शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने विदर्भात हाहाकार! पूरस्थितीत तिघांचा बळी, शेकडो गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:22 IST

विदर्भात निसर्गाचा रौद्र अवतार : गडचिरोलीत १८३ मिमी पावसाची नोंद, गोसेखुर्दचे ३३ गेट खुले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पश्चिमेसह पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी रात्रीपासून गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात तिघांचा पुराच्या पाण्यात बळी गेला. नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांतही पातसाने धुमाकुळ घातला असून नदी-नाले दुथद्धी भरून वाहत आहेत. परिणामी, ५० हुन अधिक मार्ग बंद पडले. तर शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. लाखो हेक्टरमधील पिके पाण्याखाली गेली असून शेकड़ों परांची पडझड झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. मंगळवारी सकाळपर्यंत १२ तासांत येथे १८३ मि.मी. पाऊस झाला. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून शेवटच्या टोकावरील भामरागडला याचा सर्वाधिक फटका बसला. पर्लकोटा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेल्याने या शहरासह परिसरातील ७० गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. यादरम्यान तालुक्यातील खंडी गावाजवळील नाला ओलांडताना एक युवक वाहून गेला. लालचंद कपिलसाय लाकडा (१९, रा. कोडपे) असे मृत तरुणाचे नाव आहे. दुपारी २ वाजता त्याचा मृतदेह आढळून आला. चंद्रपुरात जिल्ह्यात भद्रावती तालुक्यातील बिजोणी नाल्यावरून जाताना पत्रू गंगाराम ठावरे (४५, रा. बोरगाव धांडे) हा व्यक्ती तोल गेल्याने पुरात वाहून गेला. नाल्यापासून काही अंतरावर पत्रू ठावरे यांचा मृतदेह आढळून आला. दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वैनगंगेचे पाणी वाढले असून नाल्यांना पूर येऊन मंगळवारी जिल्ह्यातील १८ मार्ग बंद झाले. इसापूर व सातनाला धरणांचे दरवाजे उघडल्याने वर्धा आणि पैनगंगा नद्यांना पूर आल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. सावली व जिवती तालुक्यातील ४८ घरांची पडझड झाली. तेलंगणा सीमेलगतच्या राजुरा तालुक्यातील १९ गावांची शेती अद्यापही पाण्याखाली आहे.

वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यातील बोथली (किन्हाळा) येथील नाल्याला पूर आल्याने रवींद्र बाबाराव गोंधळी (४५) नामक व्यक्ती सोमवारी रात्री पुराच्या पाण्यात वाहून गेला. नाल्यावरून पुराचे पाणी असतानाही त्याने दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सोबतचे दोघे यातून कसेबसे बचावले. सोमवारी दुपारपासूनच्या धुवाधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहायला लागले.

मंगळवारी सकाळी ८:३० पर्यंतचा पाऊस मि.मी.मध्येगडचिरोली - १८३.२भंडारा - १६४.४चंद्रपूर - १०७ब्रह्मपुरी - १६४.४नागपूर - ९१.७भिवापूर - १०८गोंदियाअर्जुनी मोरगाव - ८३वर्धा - ४९.४

रात्री धो-धो, दिवसा शांतनागपूर विभागातील पाचही जिल्ह्यांत सोमवारी रात्री धो-धो पाऊस कोसळला. मंगळवारी दिवसा मात्र पावसाने विश्रांती घेतली. सायंकाळी पुन्हा श्रावणधारा बरसल्या. हवामान विभागाने येत्या १२ तासांत अमरावती व नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज व गडगडाटासह जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यातही विजांसह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

गोसेखुर्दचे ३३ गेट उघडलेभंडारा जिल्हयात सोमवारच्या रात्री पचनी आणि लाखांटूर या दोन तालुक्यांतील ११ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी पवनी तालुक्यात दोन मार्ग रात्रीतून बंद पडले. वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे गोसे खुर्द प्रकल्पाचे ३३ गेट अर्धा मीटरने उघडले निम्न वर्धा प्रकल्पाचे १९ दरवाजे २ ३० सेंटिमीटरने उघडण्यात आली व त्यातून १११.८८ घनमीसे पाण्याचा विसर्ग वणाँ नदीपात्रात सुरू आहे.

टॅग्स :nagpurनागपूरVidarbhaविदर्भ