शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

घाऊकमध्ये लसूण उतरला; मात्र किरकोळमध्ये महागच!

By मोरेश्वर मानापुरे | Updated: February 18, 2024 23:34 IST

कळमन्यात दररोज १२० टन आवक : घाऊक २०० रुपये तर किरकोळमध्ये ४०० रुपये किलो, दरवाढीवर नियंत्रण आणावे

नागपूर : भाजीच्या चवीसाठी असलेली लसणाची फोडणी सध्या चांगलीच कडाडली आहे. घाऊकमध्ये भाव २०० रुपयांपर्यंत उतरल्यानंतरही किरकोळ विक्रेते ४०० ते ४५० रुपये किलो दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. कळमन्यात चार दिवसांपासून पुरवठा वाढल्याने उत्तम दर्जाच्या लसणाची २०० ते २५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. सध्या दररोज १२० टन लसणाचा पुरवठा होतो, हे विशेष.चार महिन्यांपासून आवक कमीदरवाढीमुळे स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या लसणाची जागा डिसेंबरपासून कमी झाल्याचे दिसत आहे. गावराण लसूण चारशेच्या पार गेल्याने ग्राहकांना परवडेना, अशी स्थिती आहे. नागपुरातील बहुतांश किरकोळ बाजारात डिसेंबरपासून लसणाच्या किमती चारपटीने वाढल्या. त्यामुळे किरकोळमध्ये दराने किलोमागे ४०० रुपयांचा टप्पा ओलांडला. विक्रेत्यांच्या मनमानी दरवाढीवर नियंत्रण आणण्याची ग्राहकांची मागणी आहे. कळमना आलू, कांदे आणि लसूण अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष गौरव हरडे म्हणाले, विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी आहे. मुळातच उत्पादन कमी असल्याने भाव दिवसेंदिवस वाढले. मात्र, कळमन्यात चार दिवसांपासून नवीन लसणाचा पुरवठा वाढला आहे. दररोज मध्यप्रदेश (छिंदवाडा) येथून सहा ट्रकची (प्रति ट्रक २० टन) आवक होत आहे. जुना लसूण डिसेंबर महिन्यातच संपला आणि तेव्हा नवीन मालाची आवक फारच कमी होती. थंडीच्या दिवसात मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने लसणाचे भाव गगनाला भिडले. भाव हळूहळू भाव कमी होऊन सामान्यांच्या आटोक्यात येतील.लसणाची चटणी गायब !लसणाच्या दरवाढीमुळे अनेक हॉटेल आणि घरांमध्ये लसणाची चटणी आणि लसणाचे पदार्थ मेनूमधून काढून टाकण्यात आले. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन पीक बाजारात येईपर्यंत भाव चढेच राहतील. पण आता आवक वाढताच भाव कमी झाले. त्यानंतरही किरकोळमध्ये ग्राहकाला ४०० ते ४५० रुपये किलो दरानेच लसूण खरेदी करावे लागत आहे. ऐन दिवाळीतही लसूण महागल्याने सामान्यांना थोडी महागाई सोसावी लागली होती.लसणाचे दर का वाढले?प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका पिकांवर पडला. खराब हवामानामुळे मुख्यत्त्वे लसणाचे पीक खराब झाले आणि दर वाढले. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ग्राहकांनीदेखील पाठ फिरवली. रोजच्या जेवणामध्ये महत्वाचा घटक असणाऱ्या लसणाचे दर असेच राहिले तर खायचे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.लसणासोबत अद्रकही महागगौरव हरडे म्हणाले, खराब हवामानाचा फटका लसणासोबत अद्रक पिकालाही बसला. कळमना घाऊक बाजारात १०० रुपये किलोवर पोहोचलेले अद्रकाचे दर ८० ते ९० रुपयांपर्यंत कमी झाले. मात्र, किरकोळमध्ये २०० रुपये किलो दर आहेत. अद्रक असो वा लसूण किरकोळ विक्रेते रोखीने माल खरेदी करून तब्बल १५ ते २० दिवस साठवणूक करतात. त्यातील काही टक्के माल खराब होतो. त्याची भरपाई म्हणून त्यांना माल जास्त दरात विकावा लागतो.

टॅग्स :MarketबाजारFarmerशेतकरी