शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींमध्ये धनगरांना सामावल्यास रस्त्यावर उतरेन

By admin | Updated: April 27, 2015 02:26 IST

आदिवासींमध्ये कोणत्याही परिस्थितीत धनगरांचा समावेश होऊ देणार नाही आणि शासनाने हा निर्णय घेतलाच तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ...

नागपूर : आदिवासींमध्ये कोणत्याही परिस्थितीत धनगरांचा समावेश होऊ देणार नाही आणि शासनाने हा निर्णय घेतलाच तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन समाजबांधवांसोबत रस्त्यावर उतरेन अशी ग्वाही आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंबरीश आत्राम यांनी दिली.आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन व नॅशनल आदिवासी पीपल्स, महिला, युवक, विद्यार्थी फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी मानकापूर येथील क्रीडा संकुलात ३६ वे एक दिवसीय महाधिवेशन आयोजित करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अन्य उपस्थित प्रमुख अतिथींमध्ये प्रामुख्याने आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार राजीव तोडसाम, आमदार संजय पुराम, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजे वासुदेवशहा टेकाम यांचा समावेश होता. नॅशनल आदिवासी पीपल्स, महिला, युवक, विद्यार्थी फेडरेशनचे केंद्रीय अध्यक्ष दिलीप मडावी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.आत्राम पुढे म्हणाले, जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना आदिवासी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अधिकारी गैरव्यवहार करून बोगस वैधता प्रमाणपत्रे वितरित करीत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे वैधता प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. वडिलांकडे वैधता प्रमाणपत्र असल्यास मुलांना कोणत्याही कागदपत्राशिवाय वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यापुढे गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याचा निर्णय विचाराधीन आहे.या शासनाने आदिवासी समाजाच्या विकासाकरिता अर्थसंकल्पामध्ये नऊ टक्के निधीची तरतूद केली आहे. परिणामी आदिवासी समाजाला पाच हजार कोटी रुपये मिळणार आहेत. आदिवासींच्या योजनेतील भ्रष्टाचार थांबविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. शासकीय योजनेच्या लाभापासून एकही आदिवासी वंचित रहायला नको. आदिवासी कोणापेक्षाही कमी नसून संधी मिळाल्यास ते सर्वांच्या पुढे निघून जातील, असा विश्वास व्यक्त करून नागपुरात सर्वांत मोठे आदिवासी समाज भवन बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आत्राम यांनी दिले.सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्मरणिका व पारंपरिक गीतांच्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले. मधुकर उईके यांनी प्रस्ताविक तर, सुधाकर मडावी यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)