शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

coronavirus; शहर स्वच्छ तर आपले आरोग्य चांगले; कचरा स्वत:च साफ करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 10:48 IST

परिसर स्वच्छ असेल तर आरोग्य चांगले राहील, अन्यथा दुर्गंधी व घाणीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागेल.

ठळक मुद्देकुटुंबीयांच्या आरोग्यासाठी घर व परिसर स्वच्छ ठेवा सार्वजनिक ठिकाणी वा दुसऱ्याच्या घराजवळ कचरा टाकू नका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाची देशभरात दहशत पसरली आहे. बचावासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनाही खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे’ म्हणीनुसार स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व गोष्टी स्वच्छ असायला पाहिजेत. त्याची सवय प्रत्येकाला असायला हवी. तरच आपले शहर स्वच्छ व सुंदर होईल. आरोग्य चांगले राहील. आपले घर, परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पण काही मोजके नागरिक सोडले तर किती जण ही जबाबदारी पार पाडतात? याचा प्रत्येकाने विचार करण्याची वेळ आली आहे.साफसफाई करण्याची महापालिकेची जबाबदारी आहेच. सार्वजनिक ठिकाणी कचरा पडून दिसला की, सफाई कर्मचारी येत नसल्याची महापालिकेकडे तक्रार केली जाते. ती केलीच पाहिजे, पण आपल्या घरातील कचरा कचरागाडीत टाकतो का? घराचा परिसर स्वच्छ ठेवतो का याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. परिसर स्वच्छ असेल तर आरोग्य चांगले राहील, अन्यथा दुर्गंधी व घाणीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागेल.अनेक जण शिल्लक अन्न घराच्या आजूबाजूला टाकतात. काही तर शेजाऱ्यांच्या ओट्यावर टाकतात. घरातील कचरा, कचरागाडीत न टाकता उघड्यावर फेकतात. यामुळे कचरा फेकणाऱ्यांसोबतच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. बहुमजली इमारतीत वरच्या माळ्यावरील महिला खिडकीतून कचरा खाली फेकतात. यामुळे खाली राहणाऱ्यांना त्रास होतो. अनेकदा तक्रार करूनही सवयी बदललेल्या जात नाही. परंतु यामुळे शेजाऱ्यांसोबतच कचरा फेकणाऱ्यांच्या आरोग्याला तितकाच धोका असतो. मात्र कचरा फेकणाऱ्यांना याचा विसर पडला आहे.

तक्रार करा, दंड होईलसार्वजनिक ठिकाणी, घराच्या आजूबाजूला अनेकजण कचरा टाकतात. घरातील शिळे अन्न आजूबाजूला टाकले जाते. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. असा प्रकार निदर्शनास आल्यास झोन कार्यालयाकडे तक्रार करा, दोषींवर दंडात्मक कारवाई केली जाईल. ओला आणि सुका कचरा विलग करूच द्यावा, हाऊ सिंग सोसायट्यांनी ओल्या कचºयाची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. त्यांनी यापासून कंपोस्ट खत तयार करावे. शहर स्वच्छतेसाठी तसेच आरोग्यासाठी नागरिकांनी घर व परिसर स्वच्छ ठेवावा. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये.- डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता)

ओला व सुका कचरा वेगळा कराओला आणि सुका कचरा विलग करून कचरागाडीत टाकला तर त्यावर प्रक्रिया करणे सोयीचे जाते. ओला आणि सुक्या कचऱ्याचे घरच्या घरीच योग्य व्यवस्थापन झाले तर कचऱ्याचे ढीगच्या ढीग डम्पिंगला जाणार नाहीत. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही.हे करता येणे शक्य आहे...घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती सहज शक्य आहे. मोठ्या सोसायट्यांमध्ये आयताकृती सिमेंटचे खड्डे तयार करून त्यात सोसायटीतील ओला कचरा दिवसांप्रमाणे त्यात टाका, त्यापासून चांगले खत तयार होईल.

मास्क कुठेही टाकू नकासंसर्ग होऊ नये यासाठी नागरिक मास्क वापरत आहेत. वापरलेल्या मास्कची योग्यप्रकारे विल्हेवाट लावली पाहिजे. वापरलेले मास्क कागदात गुंडाळून कचरागाडीत टाका, तसेच हॉस्पिटलमध्ये वापरण्यात आलेले मास्क बायोमेडिकल वेस्टमध्येच टाकले जावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

बाजारातील कचरापेट्या नागरिकांसाठीबाजार भागात कचरा होऊ नये यासाठी कचरापेट्या लावण्यात आलेल्या आहेत. मात्र यात दुकानदार कचरा टाकतात. या पेट्या नागरिकांच्या सुविधेसाठी लावण्यात आलेल्या आहेत. दुकानदारांनी कचरा संकलन करून कचरा गाडीत टाकावयाचा आहे.

टॅग्स :SocialसामाजिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस