शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

अच्छे दिन केवळ उद्योगपतींचेच

By admin | Updated: April 27, 2015 02:28 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी देशातील जनतेला अनेक आश्वासने दिली. ‘अच्छे दिन’ आणण्याचे स्वप्न दाखविले; परंतु सत्तेवर येताच सर्व आश्वासने फोल ठरली.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी देशातील जनतेला अनेक आश्वासने दिली. ‘अच्छे दिन’ आणण्याचे स्वप्न दाखविले; परंतु सत्तेवर येताच सर्व आश्वासने फोल ठरली. गेल्या १० महिन्यांत केंद्र सरकारने दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्ती केली नाही. केवळ उद्योगपतींना लाभ पोहोचविणारी ध्येयधोरणेच आखली जात आहेत, त्यामुळे अच्छे दिन केवळ उद्योगपतींचेच आले आहेत, अशी टीका बसपाचे राष्ट्रीय महासचिव खा. वीरसिंह यांनी रविवारी येथे केली. बहुजन समाज पार्टीतर्फे येत्या २ मे रोजी भूमी अधिग्रहण विधेयकाच्या विरोधात देशव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्रात मुंबई आणि नागपुरात मोठ्या प्रमाणावर धरणे आंदोलन होईल. त्या आंदोलनाच्या तयारीसाठी पक्षाच्या विदर्भस्तरीय मुख्य पदाधिकाऱ्यांची बैठक रविवारी विदर्भ साहित्य संघाचे सभागृह झाशी राणी चौक सीताबर्डी येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड, उपाध्यक्ष कृष्णा बेले प्रामुख्याने उपस्थित होते. खा. वीरसिंह म्हणाले, एकीकडे देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि आपले पंतप्रधान विदेशवारीत मग्न आहेत. देशातील जनतेला भाजपाचा खरा चेहरा आता दिसून आला आहे. त्यामुळेच दिल्लीच्या निवडणुकीत भाजपाला सपाटून मारा बसला. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारालासुद्धा पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येसुद्धा भाजपाची अशीच गत होणार असल्याचेही ते म्हणाले. याप्रसंगी वाडी नगर परिषदेतून निवडून आलेल्या बसपा उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. नागोराव जयकर यांनी प्रास्ताविक केले. भाऊ गोंडाणे यांनी संचालन केले. या बैठकीला विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)