शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा, वीज कोसळून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 18:27 IST

विदर्भातील अनेक जिल्ह्यात वीजगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी गारपीटही झाली असून वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे नागपूरसह अमरावती जिल्ह्यात अवकाळी पाऊसरब्बीसह भाजीपाला पिके आली धोक्यात, शेतकरी संकटात

नागपूर : विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीटीसह पाऊस बरसला. भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून एक मुलगा तर, अमरावती जिल्ह्यात एक शेतकरी ठार झाला आहे. 

हवामान खात्याने विदर्भात २८ व २९ तारखेला ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस बरसला असून काही ठिकाणी वीज पडून लोक दगावले आहेत. आधीच दाटलेल्या धुक्यामुळे पिकांवर परिणाम होताना त्यात पावसाची भर पडली असून गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. 

नागपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. नागपूरमध्ये काळेकुट्ट ढग दाटले असून हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. तर, नरखेड तालुक्यातील काही भागात सकाळपासूनच अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीतील पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातही गारांसह पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यातील लोहारा, गायमुख, सोरणा, जांब व कांद्री परिसरांतही गारांसह पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यातील नवेगाव धुसाळा शिवारात वीज कोसळून बारा वर्षीय मुलगा ठार झाला आहे. नयन परमेश्वर पुंडे असे मृत बालकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ३:४५ ची ही घटना असून तो आजोबासोबत शेतशिवारात म्हशी चराईसाठी गेला होता. दरम्यान, वीजगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. अचानक वीज कोसळल्याने नयनचा मृत्यू झाला. तसेच शेतात तणसीच्या ढिगाजवळ बांधलेल्या बैलजोडीपैकी एक बैल ठार झाला. या पावसामुळे रब्बी पिकांसह टोमॅटो, मिरची, कोबी व भाजीपाल्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गोंदिया जिल्ह्यातही मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गारांसह पावसाने हजेरी लावली आहे.

अमरावती शहरात हलका पाऊस पडला असून चिखलदरा येथे आज सकाळपासून धुक्याचे वातावरण आहे. तर,  जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसासह गारपीट झाली असून धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथे दुपारी ४ वाजताच्या सुमारास वीज पडून गजानन बापूराव मेंढे (४२) या कास्तकाराचा मृत्यू झाला.

वरुड तालुक्यातील गाडेगाव-टेमणी शिवारात सकाळी ११ च्या सुमारास काळेकुट्ट ढग दाटून पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू असतानाच काही क्षण कमी आकाराची गार पडली. पावसाने रस्ते ओलेचिंब झाले आहेत. रब्बी हंगामातील पिकांना या पावसाचा फायदा होत असला तरी वेचणीस आलेला कापूस मात्र पाण्यात भिजला. पावसामुळे शेतात कापूस वेचणीला असलेल्या शेतकरी-मजुरांची ऐनवेळी त्रेधा उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. चणा, गहु, तुर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आलं असून आता कराव तरी काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, नेर, कळंब आणि यवतमाळ तालुक्यात पाऊस असून बाभूळगाव तालुक्यात गारपीट झाल्याची माहिती आहे. वर्धा जिल्ह्यात आष्टी, आर्वी, कारंजा तालुक्यात पावसाची नोंद झाली असून पिकांना फटका बसला आहे. आर्वी तालुक्यातील काही भागात गारांचा पाऊस तर आष्टीसह आष्टी तालुक्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या.

कडाक्याच्या थंडी नंतर मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर कमी झाला होता. त्यातच आता गारांसह पावसाचे संकेताने जिल्ह्यात शेतकऱ्यांना धडकी भरली आहे.  ३० डिसेंबरपर्यत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले आहे. गारपीटीसह पाऊस आल्यास विदर्भात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :weatherहवामानRainपाऊसenvironmentपर्यावरण