शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कसे होणार ‘स्वच्छ भारत’चे स्वप्न पूर्ण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 21:21 IST

‘स्वच्छ भारत’ योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ‘सोशल मीडिया’वर ‘चमकोगिरी’देखील सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात नागपूर महानगरपालिकेच्या उदासीन धोरणांमुळे हा निधी पूर्णपणे खर्च करण्याची तसदीदेखील प्रशासनाने घेतलेली नाही. ‘स्वच्छ भारत’अंतर्गत मिळालेल्या एकूण निधीपैकी नागपुरात केवळ २५ टक्के निधी खर्च झाला असून, अद्यापही ७५ टक्के निधी अखर्चित आहे. हे धोरण पाहता, नागपूर खरोखर ‘स्वच्छ’ कधी बनेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देकेंद्र व राज्य शासनाकडून आलेला ७५ टक्के निधी अखर्चित : नागपूर मनपाची उदासीनता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘स्वच्छ भारत’ योजनेंतर्गत केंद्र व राज्य शासनाकडून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ‘सोशल मीडिया’वर ‘चमकोगिरी’देखील सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात नागपूर महानगरपालिकेच्या उदासीन धोरणांमुळे हा निधी पूर्णपणे खर्च करण्याची तसदीदेखील प्रशासनाने घेतलेली नाही. ‘स्वच्छ भारत’अंतर्गत मिळालेल्या एकूण निधीपैकी नागपुरात केवळ २५ टक्के निधी खर्च झाला असून, अद्यापही ७५ टक्के निधी अखर्चित आहे. हे धोरण पाहता, नागपूर खरोखर ‘स्वच्छ’ कधी बनेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत मनपा आयुक्त कार्यालयाकडे ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत आलेल्या निधीसंदर्भात विचारणा केली होती. २०१५ पासून केंद्र व राज्य शासनातर्फे या योजनेसाठी किती निधी उपलब्ध करून देण्यात आला, यातील नेमका किती निधी खर्च झाला, कोणत्या उपक्रमात किती निधी खर्च झाला, यासंदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, ३१ मे २०१८ पर्यंत ‘स्वच्छ भारत’ योजनेंतर्गत एकूण ५५ कोटी ५८ लाख ३ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला. यातील ५२ कोटी ३५ लाख ३९ हजार रुपयांचा निधी केंद्र शासनाकडून प्राप्त झाला, तर उर्वरित ३ कोटी २२ लाख ६४ हजारांचा निधी राज्य शासनाकडून मिळाला. संबंधित निधी हा ‘आयएचएचएल’ (इन्डिव्हिज्युअल हाऊसहोल्ड लॅट्रीन), ‘सी.टी.’ (कम्युनिटी टॉयलेट), घनकचरा व्यवस्थापन, प्रचार आणि प्रसार तसेच ‘कॅपेसिटी बिल्डिंग’साठी देण्यात आला. मात्र नागपुरात घरगुती शौचालयासाठी एकूण १३ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तर ‘कॅपेसिटी बिल्डिंग’साठी १ कोटी ३५ लाख ७६ हजार रुपये खर्च करण्यात आले. खर्च करण्यात आलेला एकूण निधी १४ कोटी ३६ लाख ४८ हजार इतका असून, ४१ कोटीहून अधिक निधी अखर्चित होता.मनपाचे गंभीर दुर्लक्षशहरात घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर स्वरूप घेत आहे. ‘नीरी’सारख्या संस्थेत याबाबत संशोधन सुरू असून, वैज्ञानिकांनी या प्रश्नाला गंभीरतेने घेण्याची सूचना केली आहे. मात्र नागपूर मनपाने याकडे पूर्णत: दुर्लक्षच केले आहे. ‘स्वच्छ भारत’अंतर्गत आलेल्यापैकी सर्वाधिक निधी केवळ घरगुती शौचालयांसाठी वापरण्यात आला. मात्र घनकचरा व्यवस्थापन, सामुदायिक शौचालय यांच्यासाठी मात्र एकही रुपया खर्च झालेला नाही. शासनाकडून निधी आला असतानादेखील त्याला खर्च का करण्यात आले नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहेउपक्रम                        प्राप्त निधी                           खर्च झालेला निधीघरगुती शौचालय            ६,१७,१४,०००                         १३,००,७२,०००सामुदायिक शौचालय      १,१५,५६,०००                               -घनकचरा व्यवस्थापन      ४८,११,६७,०००                            -प्रचार आणि प्रसार           ११,३३,०००                                   -कॅपेसिटी बिल्डिंग            २,३३,०००                                 १,३५,७६,०००

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता