शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

फुटाळा, सक्करदरा सलाईनवर : गणपती विसर्जनानंतर तलावाची अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 22:32 IST

विसर्जनानंतर तलाव किती प्रदूषित झाले याचा आढावा ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेने घेतला. काही सूक्ष्म निरीक्षणाद्वारे आलेल्या निष्कर्षावरून फुटाळा व सक्करदरा तलाव सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देपर्यावरणवादी संस्थेने केले तलावातील पाण्याचे निरीक्षण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : तलाव हा शहराचा ऐतिहासिक ठेवा आहे. पूर्वी तलावाचा उपयोग व्हायचा. मात्र आता तलाव हे फक्त धार्मिक विसर्जनासाठी वापरले जातात. विसर्जनामुळे तलाव प्रदूषित होत असल्याने महापालिकेने यावर्षी फुटाळा सोडल्यास चार तलावावर निर्बंध घातले. विसर्जनानंतर तलाव किती प्रदूषित झाले याचा आढावा ग्रीन व्हिजिल या पर्यावरणवादी संस्थेने घेतला. काही सूक्ष्म निरीक्षणाद्वारे आलेल्या निष्कर्षावरून फुटाळा व सक्करदरा तलाव सलाईनवर असल्याचे दिसून येत आहे. तर सोनेगाव व गांधीसागर तलावाची अवस्था ठिकठाक असल्याचे दिसते आहे.‘अर्थ इको इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत मिळून ग्रीन व्हिजिल संस्थेने गणपती विसर्जनानंतर शहरातील चार मुख्य तलावांचे निरीक्षण केले. संस्थेने गणपती विसर्जनापूर्वीसुद्धा तलावाचे निरीक्षण केले होते. विसर्जनानंतर केलेल्या निरीक्षणात फुटाळा व सक्करदरा तलावाच्या पाण्यात प्रदूषण झाल्याचे निदर्शनास आले. या निरीक्षणात त्यांनी तलावातील पाण्याचे पीएच, गढुळपणा व पाण्यात मिसळलेले ऑक्सिजन याचे परीक्षण केले. या परीक्षणात गणपती विसर्जनाचा सर्वाधिक फटका फुटाळा तलावाला बसल्याचे दिसून आले. गणपती विसर्जनापूर्वी फुटाळ्यात ऑक्सिजनची मात्रा ४ ते ४.५ मिलीग्रॅम होती. विसर्जनानंतर ३ ते ३.५ मिलीग्रॅम नोंदविण्यात आली. तलावाच्या पाण्यात गढुळपणासुद्धा वाढल्याचेही दिसून आले. तलावातील पाण्याचा पीएच मात्र कायम होता. सक्करदरा तलावात गणपती विसर्जनावर निर्बंध घातले होते. परंतु तलावात मोठ्या प्रमाणात जलकुंभ आहेत. त्यामुळे ऑक्सिजनच्या मात्रेवर परिणाम झाला आहे. तलावातील पाण्यात गढुळपणा वाढला असून, पीएच कायम आहे.गांधीसागर व सोनेगावची स्थिती बरीमनपाने गांधीसागर व सोनेगाव तलावात गणपतींच्या मूर्तीचे विसर्जन होऊ नये म्हणून उपाययोजना केल्या होत्या. येथे विसर्जन झाले नाही. त्यामुळे या दोन्ही तलावाच्या पाण्याच्या ऑक्सिजनच्या मात्रेत फारसा फरक पडला नाही. गढुळपणाही कमी आढळून आला. तलावातील पीएच बऱ्यापैकी आहे. तलावाच्या इको सिस्टमवर होतोय परिणामतलावातील पाण्यात ऑक्सिजनची मात्रा कमी झाल्याने त्याचा परिणाम जलचरावर होतो. फुटाळ्यात मोठ्या प्रमाणात झालेले विसर्जन लक्षात घेता, त्याची सफाई लवकरात लवकर होणे आवश्यक आहे. बंद पडलेले कारंजे तत्काळ सुरू करणे आवश्यक आहे. डिजॉल्ड ऑक्सिजनची मात्रा दोन मिलिग्रॅमपर्यंत गेल्यास तलावाची इको सिस्टम बिघडू शकते. तसेच सक्करदरा तलावातील जलकुंभ साफ करणे गरजेचे आहे.सुरभी जैस्वाल, टीम लीडर, ग्रीन व्हिजिल

टॅग्स :Futala Lakeफुटाळा तलावpollutionप्रदूषण