शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

"देवाला भेटलो, तर अभिमानाने सांगेन.. " जगातील सर्वोच्च शिखरे सर करणाऱ्या पोलिसाच्या जिद्दीची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:24 IST

Nagpur : काही माणसं केवळ आपलं कर्तव्य पार पाडत नाहीत, तर त्यापलीकडे जाऊन अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांनाही करतात. सोलापूर स्पर्श जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून घडलेला एक तरुण... पोलिस सेवेत कार्यरत राहतानाच त्याने अदम्य साहसाने हिमालयाच्या गगनाला भिडणाऱ्या शिखरांवर पाऊल ठेवले.

सुमेध वाघमारेनागपूर : माउंट एव्हरेस्ट, माउंट मकालु, माउंट मानसलू आणि माउंट ल्होत्से यांसारख्या बर्फाळ शिखरांवर तिरंगा फडकवून त्यांनी केवळ स्वतःची स्वप्नं पूर्ण केली नाहीत, तर महाराष्ट्र पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. शिवाजी ननवरे यांचा जन्म एका सामान्य वारकरी कुटुंबात झाला. शिक्षण पूर्ण करून २००५ मध्ये ते पुणे पोलिस दलात शिपाई म्हणून रुजू झाले. २०१३ मध्ये त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून पोलिस उपनिरीक्षकपद मिळवले. गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करताना त्यांच्या मनात पर्वतारोहणाची बीजे रोवली गेली. सन २०२० मध्ये त्यांनी लेह-लडाखमधील रकांग यात्से-३ (६२५० मी.) हे शिखर यशस्वीरीत्या सर केले. यानंतर त्यांनी मनालीतील अटलबिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूटमध्ये पर्वतारोहणाचा 'अ' श्रेणीचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

काही माणसं केवळ आपलं कर्तव्य पार पाडत नाहीत, तर त्यापलीकडे जाऊन अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांनाही करतात. सोलापूर स्पर्श जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून घडलेला एक तरुण... पोलिस सेवेत कार्यरत राहतानाच त्याने अदम्य साहसाने हिमालयाच्या गगनाला भिडणाऱ्या शिखरांवर पाऊल ठेवले. सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी ननवरे यांची ही कहाणी केवळ एक पोलिस अधिकारी म्हणून केलेल्या कामगिरीपुरती मर्यादित नाही; ती आहे जिद्दीची आणि प्रेरणेची गाथा.

पोलिस आयुक्तांचा पाठिंबा

  • या सर्व खडतर प्रवासात त्यांना त्यांच्या कुटुंबाचा मोठा हातभार होता. त्यांची नऊ वर्षांची मुलगी देवयानीने तर त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकत एव्हरेस्ट बेस कॅम्प (५,३६४ मी.) सर केले आहे.
  • शिवाजी ननवरे यांच्या या प्रवासाला नागपूरचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्यासह राहुल माकणीकर, एसीपी अभिजित पाटील यांसारख्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.
  • आज ३०० हून अधिक पुरस्कार आणि अनेक यशस्वी मोहिमांच्या जोरावर ननवरे 'तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारा'कडे डोळे लावून आहेत.

 

८,००० मीटरवरील चार शिखरे : एक नवीन इतिहासशिवाजी ननवरे हे १७ मे २०२३ रोजी ३९ दिवसांच्या खडतर मोहिमेनंतर जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (८,८४८.८६मी.) सर करणारे सोलापूर जिल्ह्यातील पहिले व्यक्ती ठरले. ३० मे २०२४ रोजी ५५ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी माउंट मकालू (८,४८५ मी.) शिखरावर तिरंगा फडकावला. २४ सप्टेंबर २०२४ रोजी जगातील आठवे सर्वोच्च शिखर माउंट मानसलू (८, १६३ मी) त्यांनी सर केले. २३ मे २०२५ रोजी त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला, जेव्हा त्यांनी एव्हरेस्टसारखीच आव्हाने असलेल्या माउंट ल्होत्से (८,५१६ मी.) शिखराला गवसणी घातली. ही सर्व शिखरे त्यांनी आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांच्या टीममध्ये एकमेव भारतीय म्हणून सर केली.

"तुमची पार्श्वभूमी काहीही असो, जर तुमच्या मनात ध्येय असेल आणि त्याला गवसणी घालण्याची जिद्द असेल, तर तुम्ही कोणतेही शिखर गाठू शकता. जर कधी देवाला भेटलो, तर अभिमानाने सांगेन की, तू निर्माण केलेल्या या जगातील सर्वांत उंच शिखरावर मी पाऊल ठेवले आहे."- शिवाजी ननवरे, सहायक पोलिस निरीक्षक, नागपूर

टॅग्स :nagpurनागपूर