शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:26 IST

आंदोलनाचा विजय झाल्याचा बच्चू कडू यांचा दावा - कट कारस्थान झाले तर सरकारला सोडणार नाही

नागपूर : आम्ही कर्जमाफीचे बोललोच नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणायचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आम्ही पाच वर्षांचे आश्वसन दिले आहे. पण जे सरकार कर्जमाफीच्या तारखेपासून पळत होते ते सरकार आता तारखेवर आणून ठेवले. यावर आम्ही वॉच ठेवणार. यात कट कारस्थान झाले तर कुणालाही सोडणार नाही. आम्ही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा प्रहारचे नेते माजी आ. बच्चू कडू यांनी दिला.

कर्जमाफीबाबत गुरुवारी रात्री सरकारशी चर्चा केल्यानंतर शेतकरी बच्चू कडू यांच्यासह माजी आ. वामनराव चटप, रविकांत तुपकर आदी शेतकरी नेत्यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी दुपारी नागपुरात परतले. यावेळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता समितीला काही अर्थ नाही. सरकारने कर्जमाफीची तारीख दिली आहे. हा आंदोलनाचा विजयच आहे. दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल. आंदोलन संपलं नाही, कर्जमाफीचा हप्ता जोपर्यंत बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. ३१ जून ही तारीख यासाठी केली की यावर्षीचा कर्जदार ३१ मार्चला थकीत होणार आहे. तसेच मार्च नंतर कर्ज घेणारे सुद्धा यात समाविष्ट करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

घरी बसून कॉमेंट करू नका

घरी बसून कमेन्ट करणारे काही लोक काहीही आरोप करतात, मॅनेज झाल्याच्या बातम्या पसरवतात. आम्ही आंदोलन केलं आणि आता आरोप सहन करायचे हे किती दुर्दैव आहे. राजू शेट्टी, वामनराव चटप, महादेव जानकर आदी शेतकरी नेत्यांचे आयुष्य खर्ची गेलं आहे. मी अजून जीवंत आहे. काही फसगत झाली तर सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशाराही कडू यांनी दिला.

आठ दिवसात पुन्हा बैठक

मेंढपाळ, दिव्यांग, ग्राम पंचायत कर्मचारी आदी विषयांवर चर्चा राहिली आहे. त्यासाठी आठ दिवसात पुन्हा बैठक होणार आहे, असेही कडू यांनी स्पष केले.

सामान्य नागरिकांची माफी

शेतकऱ्यांच्या हक्क्साठी आंदोलन झाले. आंदोलनं काळात सामान्य नागरिकांना त्रास झाला त्यांची माफी मागतो, असेही बच्चू कडू म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bachchu Kadu warns government, claims victory, threatens suicide if cheated.

Web Summary : Bachchu Kadu claims victory in loan waiver agitation, warning the government against deceit. He asserts further protests if promises aren't kept and threatened extreme action if farmers are cheated, emphasizing continued vigilance.
टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूBacchu Kaduबच्चू कडूnagpurनागपूरPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारGovernmentसरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री