शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
3
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
4
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
5
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
6
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
7
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
8
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
9
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
10
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
11
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
12
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
13
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
14
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
15
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
16
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
17
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
18
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
19
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
20
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग बनले मृत्यूचे सापळे : १४ महिन्यांत १५०० हून अधिक अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:41 IST

महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१८ सालापासून १४ महिन्यांत थोडेथोडके नव्हे तर १५०० हून अधिक अपघात झाले. यात १३०० हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. अपघातांची सरासरी काढली असता दिवसाला चार अपघात झाले असून यात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्ग आहे की मृत्यूचा मार्ग असे म्हणण्याची वेळ आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे१३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१८ सालापासून १४ महिन्यांत थोडेथोडके नव्हे तर १५०० हून अधिक अपघात झाले. यात १३०० हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. अपघातांची सरासरी काढली असता दिवसाला चार अपघात झाले असून यात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्ग आहे की मृत्यूचा मार्ग असे म्हणण्याची वेळ आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. २०१६ सालापासून ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत विभागाच्या हद्दीत किती अपघात झाले, किती लोकांचा अपघातात मृत्यू झाला, या पोलिसांची संख्या किती होती, इत्यादी प्रश्न त्यांची विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत महामार्गांवर १ हजार ५६४ अपघात झाले. यात १ हजार ३४१ नागरिकांचा मृत्यू झाला. २०१९ मधील दोन महिन्यांतच ३७६ अपघातांत १९९ जण मरण पावले. तर १ हजार १५ जण जखमी झाले. बहुतांश अपघात हे वाहनचालकांचा हलगर्जीपणा, भरधाव वेग, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, नशा करून वाहन चालविणे, नियमांचा भंग करणे या कारणांमुळे झाले.३८ महिन्यांत ३,६५९ बळी२०१६ पासूनची आकडेवारी पाहिली तर ३८ महिन्यांत नागपूर विभागातील महामार्गांवर ३ हजार ५८४ अपघात झाले. त्यात ३ हजार ६५९ नागरिक मरण पावले व ४ हजार २ नागरिक गंभीर जखमी झाले. याकालावधीत चार पोलिसांचा कर्तव्यावर असताना अपघातात मृत्यू झाला.मृत्यूचे पाच ‘स्पॉट्स’महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाच्या अधिपत्याखाली एकूण १६ महामार्ग मदत केंद्र येतात. या हद्दीत पाच ठिकाणी सर्वाधिक अपघात झाले आहेत. या ‘स्पॉट्स’वर सूचना फलकदेखील लावण्यात आले आहेत.१० अधिकाऱ्यांच्या भरवशावर कारभारमहामार्ग प्रादेशिक विभाग पोलिसांचा कारभार १० पोलीस अधिकाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. विभागाकडे ३४१ पोलीस कर्मचारी असून मोटार सायकल व जीप मिळून केवळ ४८ वाहने आहेत.

टॅग्स :Accidentअपघातhighwayमहामार्गDeathमृत्यूRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता