शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

जि.प. उमेदवारांना करावा लागणार 'ऑनलाईन' अर्ज : जिल्हाधिकारी ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:14 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या नंतर या अर्जाची प्रिंट संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीसह सादर करावी लागणार आहे.

ठळक मुद्देनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्जाची प्रिंट करावी लागणार सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करायचा होता. परंतु जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या नंतर या अर्जाची प्रिंट संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीसह सादर करावी लागणार आहे.जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जि.प.निवडणूक अधिकारी अविनाश कातडे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आयोगाच्यावतीने अर्ज भरण्यासाठी एक लिंक देण्यात येणार आहे. यावर ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यानंतर त्या अर्जाची प्रिंट संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला सादर करावी लागणार आहे. अर्ज भरण्याकरिता आवश्यक सर्व यंत्रणा तहसील कार्यालयात उभी करण्यात येईल. अनामत रक्कमही ऑनलाईन भरावी लागणार लागेल. सर्वसाधारण प्रवगार्साठी १ हजार तर आरक्षित वर्गासाठी ५०० रुपये अनामत रक्कम ठेवण्यात आली आहे. पंचायत समितीकरिता ही ७०० व मागासवर्गीयांसाठी ३५० रुपये इतकी आहे.१४ लाख १९ हजार मतदार, १८१४ मतदान केंद्रजिल्हा परिषदेच्या ५८ व पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत १४ लाख १९ हजार ७१७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. यात ६ लाख ८९ हजार ६१५ महिला व ७ लाख ३० हजार ९१ पुरुष मतदार आहेत. तसेच ११ तृतीयपंथी मतदार आहेत. जिल्हा परिषदेच्या ५८ सर्कल करिता १८१४ मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. मतदानासाठी ईव्हीएम मशीन राहील परंतु व्हीव्हीपॅट राहणार नाही. त्याऐवजी आवश्यक मेमरी चीप राहील. निवडणुकीसाठी २०१२ सीयू व ४०२४ बीयू तर २०१२ मेमरी चीप उपलब्ध आहे.निवडणुकीत खर्च करता येईल तीन लाखजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला ३ लाख रुपये तर पंचायत समितीकरिता उमेदवाराला दोन लाख रुपयापर्यंत खर्च करता येणार आहे.तब्बल पावणेआठ वर्षांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या ५८ तर पंचायत समितीच्या ११६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. एका जिल्हा परिषद सर्कलमध्ये २० ते २५ गावांचा समावेश आहे. काही सर्कलमध्ये ३० ते ३३ गावांचा समावेश आहे. एका जि.प. सर्कलमध्ये दोन पंचायत समितीचा समावेश असतो. त्यामुळे पंचायत समितीत जि.प.च्या निम्मी गावे येतात. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवाराला मोठी कसरत करावी लागते. जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवाराला ३ लाख रुपयापर्यंत खर्च करता येणार आहे. तर पंचायत समितीच्या उमेदवाराला २ लाख रुपयापर्यंत खर्च करता येईल. यापेक्षा जास्त पैसे खर्च करणाऱ्या उमेदवाराच्या निवडणुकीवर प्रतिबंध घालण्यात येणार असून विजयी झाल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले की, उमेदवाराला निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडावे लागणार असून सर्व खर्च याच खात्याच्या माध्यमातून करावे लागणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारी