शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
4
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
7
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
8
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
9
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
10
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
11
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
12
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
13
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
14
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
15
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
16
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
17
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
18
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
19
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
20
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!

"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:26 IST

आंदोलनाचा विजय झाल्याचा बच्चू कडू यांचा दावा - कट कारस्थान झाले तर सरकारला सोडणार नाही

नागपूर : आम्ही कर्जमाफीचे बोललोच नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणायचे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आम्ही पाच वर्षांचे आश्वसन दिले आहे. पण जे सरकार कर्जमाफीच्या तारखेपासून पळत होते ते सरकार आता तारखेवर आणून ठेवले. यावर आम्ही वॉच ठेवणार. यात कट कारस्थान झाले तर कुणालाही सोडणार नाही. आम्ही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा प्रहारचे नेते माजी आ. बच्चू कडू यांनी दिला.

कर्जमाफीबाबत गुरुवारी रात्री सरकारशी चर्चा केल्यानंतर शेतकरी बच्चू कडू यांच्यासह माजी आ. वामनराव चटप, रविकांत तुपकर आदी शेतकरी नेत्यांचे शिष्टमंडळ शुक्रवारी दुपारी नागपुरात परतले. यावेळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे आता समितीला काही अर्थ नाही. सरकारने कर्जमाफीची तारीख दिली आहे. हा आंदोलनाचा विजयच आहे. दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल. आंदोलन संपलं नाही, कर्जमाफीचा हप्ता जोपर्यंत बँकेत जात नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. ३१ जून ही तारीख यासाठी केली की यावर्षीचा कर्जदार ३१ मार्चला थकीत होणार आहे. तसेच मार्च नंतर कर्ज घेणारे सुद्धा यात समाविष्ट करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

घरी बसून कॉमेंट करू नका

घरी बसून कमेन्ट करणारे काही लोक काहीही आरोप करतात, मॅनेज झाल्याच्या बातम्या पसरवतात. आम्ही आंदोलन केलं आणि आता आरोप सहन करायचे हे किती दुर्दैव आहे. राजू शेट्टी, वामनराव चटप, महादेव जानकर आदी शेतकरी नेत्यांचे आयुष्य खर्ची गेलं आहे. मी अजून जीवंत आहे. काही फसगत झाली तर सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशाराही कडू यांनी दिला.

आठ दिवसात पुन्हा बैठक

मेंढपाळ, दिव्यांग, ग्राम पंचायत कर्मचारी आदी विषयांवर चर्चा राहिली आहे. त्यासाठी आठ दिवसात पुन्हा बैठक होणार आहे, असेही कडू यांनी स्पष केले.

सामान्य नागरिकांची माफी

शेतकऱ्यांच्या हक्क्साठी आंदोलन झाले. आंदोलनं काळात सामान्य नागरिकांना त्रास झाला त्यांची माफी मागतो, असेही बच्चू कडू म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bachchu Kadu warns government, claims victory, threatens suicide if cheated.

Web Summary : Bachchu Kadu claims victory in loan waiver agitation, warning the government against deceit. He asserts further protests if promises aren't kept and threatened extreme action if farmers are cheated, emphasizing continued vigilance.
टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूBacchu Kaduबच्चू कडूnagpurनागपूरPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारGovernmentसरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री