शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

नागपूरच्या गोंड राजांचा घाट कधी बनणार ‘राजघाट’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 11:06 IST

नागपूर नगरीची स्थापना करणारे गोंड राजे बख्तबुलंद शहा आणि या राज घराण्यांत मृत्यू पावलेल्या राजांचे समाधीस्थळ सक्करदरा परिसरात आहे. या समाधीस्थळाला हेरिटेजचा दर्जा प्राप्त झाला आहे. परंतु अतिक्रमणामुळे नागपूर नगरीचे हे ऐतिहासिक वैभव हरविण्याच्या मार्गावर आहे.B

ठळक मुद्देसमाधींची दुरवस्थाअतिक्रमणामुळे हेरिटेजला धोका

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर नगरीची स्थापना करणारे गोंड राजे बख्तबुलंद शहा आणि या राज घराण्यांत मृत्यू पावलेल्या राजांचे समाधीस्थळ सक्करदरा परिसरात आहे. या समाधीस्थळाला हेरिटेजचा दर्जा प्राप्त झाला आहे. परंतु अतिक्रमणामुळे नागपूर नगरीचे हे ऐतिहासिक वैभव हरविण्याच्या मार्गावर आहे. गोंड राजांचा हा घाट ‘राजघाट’ बनावा अशी मागणी आदिवासी समाजातून होत आहे. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा राजघाट दुर्लक्षित पडला आहे. ३० जुलै रोजी गोंड राजा बख्तबुलंद शाह यांची जयंती आहे. याचे औचित्य साधून महापालिकेने यासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.गोंड राजे बख्तबुलंद शाह यांनी १६६८ ते १७०६ या कालावधीत ३८ वर्षे राज्य केले. त्यांनी १७०२ मध्ये नागपूर नगरीची स्थापना केली. सक्करदरा येथे गोंड राजांची विशाल स्मशान भूमी होती. राजघराण्यातील लोकांचा मृत्यू झाल्यानंतर या स्मशानभूमीत त्यांना दफविण्यात येत होते. या स्मशानभूमीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. आता फक्त २९ समाधी अस्तित्वात आहे. या समाधीसुद्धा तुटलेल्या अवस्थेत आहे.जागेची मालकी नगर भूमापन विभागाचे मालमत्ता पत्रकानुसार न.भू. क्र.१७५ वर नागपूर सुधार प्रन्यास च्या नावाची अनधिकृत नोंद आहे. तसेच महानगरपालिकेच्या वारसा (हेरिटेज) यादी क्र.५२ वर ‘गोंड स्मशानभूमी’ असा उल्लेख आहे तसेच ‘शहा परिवार’ यांची मालकी दाखविली आहे. गोंड स्मशान भूमी अतिक्रमणमुक्त करून ‘राजघाट’ चा दर्जा देऊन सौंदर्यीकरण करण्यात यावे व ऐतिहासिक वारसा जपावा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार यांच्याकडे वारंवार करण्यात आली आहे. यासंदर्भात नेहरूनगर झोन स.आयुक्त यांचेसोबत संघटनेची बैठक झाली आहे. त्यांनी महानगर पालिकेला शहा परिवार व नागपूर सुधार प्रन्यास यांनी आपली मालकी सोडून जागा हस्तांतरित केल्यास राजघाटप्रमाणे सौंदर्यीकरण करण्यात येणार असे सांगितले. नागपूर मनपा आयुक्त यांना शहा परिवारचे वीरेंद्र शहा यांनी हस्तांतरण करण्याची संमती दिली, एनआयटीनेसुद्धा संमती दिली आहे. मात्र मनपाच्या स्थावर (इस्टेट) विभागात राजघाटाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव प्रलंबित आहे.गोंडवानाचा वैभवशाली इतिहास असलेल्या गोंड राजे यांचा राजघाट अतिक्रमण व दुर्लक्षित आहे. त्याचा तात्काळ राजघाटप्रमाणे विकास करून भावी पिढीकरिता वारसा जपावा. हे राजघाट आदिवासींचा ऐतिहासिक वारसा आहे. राजांच्या जयंतीनिमित्त महापालिकेने यासंदर्भात ठोस पाऊल उचलावे.- दिनेश शेराम, अध्यक्ष,अखिल भारतीय आदिवासीविकास परिषद नागपूर विभाग

टॅग्स :nagpurनागपूर