शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भिवापूर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : तालुक्यात पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत सर्वदूर मुसळधार पाऊस बरसला. त्यानंतर दिवसभर अधूनमधून ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

भिवापूर : तालुक्यात पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत सर्वदूर मुसळधार पाऊस बरसला. त्यानंतर दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी बसरत हाेत्या. तालुक्यात दिवसभरात एकूण १२८.१ मिमी. पावसाची नाेंद करण्यात आली. या पावसामुळे सर्व नदी, नाल्यांना माेठा पूर आल्याने काही गावांमध्ये तर बहुतांश शेतात पुराचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले हाेते. शिवाय, पिकांचे अताेनात नुकसानही झाले. तालुक्यातील प्रत्येक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती.

सुमारे चार तास काेसळलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच ८० टक्के पाणीसाठा असलेले नांद-शेडेश्वर १०० टक्के भरले. त्यामुळे मध्येच पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. शिवाय, तालुक्यातील नांद, चिखलापार, नक्षी व चिखली या नद्यांसह त्यांना मिळणाऱ्या सर्व नाल्यांना माेठा पूर आला हाेता. पाऊस व त्यात धरणातील पाण्याचा विसर्ग यामुळे नदी व नाल्यांमधील पाणी तुंबले. त्यामुळे परिसरातील शेती व पीक पाण्याखाली यायला सुरुवात झाली.

सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पावसाचा जाेर थाेडा कमी झाला. त्यातच सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पावसाने थाेडी उसंत घेतली हाेती. पुराचे पाणी राेड व पुलांवरून वाहात असल्याने भिवापूर -हिंगणघाट (जिल्हा वर्धा), उमरेड - हिंगणघाट, भिवापूर - चिखली या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली हाेती. दुपारी ३ वाजेपर्यंत तालुक्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आली नव्हती.

दरम्यान, तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण हाेताच तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, ठाणेदार महेश भोरटेकर यांच्यासह महसूल व पाेलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या गावांना भेटी देत पाहणी केली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही ठिकाणी पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता. तालुक्यातील नदीकाठच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ३० घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती आहे. महसूल विभागाचे अधिकारी प्रत्येक ठिकाणी भेटी देत पाहणी करीत आहेत. आवश्यक ठिकाणी मदत कार्य सुरू केले आहे. पूर ओसरल्यानंतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील, अशी माहिती तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी दिली.

...

नक्षी, चिखलापार गावात शिरले पाणी

भिवापूर तालुक्यातील नांद, चिखलापार, नक्षी व चिखली या नद्यांना पूर आल्याने पुराचे पाणी या नदीकाठी वसलेल्या नक्षी व चिखलापार येथील प्रत्येकी २२ घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले हाेते. त्यामुळे नागरिकांच्या घरांमधील जीवनावश्यक साहित्य, धान्य, कापड व इतर वस्तू भिजल्याने त्यांचे माेठे नुकसान झाले.

...

एक हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान

पुराचे पाणी नदीकाठच्या शेतात शिरल्याने नक्षी, महालगाव, चिखलापार, नांद व चिखली शिवारातील एक हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील साेयाबीनचे ९० टक्के पीक कापणीला आले आहे. या पावसामुळे साेयाबीनसह अन्य पिकांचे नुकसान झाल्याची माहिती भास्कर येंगळे, अमित राऊत, अनिकेत वराडे, तुळशीदास चुटे, सुनील इंगळे, गणेश इंगोले, विठ्ठल लेदाळे, सुधाकर पडोळे, देवराव जगथाप, शेषराव भोयर, सोनबा मेश्राम या शेतकऱ्यांनी दिली.

...

राेडवरील पाणी शेतात

उमरेड - चिमूर (जिल्हा चंद्रपूर) या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम जवळी फाट्यापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. हा मार्ग चार फूट उंच तयार करण्यात आल्याने तसेच पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी प्रभावी साेय करण्यात न आल्याने राेडवरील पाणी शेतात साचले. त्यामुळे मालेवाडा व चिचाळा शिवारातील पिके पाण्याखाली आली हाेती. पाण्यामुळे पीक सडणार असल्याची माहिती मालेवाडा येथील नारायण इंगोले, धनराज सातपुते, माणिक सातपुते, प्रशांत बारेकर, विनोद लाखे, कवडू सातपुते, आनंद सातपुते, रामू लाखे, अरूण चौधरी, सूर्यभान ढोरे, मंदा इंगोले, संजय कडू, हरीश ढोरे यांनी दिली.