शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

प्रलंबित खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला : हायकोर्टाची विचारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 20:03 IST

नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला केली.

ठळक मुद्देसरकारला मागितला अहवाल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यांतील किती आरोपींचा मृत्यू झाला आहे व फरार असलेल्या किती आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला केली आणि यावर एक आठवड्यात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. आरोपी फरार असल्यामुळे राज्यातील विविध न्यायालयांमध्ये हजारो खटले प्रलंबित आहेत. त्यासंदर्भातील आकडेवारी लक्षात घेता न्यायालयाने यावर स्वत:च जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेची व्याप्ती वरील पाच जिल्ह्यांपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. ३ वर्षे व त्यापेक्षा जास्त कारावासाच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांतील जे खटले आरोपी फरार असल्यामुळे १० वर्षे व त्यापेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित आहेत त्यांचा या याचिकेत विचार केला जात आहे.सरकारच्या प्रतिज्ञापत्रानुसार, आरोपी फरार असल्यामुळे नागपूर शहरातील ३३४९ तर, नागपूर ग्रामीणमधील ४१७ खटले प्रलंबित आहेत. आतापर्यंत या खटल्यांतील सुमारे ८०० फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहरामधील १९४० खटल्यांतील आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरन्ट तर, ११६८ खटल्यांतील आरोपींविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट बजावण्यात आले होते. तसेच, उर्वरित २४१ खटल्यांतील आरोपींविरुद्ध घोषणापत्र जारी करण्यात आले होते. आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. आनंद देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDeathमृत्यू