शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

मी राजीनामा देऊन बॅलेटवर निवडणूक लढण्यास तयार

By कमलेश वानखेडे | Updated: December 6, 2024 18:04 IST

Nagpur : नाना पटोले यांनी भाजपचे आव्हान स्वीकारले

कमलेश वानखेडे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ईव्हीएमच्या माध्यमातून लोकांचा मताचा अधिकार चोरला जात आहे, अशी जनतेची भावना आहे. ही प्रक्रिया संशय निर्माण करणारी आहे. यात निवडणूक आयोगाने सुधारणा करावी. मते चोरली जात असतील तर ही भूमिका मान्य करावी. मला आव्हान देणाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेटवर पुन्हा निवडणूक घेणारे पत्र आणावे, मी राजीनामा देऊन बॅलेटवर निवडणूक लढण्यास तयार आहे, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेत्यांचे आव्हान स्वीकारले.

नाना पटोले शुक्रवारी नागपुरात पत्रकारांना म्हणाले, ईव्हीएमविरोधात आता जनताच आवाज उठवत आहे. मारकडवाडीत सरकारने मतदान का होऊ दिले नाही, कशाची भीती होती. नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून आवाजी मतदानाने निर्णय कायदे होत आहेत. राहुल गांधी यांच्या भूमिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे. २२० लाख कोटींचे कर्ज मोदींच्या राज्यात झाले. काँग्रेसने आर्थिक व्यवस्था सांभाळली होती, असेही पटोले म्हणाले. राज्यसभेत नोटा मिळाल्या असतील तर सभापतींना कारवाईचे अधिकार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्रिपद घेऊन शिंदे खूश आहेत का, हे त्यांचा चेहराच सांगतो आहे. त्यांचे चेहरे कसे आहेत यात आपल्याला पडायचं नाही. पण महाराष्ट्र प्रगत राज्य व्हावे, हे राज्य गुजरातकडे जाऊ नये, तर महाराष्ट्र सुसाट जावा. नवीन सरकारकडून जनतेला अनेक अपेक्षा आहेत, असेही त्यांनी सांगितले.

प्रतोद नियुक्तीसाठी अध्यक्षांना पत्र देणारकाँग्रेस पक्षाचा प्रतोद कोण असेल याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र दिले जाईल. अधिवेशनापूर्वी हा प्रश्न सुटेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बंटी शेळके यांनी केलेल्या आरोपांबाबत ही पक्षांतर्गत बाब असल्याचे सांगत पटोले यांनी अधिक बोलणे टाळले. शपथविधीचे निमंत्रण असते तर गेलो असतो. महायुती सरकारच्या शपथविधीचा निरोप कोणाला दिला याची माहिती नाही. महाराष्ट्राची परंपरा आहे, आम्हाला बोलावले नाही, बोलावले असते तर गेलो असतो, असे पटोले यांनी स्पष्ट केले. फडणवीस मुख्यमंत्री झाले यासाठी शुभेच्छा. महाराष्ट्र पुढे जावा, तरुणांना न्याय मिळावा, आमचा मित्र महाराष्ट्रासाठी काम करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेBJPभाजपाcongressकाँग्रेसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस