शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

प्रलंबित खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला : हायकोर्टाची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 20:03 IST

नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला केली.

ठळक मुद्देसरकारला मागितला अहवाल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला आहे व फरार असलेल्या किती आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला केली आणि यावर एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. आरोपी फरार असल्यामुळे राज्यातील विविध न्यायालयांमध्ये हजारो खटले प्रलंबित आहेत. त्यासंदर्भातील आकडेवारी लक्षात घेता न्यायालयाने यावर स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेची व्याप्ती वरील पाच जिल्ह्यांपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. ३ वर्षे व त्यापेक्षा जास्त कारावासाच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांतील जे खटले आरोपी फरार असल्यामुळे १० वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित आहेत त्यांचा या याचिकेत विचार केला जात आहे.सरकारच्या प्रतिज्ञापत्रानुसार, आरोपी फरार असल्यामुळे नागपूर शहरातील ३३४९ तर, नागपूर ग्रामीणमधील ४१७ खटले प्रलंबित आहेत. आतापर्यंत या खटल्यांतील सुमारे ८०० फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहरामधील १९४० खटल्यांतील आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट तर, ११६८ खटल्यांतील आरोपींविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट बजावण्यात आले होते. तसेच, उर्वरित २४१ खटल्यांतील आरोपींविरुद्ध घोषणापत्र जारी करण्यात आले होते. आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. आनंद देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDeathमृत्यू