शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

घाऊकमध्ये लसूण उतरला; मात्र किरकोळमध्ये महागच!

By मोरेश्वर मानापुरे | Updated: February 18, 2024 23:34 IST

कळमन्यात दररोज १२० टन आवक : घाऊक २०० रुपये तर किरकोळमध्ये ४०० रुपये किलो, दरवाढीवर नियंत्रण आणावे

नागपूर : भाजीच्या चवीसाठी असलेली लसणाची फोडणी सध्या चांगलीच कडाडली आहे. घाऊकमध्ये भाव २०० रुपयांपर्यंत उतरल्यानंतरही किरकोळ विक्रेते ४०० ते ४५० रुपये किलो दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. कळमन्यात चार दिवसांपासून पुरवठा वाढल्याने उत्तम दर्जाच्या लसणाची २०० ते २५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. सध्या दररोज १२० टन लसणाचा पुरवठा होतो, हे विशेष.चार महिन्यांपासून आवक कमीदरवाढीमुळे स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या लसणाची जागा डिसेंबरपासून कमी झाल्याचे दिसत आहे. गावराण लसूण चारशेच्या पार गेल्याने ग्राहकांना परवडेना, अशी स्थिती आहे. नागपुरातील बहुतांश किरकोळ बाजारात डिसेंबरपासून लसणाच्या किमती चारपटीने वाढल्या. त्यामुळे किरकोळमध्ये दराने किलोमागे ४०० रुपयांचा टप्पा ओलांडला. विक्रेत्यांच्या मनमानी दरवाढीवर नियंत्रण आणण्याची ग्राहकांची मागणी आहे. कळमना आलू, कांदे आणि लसूण अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष गौरव हरडे म्हणाले, विशेष म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून घाऊक बाजारात लसणाची आवक कमी आहे. मुळातच उत्पादन कमी असल्याने भाव दिवसेंदिवस वाढले. मात्र, कळमन्यात चार दिवसांपासून नवीन लसणाचा पुरवठा वाढला आहे. दररोज मध्यप्रदेश (छिंदवाडा) येथून सहा ट्रकची (प्रति ट्रक २० टन) आवक होत आहे. जुना लसूण डिसेंबर महिन्यातच संपला आणि तेव्हा नवीन मालाची आवक फारच कमी होती. थंडीच्या दिवसात मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने लसणाचे भाव गगनाला भिडले. भाव हळूहळू भाव कमी होऊन सामान्यांच्या आटोक्यात येतील.लसणाची चटणी गायब !लसणाच्या दरवाढीमुळे अनेक हॉटेल आणि घरांमध्ये लसणाची चटणी आणि लसणाचे पदार्थ मेनूमधून काढून टाकण्यात आले. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नवीन पीक बाजारात येईपर्यंत भाव चढेच राहतील. पण आता आवक वाढताच भाव कमी झाले. त्यानंतरही किरकोळमध्ये ग्राहकाला ४०० ते ४५० रुपये किलो दरानेच लसूण खरेदी करावे लागत आहे. ऐन दिवाळीतही लसूण महागल्याने सामान्यांना थोडी महागाई सोसावी लागली होती.लसणाचे दर का वाढले?प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका पिकांवर पडला. खराब हवामानामुळे मुख्यत्त्वे लसणाचे पीक खराब झाले आणि दर वाढले. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ग्राहकांनीदेखील पाठ फिरवली. रोजच्या जेवणामध्ये महत्वाचा घटक असणाऱ्या लसणाचे दर असेच राहिले तर खायचे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.लसणासोबत अद्रकही महागगौरव हरडे म्हणाले, खराब हवामानाचा फटका लसणासोबत अद्रक पिकालाही बसला. कळमना घाऊक बाजारात १०० रुपये किलोवर पोहोचलेले अद्रकाचे दर ८० ते ९० रुपयांपर्यंत कमी झाले. मात्र, किरकोळमध्ये २०० रुपये किलो दर आहेत. अद्रक असो वा लसूण किरकोळ विक्रेते रोखीने माल खरेदी करून तब्बल १५ ते २० दिवस साठवणूक करतात. त्यातील काही टक्के माल खराब होतो. त्याची भरपाई म्हणून त्यांना माल जास्त दरात विकावा लागतो.

टॅग्स :MarketबाजारFarmerशेतकरी