शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

देशातील आरोग्य सुविधांमध्ये दहा वर्षांत झाली दुपटीने वाढ - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 10:54 IST

‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स’चे थाटात वितरण

नागपूर :आरोग्यावरील बजेट वाढले पाहिजे, सर्वांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळायला हव्या या मताचा मी आहे. आपण वित्त राज्यमंत्री झाल्यानंतर त्या दिशेने पावले टाकली व गेल्या दोन वर्षांपासून आरोग्यावरील बजेट वाढवले. २०१४ मध्ये २० ते २३ हजार कोटींवर असलेले आरोग्यावरील बजेट गेल्यावर्षी ९० हजार कोटींवर पोहोचले. यावर्षी त्यात आणखी ७ हजार कोटींची वाढ केली आहे. गेल्या दहा वर्षांत आरोग्यावरील बजेटमध्ये चार ते पाच पटीने वाढ केली, असे सांगत एकूणच आरोग्य सुविधा दुपटीने वाढल्या असल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.

‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्ड्स’चा दिमाखदार सोहळा बुधवारी हॉटेल सेंटर पॉइंट येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी ज्युरी बोर्डचे अध्यक्ष व ज्येष्ठ न्यूरो फिजिशियन डॉ. चंद्रशेखर मेश्राम होते. प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून प्रसिद्ध नेत्रचिकित्सक व माजी खासदार, पद्मश्री डॉ. विकास महात्मे, तर सन्माननीय अतिथी म्हणून ‘लोकमत एडिटोरिअल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा, ज्युरी बोर्डचे सचिव ज्येष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. राजू खंडेलवाल, ‘लोकमत टाइम्स’चे संपादक एन. के. नायक, ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्र, ‘लोकमत’चे संपादक श्रीमंत माने उपस्थित होते.

यावेळी आरोग्य सेवेचा चढता ग्राफ मांडताना अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले, २०१४ मध्ये एमबीबीएसला ५४ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत होता. आता ९८ हजार म्हणजे जवळपास दुप्पट विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. २०१४ मध्ये ३४७ मेडिकल कॉलेज होते. ते ७०० वर गेले आहेत. २०१४ मध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट फक्त ७ होत्या. त्या आता २२ झाल्या असून, पुन्हा १२ येणार आहेत. कोरोना काळात अमेरिकेसारख्या देशात एक लस तीन हजार रुपयांना मिळत होती. मात्र, भारतात २२० कोटींपेक्षा जास्त डोस मोफत देण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले. पूर्वी भारतात व्हेंटिलेटर तयार होत नव्हते; पण कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर चार कंपन्यांनी ते तयार करणे सुरू केले. १२ लाखांचे व्हेंटिलेटर ३ ते ४ लाख रुपयांपर्यंत तयार होत आहे. अँजिओग्राफीनंतर बसवायच्या स्टेंटची किंमतसुद्धा सात ते आठ पटीने कमी झाली आहे. ब्रँडेड औषध सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे जनऔषधी योजना आणली. त्यामुळे १० पटीने कमी किमतीत औषध उपलब्ध झाले. आयुष्मान भारत योजनेंतर्गत पाच लाख रुपयांचा विमा सामान्य नागरिकांना मिळणार आहे. ही भारताची आरोग्य क्षेत्रातील प्रगती असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय क्षेत्र हे एक ‘नोबेल प्रोफेशन’ आहे. आपणही ते नोबेल टिकवणे आवश्यक आहे. पैशाचा विचार न करता रुग्णाच्या जिवाचा विचार करावा. आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा माना, असे आवाहनही त्यांनी डॉक्टरांना केले.

यावेळी नागपूर विभागाचे आरोग्य उपसंचालक कांचन वानेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, आयएमएचे सचिव डॉ. कमलाकर पवार, आदी उपस्थित होते. संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले. आभार डॉ. राजू खंडेलवाल यांनी मानले.

टॅग्स :Healthआरोग्यBhagwat Karadडॉ. भागवतLokmat Eventलोकमत इव्हेंटnagpurनागपूर