शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

विदर्भात कृषीपंप अनुशेष किती प्रमाणात दूर केला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 7:54 PM

विदर्भामध्ये कृषी पंपांचा कोणत्या जिल्ह्यात किती अनुशेष होता व तो अनुशेष किती प्रमाणात दूर केला अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला करून यावर दोन आठवड्यांत जिल्हानिहाय माहिती सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाची विचारणा : जिल्हानिहाय माहिती मागितली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भामध्ये कृषी पंपांचा कोणत्या जिल्ह्यात किती अनुशेष होता व तो अनुशेष किती प्रमाणात दूर केला अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला करून यावर दोन आठवड्यांत जिल्हानिहाय माहिती सादर करण्याचा आदेश दिला.न्यायालयाने वर्तमानपत्रातील वृत्ताची दखल घेऊन यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. वृत्तानुसार, २०१४ मध्ये विदर्भात ६ लाख ९० हजार ५३१ कृषीपंपांचा अनुशेष होता. कृषीपंप वीज जोडणीचे अर्ज पैसे भरूनही प्रलंबित ठेवण्यात आल्यामुळे अनुशेष वाढला होता. मार्च २०१४ पर्यंत विदर्भातील शेतकऱ्यांचे एकूण ६५ हजार ६४८ अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी ५५ हजार ४४३ अर्जदारांना पैसे भरूनही वीज जोडणी दिली गेली नव्हती. २०१३-१४ मध्ये केवळ २५ हजार ८५९ कृषीपंपाना वीज जोडणी देण्यात आली होती. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याप्रकरणात वरिष्ठ वकील सी. एस. कप्तान न्यायालय मित्र आहेत.कॅनल दुरुस्ती होत नाहीअ‍ॅड. कप्तान यांनी सिंचन प्रकल्पांच्या कॅनल्सची योग्य दुरुस्ती केली जात नसल्याची बाब सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. परिणामी, न्यायालयाने शासनाला पुढच्या तारखेला यावरही स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिलेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयagricultureशेती