शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांमधील मागास जातींना आरक्षण द्या, नाना पटोले यांची मागणी

By कमलेश वानखेडे | Updated: November 22, 2023 13:13 IST

मराठा विरुद्ध ओबीसी पेटविण्याचे काम सरकार प्रायोजित

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात लिहिले आहे की, आरक्षण हा मागास समाजाचा अधिकार आहे. जनगणना करीत नसल्यामुळे हे सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. मुस्लिम धर्मातही मागास जाती खूप आहेत. मुळात हा धर्माचा प्रश्न होऊ शकत नाही. मुस्लिम धर्मातील ज्या मागास जाती आहेत त्यांनाही जनगणना करून आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केली.

पटोले म्हणाले, छत्तीसगडमध्ये आदिवासी, ओबीसी, एससीमध्येही आरक्षणात वाढ करण्यात आली. महाराष्ट्रातही मुस्लिमांच्या मागास जाती असतील त्यामध्ये आरक्षणाची वाढ करण्यात येईल, अशी काँग्रेसची भूमिका आहे. मराठा विरुद्ध ओबीसी हे सरकार प्रायोजित होऊन घडवत आहे. राज्यातील एक मंत्री एका समूह बरोबर जाऊन चॅलेंज करत असेल तर लक्षात आले पाहिजे की हे सरकार प्रायोजित महाराष्ट्राला पेटवण्याचे काम सुरू आहे, असा थेट आरोपही पटोले यांनी केला.

शेड्युल दहाप्रमाणे सर्वाधिकार माननीय अध्यक्ष यांचे आहेत. मात्र, वेळेच्या बंधनात निर्णय घेणे अपेक्षित होते. सुप्रीम कोर्टाला अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढावे लागले हेच विधिमंडळाच्या व्यवस्थेला कलंक लावण्याचा काम आताचे लोक करतात. सुनील प्रभूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी आमदार झालो असे आपल्या साक्षीमध्ये सांगितले. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा नामोल्लेख सुद्धा प्रोसिडिंगमध्ये येऊ द्यायचा नाही, या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांचे बाजूने कारवाई होत असेल तर ते फारच चुकीचे आहे. अधिवेशनात आम्ही याची चर्चा करू. अध्यक्षांना अधिकार असतात मात्र ज्याप्रमाणे विधिमंडळाचे कामकाजाला काळीमा लावण्याचे काम होत असेल तर त्यात आम्हाला शांत बसता येणार नाही,आम्ही जाब विचारू, असा इशाराही पटोले यांनी दिला.

संत तुकारामांचा अपमान करणाऱ्यांकडे कसे जाता ?

- संत तुकाराम महाराजांचा अपमान करणाऱ्यांकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जात असतील तर तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यांनी जावे किंवा जावू नये, आमच्यासाठी इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. सरकार आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारच्या पैशाचा चुराडा आणि लूट करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. भंडारा येथे मुख्यमंत्र्यांनी रोड शो केला. मात्र लोकच नव्हते. त्यांनी काय प्रचार करावा हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांच्या शो नंतर संघटनांनी रस्ता रोको केला, अशी टीकाही त्यांनी केली.

खेळात राजकारण नको

- राहुल गांधी राजस्थानमध्ये भाषण देत असताना तरुणांनी आवाज मारला. सोशल मीडियावर पनौती शब्द प्रचलित झाला. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव घेतलेले नाही. भाजप तसे म्हणते आहे. अंतिम सामन्यासाठी भारतीय टीमला राहुल व प्रियांका गांधी यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. ज्या पद्धतीने खेळात राजकारण तयार करण्याचे काम सुरू झाले आहे, ते योग्य नाही. खेळात राजकारण येऊ देऊ नका, असा सल्लाही त्यांनी भाजप नेत्यांना दिला.

टॅग्स :PoliticsराजकारणNana Patoleनाना पटोलेMuslimमुस्लीमreservationआरक्षणcongressकाँग्रेसBJPभाजपा