शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

तो क्रूरकर्मा रात्रभर मर्डरच करत सुटला .....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 00:39 IST

Human mascare क्रूरकर्मा आलोक माटूरकरच्या मनात क्रोधाग्नी अशी काही भडकली होती की तो रात्रभर इकडून तिकडे मर्डरच करत सुटला.

ठळक मुद्देकाळरात्रीचा कुणालाच मागमूस नव्हताआक्रित घडलेच कसे ? सुन्न नातेवाईकांचा सवाल 

नरेश डोंगरे /लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - कितीही राग आला तरी तो तास-दोन तासानंतर शांत होतो. आप्तांचे रक्त पाहून व्यक्ती पश्चात्तापाच्या आगीत जळतो. मात्र, क्रूरकर्मा आलोक माटूरकरच्या मनात क्रोधाग्नी अशी काही भडकली होती की तो रात्रभर इकडून तिकडे मर्डरच करत सुटला. हे भयंकर आक्रित सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास उघड झाले अन् पाचपावलीतील चिमाबाईपेठमधील रहिवासी शहारले. काळरात्रीची कुणालाच कशी कल्पना आली नाही, असा सवाल ते एकमेकांना विचारू लागले. लोकमतने या परिसरातील रहिवासी, आलोकचे नातेवाईक यांना बोलते केले. पोलिसांकडूनही प्राथमिक तपासानंतरचा निष्कर्ष जाणून घेतला अन् काळीज कापणारी पार्श्वभूमी पुढे आली.

१५ वर्षांपूर्वी पळून जाऊन प्रेमविवाह केल्याने स्वकीयांनी आलोकला बहिष्कृत केल्यासारखे केले होते. त्याची पर्वा न करता त्याने कष्टातून संसार फुलवला होता. त्याचे पत्नी विजयावर खूप प्रेम होते. मुलगा आणि मुलगी तर त्याला जीव की प्राणच वाटायचे. मेव्हणीवरही त्याचा तेवढाच जीव होता. नातेवाईकांसोबत तो सरळसाधेपणाने वागायचा. बरेच वर्षे त्याच्यासोबत आप्तांपैकी अनेक जण बोलत नव्हते. त्याची पर्वा न करता त्याने आपला व्यवसाय वाढवला. संसारवेलही फुलविली. मुलगी परी आणि मुलगा साहिलला तो फुलासारखा जपायचा. त्याचे वागणे सरळसाधे होते. असे असताना त्याने हे आक्रित घडवलेच कसे, त्याने या सर्वांनाच एवढ्या निर्दयपणे मारलेच कसे, असे प्रश्न नातेवाईकांना पडले आहेत.

नातेवाईकांच्या या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, या थरारकांडाला अनैतिक संबंध, आलोकची शरीरसंबंधाबाबतची विकृती आणि अन् त्यातून निर्माण झालेली परिस्थिती कारणीभूत असल्याचे पुढे आले.

त्याचा हस्तक्षेप अन् तिचा त्वेष

आलोकच्या लग्नाच्या वेळी त्याची मेव्हणी आमिषा केवळ ५ ते ७ वर्षांची होती. ती वयात येण्यापूर्वीपासूनच आलोककडे राहायची. या दोघांनी अनैतिक संबंधातून सर्व मर्यादा तोडल्या. मात्र, दुप्पट वयाचे भावजीसोबत ती रमणे शक्य नव्हते. तिने अनेक मित्र बनविले. त्यामुळे याचा क्रोध, हस्तक्षेप वाढत गेला. मारहाणीपर्यंत प्रकरण गेले. तो हक्क दाखवू लागल्याने ती त्वेषात आली.

अन् भडका उडाला

रविवारी रात्री ११.१५ च्या सुमारास तिने आपल्या मित्राला फोन करून त्याला आवर अन्यथा परिणाम गंभीर होतील, असे सांगून टाकले. त्यानंतर सासू आलोकच्या घरी पोहचली. तेथे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले अन् त्याच्या संतापाचा भडका उडाला. पत्नीने त्याला आमिषाच्या जीवनात ढवळाढवळ कशाला करतो, असे विचारले अन् भडका उडाला. त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. आमिषाच याला कारणीभूत असल्याचे त्याच्या डोक्यात गेले अन् एक भयंकर घटनाक्रमाची सुरुवात झाली.

बलात्कार करून केली हत्या

आरोपी आलोक सासऱ्याच्या घरी पोहचला. त्याच्याकडे धारदार शस्त्र असल्याचे पाहून शरणागती पत्करलेल्या आमिषावर त्याने बलात्कार केला, नंतर तिचा गळा कापला. अर्धनग्न अवस्थेत आमिषाचा मृतदेह सोडून तो निघण्याच्या तयारीत असतानाच सासू बाहेरून दारावर धडकली. त्यामुळे त्याने सासूचीही गळा कापून हत्या केली.

क्रूरकर्मा घरी परतला

मध्यरात्रीनंतर त्याने पत्नीसोबत जबरदस्तीने शय्यासोबत करण्याचा प्रयत्न केला. रक्ताने माखलेले कपडे बघून तिने नकार दिल्यामुळे, त्याने विजयाचा धारदार शस्त्राने गळा चिरला. तिने किंकाळी फोडल्याने मुले जागी झाली. परीने विरोध केला असावा. त्यामुळे त्याने तिचे हातपाय बांधले. तरीदेखील तिचा विरोध सुरू असल्यामुळे डोक्यावर हातोडा हाणून तिलाही रक्ताच्या थारोळ्यात लोळविले आणि आता मुलालाच कशाला ठेवायचे म्हणून त्याने त्याच्या तोंडावर उशी दाबून त्यालाही संपविले. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे आणि प्राथमिक तपासावरून हा निष्कर्ष काढला आहे.

ते आले अन् ...

सुमारे ५० वर्षे जुन्या नारायणराव निमजे चाळीत वृद्ध देवीदास बोबडे दुसऱ्या माळ्यावर एका छोट्याशा खोलीत भाड्याने राहतात. बाजूला राऊत आणि अन्य एक परिवार तर खाली निमजे परिवार राहतो. बोबडे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. रविवारी रात्री ते कामावर निघून गेले. पोलिसांच्या मते, त्यांना दारूचे भारी व्यसन आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास टुन्न होऊन ते घरात शिरले. पत्नी आणि मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडून असतानादेखील त्यांचे त्याकडे लक्ष गेले नाही. पोलीस घरी आल्यानंतर त्यांची नशा उतरली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूnagpurनागपूर