शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गर्भकालीन मधुमेह दिन; .. तर २५ टक्के बालके विकृत जन्माला येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2022 07:10 IST

Nagpur News गर्भधारणा झाल्यापासून मधुमेहाची चाचणी करून योग्य औषधोपचार करणे गरजेचे आहे, अशी माहिती डायबेटिस इन प्रेग्नन्सी स्टडी ग्रुप ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता यांनी दिली.

ठळक मुद्देगर्भावस्थेतच मधुमेहाची चाचणी आवश्यक

नागपूर : गर्भधारणेच्या पहिल्या ८ ते १० आठवडात रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण उच्चस्तरावर (हायपरग्लेसेमिया) गेल्यास २५ टक्के बालके विकृती घेऊन जन्मास येण्याची शक्यता अधिक असते. एका अभ्यासानुसार भारतीय महिलांना गर्भकालीन मधुमेह (जीडीएम) होण्याचा धोका ११ पटीने वाढतो. यामुळे गर्भधारणा झाल्यापासून मधुमेहाची चाचणी करून योग्य औषधोपचार करणे गरजेचे आहे, अशी माहिती डायबेटिस इन प्रेग्नन्सी स्टडी ग्रुप ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता यांनी दिली.

१० मार्च हा दिवस राष्ट्रीय ‘जीडीएम’ दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी आहारतज्ज्ञ कविता गुप्ता उपस्थित होत्या. डॉ. गुप्ता म्हणाले, प्रत्येक ५व्या गर्भवती महिलांना गरोदरपणात मधुमेह होतो. प्रसूतीनंतर हा मधुमेह ९० टक्के अदृश्य होऊन जातो. परंतु प्रसूतीनंतरही वजन नियंत्रणात नसल्यास काही मातांना वयाच्या साधारण ४०व्या वर्षी ‘टाईप टू’ मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी प्रसूतीनंतर सहाव्या दिवशी, नंतर सहा आठवड्यांनी, नंतर सहा महिन्यांनी आणि नंतर दर वर्षी एकदा मधुमेहाची चाचणी करणे आवश्यक असते.

-तरुण मुलींमध्ये ‘जीडीएम’चा धोका अधिक

बदललेल्या जीवनशैलीमुळे तरुण मुलींमध्ये ‘पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम' (पीसीओएस) रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. हा महिलांमध्ये हार्मोन्सच्या असंतुलनामुळे होणारा आजार आहे. त्यामुळे प्रजनन प्रक्रियेवर परिणाम होतो. या मुलींना गर्भकालीन मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे तरुणपणीच लठ्ठपणा नियंत्रणात आणणे आवश्यक असते.

-तरुणांनाही होऊ शकतो मधुमेह

ज्या महिलांना गर्भकालीन मधुमेह असतो त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाला तरुण वयात मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. शिवाय, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोकाही असतो. गर्भकालीन मधुमेह असलेल्या ५० टक्के महिलांना प्रसूतीनंतर ५ ते १० वर्षांमध्ये मधुमेह होण्याची शक्यता असते. यामुळे प्रसूतीनंतरही मधुमेहाची चाचणी करत राहणे गरजेचे ठरते.

-७० टक्के गर्भकालीन मधुमेहावर औषधांची गरज नसते

सुदैवाने ७० टक्के गर्भकालीन मधुमेहावर औषधांची गरज नसते. केवळ आहार थेरपीद्वारे मधुमेह नियंत्रित करता येतो. म्हणूनच शासनाने प्रत्येक गर्भवती महिलांची मधुमेह चाचणी करण्याचा सूचना दिल्या आहेत. केवळ एका ग्लुकोज चॅलेंज टेस्ट (जीएसटी) मधुमेहाचे निदान केले जाऊ शकते. या चाचणीमुळे मातेचा आणि बाळाचा जीव वाचू शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यdiabetesमधुमेह