शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:35 AM

केंद्र शासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन प्रमाणपत्रासंदर्भात भेडसावणाऱ्या  विविध समस्या दूर केल्या आहेत. त्यामुळे देशातील असंख्य केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देविविध समस्या दूर : याचिका निकाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र शासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जीवन प्रमाणपत्रासंदर्भात भेडसावणाऱ्या  विविध समस्या दूर केल्या आहेत. त्यामुळे देशातील असंख्य केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.केंद्रीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. त्यासाठी बायोमेट्रिक्स यंत्रावर त्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे घेतले जातात. यंत्रात ठसे स्वीकारल्या न गेल्यास त्यांचे निवृत्ती वेतन थांबविले जाते. म्हातारपणामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या हाताची त्वचा खराब झालेली असते. परिणामी बरेचदा त्यांचे ठसे नामंजूर होतात. अशावेळी काही बँका त्यांचे फिजिकल जीवन प्रमाणपत्र स्वीकारण्यासही नकार देतात. परिणामी कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. यासंदर्भात आलेल्या विविध तक्रारी व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांमुळे केंद्र शासनाने सुधारित दिशानिर्देश जारी केले आहेत. बायोमेट्रिक्स यंत्रावर बोटाचे ठसे स्वीकारल्या जात नसतील तर, कर्मचाऱ्यांचे इरिस (बुबुळ) स्कॅनिंग करण्याचे व दोन्ही बाबी अशक्य झाल्यास कर्मचाऱ्यांचे फिजिकल जीवन प्रमाणपत्र स्वीकारण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत.बरेचदा कर्मचाऱ्यांना आजार, अपंगत्व इत्यादी कारणांमुळे स्वत: बँकेत जाणे शक्य होत नाही. अशावेळी बँकांनी कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचे जीवन प्रमाणपत्र मिळवावे. अशा कर्मचाऱ्यांना बँकेत हजर होण्यापासून सूट देण्यात यावी असेही बँकांना सांगण्यात आले आहे. याविषयी उच्च न्यायालयाने स्वत:च जनहित याचिका दाखल केली होती. केंद्र शासनाच्या निर्देशामुळे मूळ समस्या संपल्याने न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी बुधवारी हे प्रकरण निकाली काढले. याप्रकरणात अ‍ॅड. एस. एन. भट्टड न्यायालय मित्र होते. केंद्र शासनातर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल उल्हास औरंगाबादकर व अ‍ॅड. मुग्धा चांदूरकर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर