शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

घाऊकमध्ये लसूण उतरला; मात्र किरकोळमध्ये महागच!

By मोरेश्वर मानापुरे | Updated: February 18, 2024 23:34 IST

कळमन्यात दररोज १२० टन आवक : घाऊक २०० रुपये तर किरकोळमध्ये ४०० रुपये किलो, दरवाढीवर नियंत्रण आणावे

नागपूर : भाजीच्या चवीसाठी असलेली लसणाची फोडणी सध्या चांगलीच कडाडली आहे. घाऊकमध्ये भाव २०० रुपयांपर्यंत उतरल्यानंतरही किरकोळ विक्रेते ४०० ते ४५० रुपये किलो दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. कळमन्यात चार दिवसांपासून पुरवठा वाढल्याने उत्तम दर्जाच्या लसणाची २०० ते २५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. सध्या दररोज १२० टन लसणाचा पुरवठा होतो, हे विशेष.चार महिन्यांपासून आवक कमीदरवाढीमुळे स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या लसणाची जागा डिसेंबरपासून कमी झाल्याचे दिसत आहे. गावराण लसूण चारशेच्या पार गेल्याने ग्राहकांना परवडेना, अशी स्थिती आहे. नागपुरातील बहुतांश किरकोळ बाजारात डिसेंबरपासून लसणाच्या किमती चारपटीने वाढल्या. त्यामुळे किरकोळमध्ये दराने किलोमागे ४०० रुपयांचा टप्पा ओलांडला. विक्रेत्यांच्या मनमानी दरवाढीवर नियंत्रण आणण्याची ग्राहकांची मागणी आहे. कळमना आलू, कांदे आणि लसूण अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष गौरव हरडे म्हणाले, विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी आहे. मुळातच उत्पादन कमी असल्याने भाव दिवसेंदिवस वाढले. मात्र, कळमन्यात चार दिवसांपासून नवीन लसणाचा पुरवठा वाढला आहे. दररोज मध्यप्रदेश (छिंदवाडा) येथून सहा ट्रकची (प्रति ट्रक २० टन) आवक होत आहे. जुना लसूण डिसेंबर महिन्यातच संपला आणि तेव्हा नवीन मालाची आवक फारच कमी होती. थंडीच्या दिवसात मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने लसणाचे भाव गगनाला भिडले. भाव हळूहळू भाव कमी होऊन सामान्यांच्या आटोक्यात येतील.लसणाची चटणी गायब !लसणाच्या दरवाढीमुळे अनेक हॉटेल आणि घरांमध्ये लसणाची चटणी आणि लसणाचे पदार्थ मेनूमधून काढून टाकण्यात आले. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन पीक बाजारात येईपर्यंत भाव चढेच राहतील. पण आता आवक वाढताच भाव कमी झाले. त्यानंतरही किरकोळमध्ये ग्राहकाला ४०० ते ४५० रुपये किलो दरानेच लसूण खरेदी करावे लागत आहे. ऐन दिवाळीतही लसूण महागल्याने सामान्यांना थोडी महागाई सोसावी लागली होती.लसणाचे दर का वाढले?प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका पिकांवर पडला. खराब हवामानामुळे मुख्यत्त्वे लसणाचे पीक खराब झाले आणि दर वाढले. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ग्राहकांनीदेखील पाठ फिरवली. रोजच्या जेवणामध्ये महत्वाचा घटक असणाऱ्या लसणाचे दर असेच राहिले तर खायचे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.लसणासोबत अद्रकही महागगौरव हरडे म्हणाले, खराब हवामानाचा फटका लसणासोबत अद्रक पिकालाही बसला. कळमना घाऊक बाजारात १०० रुपये किलोवर पोहोचलेले अद्रकाचे दर ८० ते ९० रुपयांपर्यंत कमी झाले. मात्र, किरकोळमध्ये २०० रुपये किलो दर आहेत. अद्रक असो वा लसूण किरकोळ विक्रेते रोखीने माल खरेदी करून तब्बल १५ ते २० दिवस साठवणूक करतात. त्यातील काही टक्के माल खराब होतो. त्याची भरपाई म्हणून त्यांना माल जास्त दरात विकावा लागतो.

टॅग्स :MarketबाजारFarmerशेतकरी