शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

विदर्भाला अवकाळी पावसाचा तडाखा, वीज कोसळून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2021 18:27 IST

विदर्भातील अनेक जिल्ह्यात वीजगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी गारपीटही झाली असून वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्दे नागपूरसह अमरावती जिल्ह्यात अवकाळी पाऊसरब्बीसह भाजीपाला पिके आली धोक्यात, शेतकरी संकटात

नागपूर : विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीटीसह पाऊस बरसला. भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून एक मुलगा तर, अमरावती जिल्ह्यात एक शेतकरी ठार झाला आहे. 

हवामान खात्याने विदर्भात २८ व २९ तारखेला ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस बरसला असून काही ठिकाणी वीज पडून लोक दगावले आहेत. आधीच दाटलेल्या धुक्यामुळे पिकांवर परिणाम होताना त्यात पावसाची भर पडली असून गारपीटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या संकटाने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. 

नागपूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. नागपूरमध्ये काळेकुट्ट ढग दाटले असून हलक्या पावसाला सुरुवात झाली आहे. तर, नरखेड तालुक्यातील काही भागात सकाळपासूनच अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीतील पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. 

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातही गारांसह पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यातील लोहारा, गायमुख, सोरणा, जांब व कांद्री परिसरांतही गारांसह पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यातील नवेगाव धुसाळा शिवारात वीज कोसळून बारा वर्षीय मुलगा ठार झाला आहे. नयन परमेश्वर पुंडे असे मृत बालकाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ३:४५ ची ही घटना असून तो आजोबासोबत शेतशिवारात म्हशी चराईसाठी गेला होता. दरम्यान, वीजगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. अचानक वीज कोसळल्याने नयनचा मृत्यू झाला. तसेच शेतात तणसीच्या ढिगाजवळ बांधलेल्या बैलजोडीपैकी एक बैल ठार झाला. या पावसामुळे रब्बी पिकांसह टोमॅटो, मिरची, कोबी व भाजीपाल्याचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गोंदिया जिल्ह्यातही मंगळवारी सायंकाळच्या सुमारास गारांसह पावसाने हजेरी लावली आहे.

अमरावती शहरात हलका पाऊस पडला असून चिखलदरा येथे आज सकाळपासून धुक्याचे वातावरण आहे. तर,  जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसासह गारपीट झाली असून धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथे दुपारी ४ वाजताच्या सुमारास वीज पडून गजानन बापूराव मेंढे (४२) या कास्तकाराचा मृत्यू झाला.

वरुड तालुक्यातील गाडेगाव-टेमणी शिवारात सकाळी ११ च्या सुमारास काळेकुट्ट ढग दाटून पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू असतानाच काही क्षण कमी आकाराची गार पडली. पावसाने रस्ते ओलेचिंब झाले आहेत. रब्बी हंगामातील पिकांना या पावसाचा फायदा होत असला तरी वेचणीस आलेला कापूस मात्र पाण्यात भिजला. पावसामुळे शेतात कापूस वेचणीला असलेल्या शेतकरी-मजुरांची ऐनवेळी त्रेधा उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. चणा, गहु, तुर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आलं असून आता कराव तरी काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, नेर, कळंब आणि यवतमाळ तालुक्यात पाऊस असून बाभूळगाव तालुक्यात गारपीट झाल्याची माहिती आहे. वर्धा जिल्ह्यात आष्टी, आर्वी, कारंजा तालुक्यात पावसाची नोंद झाली असून पिकांना फटका बसला आहे. आर्वी तालुक्यातील काही भागात गारांचा पाऊस तर आष्टीसह आष्टी तालुक्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या.

कडाक्याच्या थंडी नंतर मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यात थंडीचा जोर कमी झाला होता. त्यातच आता गारांसह पावसाचे संकेताने जिल्ह्यात शेतकऱ्यांना धडकी भरली आहे.  ३० डिसेंबरपर्यत ही स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले आहे. गारपीटीसह पाऊस आल्यास विदर्भात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :weatherहवामानRainपाऊसenvironmentपर्यावरण