीपासून दूर ठेवणे अधिक महत्त्वाचे असून, तेच आमचे ध्येय असल्याची ग्वाही शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.तरुण पिढीला गुन्हेगारीपासून परावृत्त करून सजग आणि सतर्क नागरिक बनविण्याच्या दृष्टीने शहर पोलीस विभागातर्फे महत्त्वाची ‘छात्र पोलीस’ संकल्पना राबविण्यात येत असून, या संकल्पनेचा शुभारंभ बुधवारी पोलीस आयुक्त ांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश पांडे, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अपर आयुक्त बी.जी. गायकर, कॉलेजचे महासचिव गोविंद अग्रवाल, सचिव राजेंद्र पुरोहित, मैत्री परिवाराचे चंदू पेंडके तथा महामेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. उपाध्याय पुढे म्हणाले, तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करणे ही आमची जबाबदारी आहे. प्रबोधनात मोठी शक्ती असते व या माध्यमातून तरुणांना व विशेषत: विद्यार्थ्यांना गुन्हेगारीच्या दुष्परिणामाबाबत जागृत केले जाऊ शकते. गुन्हेगारीच्या गर्तेत अडकल्याने आपले करिअर नष्ट होईल आणि आपल्याला विदेशातही जाण्याची शक्यता बंद होईल, ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये झाल्यास ते गुन्हेगारीपासून स्वत:च दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.डॉ. उपाध्याय यांनी सांगितले, राज्यात दरवर्षी ११ हजार नागरिकांचा रस्ते अपघातात बळी जातो. यामध्ये १६ ते ३५ वर्षे वयोगटातील लोकांची संख्या ८० टक्के असून, हा आकडा भयावह आहे. बहुतेक अपघात हे मानवी चुकींमुळे होतात. विद्यार्थ्यांना जागृत करून यातील १० ते १५ टक्के मृत्यू टाळले जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना गुन्हेगारीपासून, नशेच्या सेवनापासून दूर करणे, वाहतूक नियम आणि दहशतवादाबाबत जागृत करण्यासाठी छात्र पोलीस अभियानाचा आरंभ करण्यात आला असून, ही संकल्पना संपूर्ण देशात राबविण्याची ग्वाही पोलीस आयुक्तांनी यावेळी दिली. यापूर्वी मिशन मृत्युंजय अभियान राबविण्यात आले होते व यासोबत सव्वा लाख विद्यार्थ्यांना जोडण्यात आले होते.नंतर हे अभियान राज्यभरात लागू करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डीसीपी राहुल माणकीकर व संचालन निरीक्षक नरेंद्र हिवरे यांनी केले. डीसीपी संभाजी कदम यांनी आभार मानले.महाविद्यालयात दाखविणार सीडीया अभियानांतर्गत नित्यानंद तिवारी यांच्या दिग्दर्शनात वाहतूक, गुन्हेगारीचा विळखा, ड्रग्स अ‍ॅडिक्शन व दहशतवाद याबाबत जागृती करणारी फिल्म तयार करण्यात आली असून, यामध्ये स्वप्निल राऊत व इतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अभिनय केला आहे. कॉलेजच्या परिसरातच याचे चित्रीकरण करण्यात आले. ही सीडी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय व चित्रपटगृहात दाखविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीPoliceपोलिस