शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
3
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
4
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
5
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

राज्यपाल म्हणाले, संघस्थानावरून आल्याचा अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2019 8:53 PM

साधारणत: राज्यपालपद हे धर्म, पंथ, भाषा, पक्ष, संघटना, राजकारण यांच्या चौकटीत बसत नाही. राज्यपालपदावर बसल्यानंतर कुणाचीही बाजू न घेता निष्पक्षपणे भूमिका मांडावी लागते. मात्र राज्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्तुतिसुमने वाहिली. संघस्थानावरून आल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे प्रतिपादन केले. रामटेक येथील त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देसंघाबाबत अनेक गैरसमज : सर्वसमावेशक संघटना असल्याचे उद्गार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: राज्यपालपद हे धर्म, पंथ, भाषा, पक्ष, संघटना, राजकारण यांच्या चौकटीत बसत नाही. राज्यपालपदावर बसल्यानंतर कुणाचीही बाजू न घेता निष्पक्षपणे भूमिका मांडावी लागते. मात्र राज्याचे राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर स्तुतिसुमने वाहिली. संघस्थानावरून आल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे प्रतिपादन केले. रामटेक येथील त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.आपल्या भाषणादरम्यान लालकृष्ण अडवाणींच्या एका पुस्तकाचा दाखला देत असताना ते बोलत होते. संघस्थानावरून आपण आलो आहोत व ते आपण अभिमानाने सांगतो. २१ व्या वर्षी प्रचारक असताना अडवाणींना संघावर लादलेली बंदी व संघावर टीका होत असतानादेखील स्पष्टीकरण न दिले जाणे याबाबत प्रश्न पडले होते. याबाबत त्यांनी गोळवलकर गुरुजी यांनाच विचारणा केली होती. संघाचे लिखीत संविधान सरकारने मागितले तर ते त्यांना देण्यात येईल. तसेच धर्मनिरपेक्षता काय आहे हे सरकारला समजायला हवे असे उत्तर देत गोळवलकरांनी अशोकचक्राचे उदाहरण दिले होते. असे अनेक प्रश्न संघस्थानी विचारले जातात व प्रत्येकाच्या मनातील शंकांचे योग्य समाधान केले जाते. १९२५ पासून ही प्रक्रिया सुरू आहे. संघावर टीका होत असते व ती होतच असेल. मात्र आतापर्यंतचा प्रवास पाहता डॉ.हेडगेवार यांनी मांडलेले तत्त्वज्ञान मजबूत होते हे दिसून येते, असे राज्यपाल म्हणाले.सोबतच संघाने व्यक्तीचे मत तसेच पूजाअर्चना, धर्माच्या अधिकारांचा नेहमीच आदर केला आहे. संघातून अनेक समाजप्रबोधन करणारे लोक घडले. याशिवाय समाजातील सर्वच समाजप्रबोधकांचा संघात सन्मान करण्यात येतो व आठवणदेखील करण्यात येते. संघ सर्वसमावेशक आहे हे सांगत राज्यपालांनी मुंबईतील मल्याळी समाजाचे उदाहरण दिले. नारायण गुरुजींच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाला समाजातील पदाधिकाऱ्यांनी मला बोलविले. त्यांना वाटले की गुरुजींबाबत फारशी कुणाला माहिती नाही. मात्र संघात नारायण गुरुजींचे प्रात:स्मरण करण्यात येते. संघाबाबत लोकांचा असलेला असा गैरसमज दूर व्हायला हवा, असेदेखील राज्यपाल म्हणाले.शिक्षणप्रणालीत भारतीयत्वावर भर हवादेश एकेकाळी विश्वगुरू होता. आपले जुने वैभव परत मिळवायचे असेल तर भारतीयत्वावर भर असलेल्या शिक्षणप्रणालीची आवश्यकता आहे. शिक्षणप्रणालीत आधुनिकता, उद्यमशीलतेच्या भावनेलादेखील प्रोत्साहन दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर