शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

दिवसा ऊन आणि रात्रीला वाढता गारठा; थंडी व धुक्यामुळे ३३ रेल्वेगाड्यांना विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 13:09 IST

आगामी २४ तासात नागपुरातील रात्रीचे तापमान वाढण्याची शक्यता

ठळक मुद्देथंडीच्या कडाक्यामुळे प्रवाशांची गैरसोय

नागपूर : शहरात मंगळवारी दिवसा उन्हामुळे ऊबदार वातावरण होते. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गारठ्यापासून नागरिकांची सुटका झाली असली तरी रात्री मात्र पुन्हा थंडीचा कडाका वाढला. काही दिवस असेच वातावरण राहण्याचे संकेत आहेत.

मंगळवारी दिवसाचे तापमान १.१ अंश डिग्रीने वाढून कमाल तापमान ३०.७ अंश सेल्सिअसवर पोहोचले. हे तापमान सरासरीपेक्षा २ अंशाने अधिक असल्याने दिवसा गारवा जाणवत नव्हता. मात्र, सूर्यास्तासोबतच थंडीचा प्रभाव जाणवायला लागला. किमान तापमानात ०.७ अंशाची सामान्य वाढ होत तापमान ९.२ अंशावर पोहोचले. मात्र, सरासरीपेक्षा हे तापमान ४ अंशाने कमी असल्याने गारवा जाणवत होता. ८.६ अंश तापमान असलेला गोंदिया जिल्हा विदर्भातील सर्वात थंड जिल्हा ठरला. नागपूरसोबत गडचिरोलीचे तापमान ९.२ अंश सेल्सिअसवर होते. विदर्भात हे दोन्ही जिल्हे गारव्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतात पडणाऱ्या थंडीपासून काही अंशी मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. मध्य भारतातही याचा प्रभाव दिसेल. आगामी २४ तासात नागपुरातील रात्रीचे तापमान वाढण्याची शक्यता आहे.

धुक्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक विस्कटले

दाट धुक्याने सर्वत्र चादर पांघरल्यामुळे रेल्वे सेवेवर प्रतिकुल परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांची तीव्र गैरसोय होत आहे. गेल्या पाच दिवसांपासून थंडीचा पारा घसरतच चालला आहे. त्यामुळे वेगाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची गती मंदावली आहे. परिणामी नागपूर मार्गे येणे-जाणे करणाऱ्या तब्बल ३३ रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम झाला असून, या गाड्यांपैकी कोणती गाडी, १ तास, कोणती दोन तर कोणती गाडी चक्क सहा तास विलंबाने धावत आहे. रेल्वेगाड्या विलंबाने धावत असल्याने गाड्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची तीव्र गैरसोय होत आहे. बाहेरगावी जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. अशात प्रतीक्षालयात जागा कमी पडू लागल्याने अनेक प्रवासी रेल्वेस्थानकाच्या विविध फलाटावर, रेल्वेस्थानकाच्या परिसरात जागा मिळेल तेथे दाटीवाटीने बसलेले आढळत आहे. रेल्वेस्थानकासोबतच रेल्वेस्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम बाजूच्या प्रवेशद्वार परिसरातही मोठ्या संख्येत प्रवासी दिसून येत आहेत.

परिसरातील भोजनालये, हॉटेल्स, चहा टपऱ्यांवरही मोठी गर्दी

विलंबाने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत असली तरी रेल्वेस्थानकाच्या आतमधील स्टॉल्स, कॅन्टीन तसेच बाहेर असलेली भोजनालये, हॉटेल्स, चहा टपऱ्यांवरही मोठी गर्दी बघायला मिळत आहे. थंडीचा कडाका असल्याने गरम खाद्यपदार्थ, चहा, कॉफीची मोठी मागणी वाढली आहे.

टॅग्स :weatherहवामानrailwayरेल्वेnagpurनागपूरpassengerप्रवासी