शहरं
Join us  
Trending Stories
1
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
2
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
3
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
4
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
5
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
6
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
7
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
8
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
9
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
11
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
12
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
13
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
14
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
15
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
16
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
17
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला
18
मारुतीनं 'या' SUV ला खालच्या बाजूला दिले CNG सिलिंडर, मिळणार अख्खा बूट स्पेस; 2 सिलिंडर वाल्या कारचं गणित बिघडणार?
19
अदानींच्या कंपनीचा शेअर पुन्हा 'दम' दाखवणार? ब्रोकरेजच्या मते ₹645 वर जाणार! तुमच्याकडे आहे का?
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

विदर्भात अजून किती दिवस पावसाचा मुक्काम? चंद्रपूरमध्ये एका रात्रीत ११५ मि.मी पाऊस, जनजीवन झाले विस्कळीत

By निशांत वानखेडे | Updated: September 2, 2025 20:06 IST

इरईचे सातही दरवाजे उघडले : उरल्या पिकांचीही नासधुस : ओला दुष्काळ सदृश्य स्थिती

नागपूर : सप्टेंबरच्या पहिल्या दिवशीपासून परतलेल्या पावसाने विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. साेमवारी रात्रीपासून सर्व जिल्ह्यात हजेरी लावलेल्या पावसाने चंद्रपूर जिल्ह्यास चांगलाच तडाखा दिला. येथे रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसला. मंगळवारी सकाळपर्यंत तब्बल ११५ मि.मी. पावसाची नाेंद झाली. यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले ओसंडून वाहत असून अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. पूर्व विदर्भात पूर्व व पश्चिमेकडे अकाेला वगळता सर्वत्र धाे-धाे सरी बरसल्या.

रात्री ७ वाजल्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून काही ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरले आहे. शहरात अनेक भागात पाणी साचले होते. पूरस्थितीमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. वरोरा-अर्जुनी मार्ग, गुंजाळा-कचराळा रस्ता, धानोरा ते भोयगाव मार्ग, चिचोली गावाजवळील रेल्वे बोगद्यात पाणी साचल्यामुळे काटवन ते मूल (चिचोली मार्गे) मार्ग, असे अनेक मार्ग बंद झाले. भद्रावती तालुक्यात एका गावामध्ये पाणी शिरले. पडोली येथील आमटा वॉर्ड परिसरात जवळपास २५० घरांमध्ये पुराचे पाणी शिरले असून माेठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे शेकडाे हेक्टरमधील पिकांचीही नासधुस झाली आहे. जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात सकाळपर्यंत ८२.२ मि.मी. पाऊस झाला हाेता.

इरई धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढल्याने मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून धरणाचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाची तीन गेट एक मीटरने आणि चार गेट ०.७५ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे इरई नदी काठावरील, तसेच चंद्रपूर शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे भंडारा (६८ मि.मी.) जिल्ह्यात मुसळधार, तर नागपूर (३०), गडचिराेली (१७) जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसला. गडचिराेली जिल्ह्यात अहेरी व नागपूर जिल्ह्यात पारशिवनी तालुक्यात मुसळधार सरी बरसल्या. पश्चिम विदर्भात अमरावती, यवतमाळ व बुलढाणा जिल्ह्यास दमदार सरी बरसल्या.

वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान

वाशिम जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटे ३ वाजेपर्यंत सर्वत्र जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे पिकांच्या नुकसानात आणखीनच भर पडली आहे. सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’सदृश स्थिती निर्माण झाली आहे. आठ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये वाशिम तालुक्यातील वाशिम आणि कोंढाळा, मालेगाव तालुक्यातील मालेगाव, मुंगळा आणि शिरपूर, तर मानोरा तालुक्यातील मानोरा, कुपटा आणि गिरोली या मंडळांचा समावेश आहे. २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ४०.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ६४.३ मिमी पावसाची नोंद मालेगाव तालुक्यात, तर सर्वात कमी ३.३ मिमी पावसाची नोंद कारंजा तालुक्यात झाली आहे. ओल कमी होत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

पुढचे तीन दिवस येलाे अलर्ट

साेमवार व मंगळवारी बहुतेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला हाेता. मंगळवारी वर्धा, अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात दमदार हजेरी लागली. इतर जिल्ह्यात पावसाचा जाेर कमी हाेता. यानंतरचे तीन दिवस म्हणजे ५ सप्टेंबरपर्यंत सर्व जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार असून हवामान विभागाने येलाे अलर्ट जारी केला आहे. अमरावती जिल्ह्यात बुधवारी जाेरदार पावसाचा अंदाज असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भRainपाऊसnagpurनागपूरweatherहवामान अंदाजmonsoonमोसमी पाऊस