शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

प्रत्येक नवव्या व्यक्तीला हायपरटेन्शन : जिल्ह्यात ८८२३ रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 00:02 IST

भारतात प्रत्येक नववी व्यक्ती उच्च रक्तदाब म्हणजे ‘हायपरटेन्शन’च्या विळख्यात आहे. कोणत्याही लक्षणांशिवाय अचानक आढळून येणाऱ्या आजाराला 'सायलंट किलर' म्हणूनही ओळखले जाते. मेंदू, डोळे, हृदय, मूत्राशय अशा जवळपास सर्वच अवयवांवर या आजाराचा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. म्हणूनच हृदयाची नियमित तपासणी व ‘बीपी’ची औषधे नियमित घेणे व कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद न करण्याचा सल्ला हृदयरोग तज्ज्ञानी दिला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या ग्रामीण भागात गेल्या दहा महिन्यात ८८२३ रुग्णांची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देकेवळ १५ टक्केच लोकांचे रक्तदाब नियंत्रणात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतात प्रत्येक नववी व्यक्ती उच्च रक्तदाब म्हणजे ‘हायपरटेन्शन’च्या विळख्यात आहे. कोणत्याही लक्षणांशिवाय अचानक आढळून येणाऱ्या आजाराला 'सायलंट किलर' म्हणूनही ओळखले जाते. मेंदू, डोळे, हृदय, मूत्राशय अशा जवळपास सर्वच अवयवांवर या आजाराचा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. म्हणूनच हृदयाची नियमित तपासणी व ‘बीपी’ची औषधे नियमित घेणे व कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद न करण्याचा सल्ला हृदयरोग तज्ज्ञानी दिला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नागपूरच्या ग्रामीण भागात गेल्या दहा महिन्यात ८८२३ रुग्णांची नोंद झाली आहे.जगात एक कोटी म्हणजे २५ टक्के लोक उच्चरक्तदाबाने पीडित आहे. ‘वर्ल्ड हायपरटेन्शन लीग’नुसार दरवर्षी जगात या आजारामुळे ७५ लाख लोकांचा मृत्यू होतो. भारतात २५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या २३.१ टक्के पुरुष तर २२.६ टक्के महिला या आजाराने पीडित आहेत. भारतात या आजाराचे १३ कोटी ९० लाख रुग्ण आहेत. यामुळे आता या आजाराची नोंदही ठेवली जात आहे. ‘फिट’कडून ‘अनफिट’कडे आपण जात असल्याने या आजाराचे रुग्णही वाढताना दिसून येत असल्याचे हृदयरोग तज्ज्ञाचे म्हणणे आहे. ‘बैठी जीवनशैली’ही याला कारणीभूत आहे. ज्यांचे ‘फिटनेस’ कमी आहे, त्यांच्या हृदयाचे मसल जाड. यामुळे सुरुवातीपासून मीठ कमी खा. नियमित व्यायाम करा. विशेष म्हणजे या दोन्ही गोष्टीमंध्ये सातत्य ठेवल्यास याचा परिणाम दिसून येत असल्याचेही तज्ज्ञाचे म्हणणे आहे.जीवनशैलीतील बदल काळाची गरज-डॉ. जुनेजा 

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनीष जुनेजा म्हणाले, उच्च रक्तदाबामुळे हृदयातील धमन्यांचे आजार (हृदयात ब्लॉकेजेस तयार होणे), मायोकार्डिअल इन्फ्रॅक्शन (हार्ट अटॅक) आणि कार्डिओमायोपथी (हृदयाची स्पंदने मंदावणे) अशा समस्या उद्भवू शकतात. यातून मेंदूचा झटका (पक्षाघात), मूत्राशयाचे नुकसान (नेफ्रोपथी), डोळ्यांची दृष्टी कमी होणे (रेटिनोपथी), ‘ब्रेन हॅमरेज ’ आदी आजार होण्याचा धोका असतो. हे सर्व आजार केवळ जीवनपद्धतीत बदल आणून टाळता येऊ शकतात. जीवनशैलीतील बदल ही काळाची गरज आहे.रक्तदाबाची नियमित तपासणी आवश्यक-डॉ. जगताप 
प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत जगताप म्हणाले, अनेक व्यक्तींना आपल्याला ‘हायपर टेन्शन’चा त्रास आहे हेच माहीत नसते. सुदैवाने नियमित रक्तदाब तपासणी करून हे जाणून घेता येते आणि ते अगदीच सोपे आहे. यासाठी लागणारे यंत्र बाजारात कमी दरात उपलब्ध आहे. ‘बीपी’ मोजण्याच्या अर्ध्या तासापूर्वीपर्यंत कॉफी व सिगारेट टाळायला हवे. ‘रिलॅक्स’ होऊन व बसूनच बीपी घ्यायला हवे. आपल्याकडे लोकसंख्येच्या २५ टक्के लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे. परंतु केवळ १५ टक्के लोकांचा रक्तदाब नियंत्रणात आहे. उच्च रक्तदाबामुळे हृदयाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो. यामुळे हृदयविकार आणि पक्षाघाताची शक्यता वाढते. एवढंच नाही तर डोळे, किडनी, यकृत तसंच नर्व्हस सिस्टमवरही परिणाम होतो. म्हणूनच उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवायला हवे.रोजच्या रोज व्यायाम आवश्यक-डॉ. संचेती 
हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. आनंद संचेती म्हणाले, उच्च रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यासाठी रोजच्या रोज व्यायाम करायला हवा. दररोज कमीतकमी अर्धा तास योग्य प्रकारचा व्यायाम केल्याने यावर नियंत्रण मिळवता येते. यात पायी चालण्याचा व्यायाम सर्वात सोपा आणि परिणामकारक आहे. सुरुवातीला ३० मिनिटांमध्ये तीन ते चार किलोमीटर चला, नंतर यात वाढ करा. साधारण ४५ मिनिटांत पाच किलोमीटर अंतर चालण्याचे लक्ष्य ठेवा. तसेच रोजच्या जीवनशैलीत बदल केल्यास आजारावर नक्कीच नियंत्रण मिळवता येते. विशेषत: खाण्यात मिठाचे प्रमाण कमी करण्यावर भर दिल्यास हा आजार दूर ठेवता येतो.

टॅग्स :Medicalवैद्यकीयHealthआरोग्य