शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे आणि खतांची खरेदी करायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 17:48 IST

बॅँकेतील पीक कर्ज डोंगराएवढे असल्याने आणि पीक कर्जाचा गुंता न सुटल्याने बियाणे आणि खतांची खरेदी करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देकोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बळीराजा हवालदिल

अभय लांजेवार ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रबी हंगामाचा शेवट शेतकऱ्यांसाठी कडू ठरला. अकाली आलेल्या पावसाने रबी पीक हिरावून नेले. त्यातच कोरोना विषाणूच्या ‘एन्ट्री’ने नागरिकांसह शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. त्यातही बॅँकेतील पीक कर्ज डोंगराएवढे असल्याने आणि पीक कर्जाचा गुंता न सुटल्याने बियाणे आणि खतांची खरेदी करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेल्या या ‘अर्थ’चक्राच्या संकटावर शासनाने योग्य उपाययोजना आखावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.उमरेड परिसरात कपाशी आणि सोयाबीन पीक मुबलक प्रमाणात घेतल्या जाते. साधारणपणे एप्रिल महिन्याची ही वेळ म्हणजे चणा, गहू आणि अन्य साठवलेले धान्य बाजारात विकून खरीपाची पूर्वतयारी करण्याची असते. बियाणांच्या बाबतीत निदान विचारणा तरी सुरू होते. कोरोनामुळे कृषी केंद्र आता कुठे जेमतेम सुरू झालेली दिसतात. दुसरीकडे शेतकऱ्यांची रेलचेल मात्र दिसून येत नाही.पैसाअडकाच नसल्याने कृषी केंद्रात केवळ ‘भाव’ विचारायला जायचे काय, असा मार्मिक सवाल शेतकऱ्यांचा आहे. उमरेड तालुक्यात ७९ कृषी सेवा केंद्र आहेत. शहरात ही संख्या २६ आहे. केंद्रचालकांनी बियाणांसाठी संबंधित कंपन्यांकडे आपल्या मागण्या नोंदविल्या आहेत. या भागात उन्हाळी हंगामात पीक घेतले जात नसल्याने तूर्त बियाणांची गरज नाही. असे असले तरी कृषी केंद्रात यावेळी शेतकऱ्यांची लगबग असते, अशी माहिती केंद्रसंचालक बाळू इंगोले यांनी दिली. सर्वांचीच हालत खस्ता झालेली आहे. त्याचे परिणाम आतापासूनच दिसत आहेत, अशीही बाब ते बोलले. सर्व कृषी केंद्र चालकांनी योग्य नियोजन आखले असून योग्य ती खबरदारी सुद्धा आम्ही घेत आहोत, अशी माहिती अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय मुंडले यांनी दिली.सबसिडी पॅकेज हवेशेतकरी चौफेर संकटात आहेत. त्यातही हमीभावाने खरेदी सुरू झालेली नाही. खरेदी सुरू केल्यानंतरही रक्कम तातडीने मिळेल याचीसुद्धा हमी राहिलेली नाही. या बाबींचा अभ्यास केल्यावर बियाणे आणि खतांसाठी स्वतंत्र सबसिडी पॅकेज शासनाने जाहीर करावे, अशी मागणी भाजप किसान विकास आघाडीचे नेते आनंद राऊत यांनी केली आहे. हमीभावाने खरेदी सुरू करून तातडीने रक्कम दिल्यास काही शेतकऱ्यांना निश्चितच दिलासाही मिळेल, असेही ते म्हणाले.बियाण्यांची मागणीउमरेड तालुक्यात सुमारे ८,५०० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. कपाशीच्या बियाण्यांचे ६१ हजार पॉकेट (४५० ग्रॅम प्रति पॉकेट), तूर २५० क्विंटल, भात ८०० क्विंटल आदी बियाण्यांची मागणी संबंधित कपंनीकडे करण्यात आलेली आहे. बियाण्यांची आवकही काही प्रमाणात सुरू झाली असून येत्या काही दिवसात बियाणे कृषी केंद्रात पोहचतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.खतांचेही नियोजन‘मे’ च्या अंतिम आठवड्यात खतांच्या खरेदीचा कालावधी सुरू होतो. सध्या खतांची गरज नसली तरी त्याचे नियोजन पूर्वीपासूनच आखले जाते. तालुक्यात एकूण १६,२९२ मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये युरिया ५,१००, डीएपी २,१०० आणि एसएसपी २,६०० मेट्रिक टन खतांचा समावेश आहे.शासनाने कृषीविषयक बाबींचे निर्बंध हटविले आहेत. यामुळे खते-बियाणे अन्य राज्यांतून, जिल्ह्यातून येत असले तरी वाहतुकीसाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. योग्य नियोजन आखले असल्याने खते आणि बियाण्यांची टंचाईसुद्धा भासणार नाही.- संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, उमरेड

टॅग्स :FarmerशेतकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस