शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मुसळधार पावसाने विदर्भात हाहाकार! पूरस्थितीत तिघांचा बळी, शेकडो गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:22 IST

विदर्भात निसर्गाचा रौद्र अवतार : गडचिरोलीत १८३ मिमी पावसाची नोंद, गोसेखुर्दचे ३३ गेट खुले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पश्चिमेसह पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी रात्रीपासून गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात तिघांचा पुराच्या पाण्यात बळी गेला. नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांतही पातसाने धुमाकुळ घातला असून नदी-नाले दुथद्धी भरून वाहत आहेत. परिणामी, ५० हुन अधिक मार्ग बंद पडले. तर शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. लाखो हेक्टरमधील पिके पाण्याखाली गेली असून शेकड़ों परांची पडझड झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. मंगळवारी सकाळपर्यंत १२ तासांत येथे १८३ मि.मी. पाऊस झाला. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून शेवटच्या टोकावरील भामरागडला याचा सर्वाधिक फटका बसला. पर्लकोटा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेल्याने या शहरासह परिसरातील ७० गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. यादरम्यान तालुक्यातील खंडी गावाजवळील नाला ओलांडताना एक युवक वाहून गेला. लालचंद कपिलसाय लाकडा (१९, रा. कोडपे) असे मृत तरुणाचे नाव आहे. दुपारी २ वाजता त्याचा मृतदेह आढळून आला. चंद्रपुरात जिल्ह्यात भद्रावती तालुक्यातील बिजोणी नाल्यावरून जाताना पत्रू गंगाराम ठावरे (४५, रा. बोरगाव धांडे) हा व्यक्ती तोल गेल्याने पुरात वाहून गेला. नाल्यापासून काही अंतरावर पत्रू ठावरे यांचा मृतदेह आढळून आला. दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वैनगंगेचे पाणी वाढले असून नाल्यांना पूर येऊन मंगळवारी जिल्ह्यातील १८ मार्ग बंद झाले. इसापूर व सातनाला धरणांचे दरवाजे उघडल्याने वर्धा आणि पैनगंगा नद्यांना पूर आल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. सावली व जिवती तालुक्यातील ४८ घरांची पडझड झाली. तेलंगणा सीमेलगतच्या राजुरा तालुक्यातील १९ गावांची शेती अद्यापही पाण्याखाली आहे.

वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यातील बोथली (किन्हाळा) येथील नाल्याला पूर आल्याने रवींद्र बाबाराव गोंधळी (४५) नामक व्यक्ती सोमवारी रात्री पुराच्या पाण्यात वाहून गेला. नाल्यावरून पुराचे पाणी असतानाही त्याने दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सोबतचे दोघे यातून कसेबसे बचावले. सोमवारी दुपारपासूनच्या धुवाधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहायला लागले.

मंगळवारी सकाळी ८:३० पर्यंतचा पाऊस मि.मी.मध्येगडचिरोली - १८३.२भंडारा - १६४.४चंद्रपूर - १०७ब्रह्मपुरी - १६४.४नागपूर - ९१.७भिवापूर - १०८गोंदियाअर्जुनी मोरगाव - ८३वर्धा - ४९.४

रात्री धो-धो, दिवसा शांतनागपूर विभागातील पाचही जिल्ह्यांत सोमवारी रात्री धो-धो पाऊस कोसळला. मंगळवारी दिवसा मात्र पावसाने विश्रांती घेतली. सायंकाळी पुन्हा श्रावणधारा बरसल्या. हवामान विभागाने येत्या १२ तासांत अमरावती व नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज व गडगडाटासह जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यातही विजांसह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

गोसेखुर्दचे ३३ गेट उघडलेभंडारा जिल्हयात सोमवारच्या रात्री पचनी आणि लाखांटूर या दोन तालुक्यांतील ११ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी पवनी तालुक्यात दोन मार्ग रात्रीतून बंद पडले. वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे गोसे खुर्द प्रकल्पाचे ३३ गेट अर्धा मीटरने उघडले निम्न वर्धा प्रकल्पाचे १९ दरवाजे २ ३० सेंटिमीटरने उघडण्यात आली व त्यातून १११.८८ घनमीसे पाण्याचा विसर्ग वणाँ नदीपात्रात सुरू आहे.

टॅग्स :nagpurनागपूरVidarbhaविदर्भ