शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

...तर देवाच्या दारी नाही गेले तरी चालेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 12:47 AM

भगवंताच्या दारात प्रत्येकजण जातो. पण तो शरीराने देवालयात असतो. मात्र त्याचे मन, चिंतन, स्मरण हे संसारात सुरू असते. भगवंताच्या दारात रोज जाऊनही मन, चिंतन जर दुसरीकडे असेल, तर भगवंत त्याचे काय समाधान करणार. त्यापेक्षा शरीर प्रपंचात ठेवून मन भगवंताच्या चिंतनात असेल, तर त्याने देवाच्या दारी नाही गेले तरी चालेल. कारण ज्याचे मन परमार्थस्वरुप झाले आहे, त्याला देवळात जाऊन फायदाही नाही, असा बोध हभप चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी आपल्या प्रवचनातून दिला.

ठळक मुद्देह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भगवंताच्या दारात प्रत्येकजण जातो. पण तो शरीराने देवालयात असतो. मात्र त्याचे मन, चिंतन, स्मरण हे संसारात सुरू असते. भगवंताच्या दारात रोज जाऊनही मन, चिंतन जर दुसरीकडे असेल, तर भगवंत त्याचे काय समाधान करणार. त्यापेक्षा शरीर प्रपंचात ठेवून मन भगवंताच्या चिंतनात असेल, तर त्याने देवाच्या दारी नाही गेले तरी चालेल. कारण ज्याचे मन परमार्थस्वरुप झाले आहे, त्याला देवळात जाऊन फायदाही नाही, असा बोध हभप चैतन्यमहाराज देगलूरकर यांनी आपल्या प्रवचनातून दिला.सद्गुरू श्री धुंडामहाराज व मातोश्री कृष्णामाई यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित पाचव्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या दिवशी हभप श्री चैतन्यमहाराज देगलूरकर, श्री क्षेत्र पंढरपूर यांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या हरिपाठातील अभंगावर विस्तृत विवेचन केले. सायंटिफिक सभागृहात सुरु असलेल्या प्रवचनमालेचे आयोजन एकनाथ चौधरी व मंदा चौधरी परिवारातर्फे करण्यात आले आहे. दुसºया दिवशी प्रवचनमालेच्या सुरुवातीला रूपाली व सचिन बक्षी यांनी अभंग गायले. प्रवचनाच्या सुरुवातीला महाराज म्हणाले की, हरीपाठ ज्ञानेश्वर महाराजांची विशेष रचना आहे. मानवी जीवनाच्या कल्याणाकरिता त्यांनी हरीपाठ मांडला आहे. हरीपाठाला उपासनेचे आणि अभ्यासाचे मूल्य आहे. हरीपाठ ऐकताना त्यातून प्रकट झालेले प्रमेय, सद्उपदेश, वाच्यार्थ, लक्षार्थ याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यावेळी त्यांनी हरीपाठातील पहिल्या अभंगाच्या ओवीचा विस्तृत पाठ मांडला. देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधिलिया..., महाराज म्हणाले की, ज्ञानेश्वर माऊलीच्या या ओवीतून मोक्षप्राप्तीचा ध्यास मानवाला दिला आहे. पण अनेकांना मोक्षच माहिती नाही. ते म्हणतात की दु:खाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. महाराज म्हणाले की मोक्ष प्राप्तीसाठी देवाचिया दारी क्षणभर उभे राहा. पण उभे राहताना शरीरानेच नाही तर मनात, चिंतनात आणि स्मरणात त्या भगवंताला ठेवा. तरच मोक्षाची प्राप्ती होऊ शकते.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक