शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

घाटावर अंत्यसंस्कारही सुखाने नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होत आहेत. परंतु ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होत आहेत. परंतु नुसते प्रमुख रस्ते चकाचक झाल्याने शहराचा चौफेर विकास होणार नाही. उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध असणे तितकेच महत्त्वाचे आहे. जरीपटका भागातील रस्ते चांगले झाले आहे. परंतु लगतच्याच नारा घाटावरील सुविधांकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. येथे मुतारीची व्यवस्था नाही. पाण्याचा नियमित पुरवठा होत नाही. लाकूड ठेवण्याच्या गोदामाचे छत जीर्ण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसात लाकडे ओली होतात. यामुळे अंत्यसंस्कार करताना लाकडे रॉकेल ओतूनही पेटत नाही. बाजूच्या नदीची भिंत तुटली असल्याने येथे डुकरांचा मुक्त संचार आहे. परिसराची स्वच्छता ठेवली जात नाही. घटावरील विहिरीत कचरा साचला आहे. विहीर स्वच्छ ठेवल्यास येथील पाण्याचा वेळप्रसंगी वापर करता येईल. पण याकडे दुर्लक्ष आहे. लगतच्या नारा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. गॅस गोडाऊन लगत वाहणाऱ्या नाल्याची सफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. नाल्याला संरक्षक कठडे नसल्याने रात्रीच्या अंधारात वाहन थेट नाल्यात पडून अपघाताचा धोका आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.

....

लाकडाच्या गोदामाचे छत जीर्ण

नारा घाटावर लाकूड ठेवण्यासाठी असलेल्या गोदामाचे टिनाचे छत जीर्ण झाले आहे. पावसाच्या पाण्याने लाकडे ओली होतात. अंत्यसंस्कार करताना मृतांच्या नातेवाईकांना त्रास होतो. ते तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे. येथे पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. गोदामाच्या बाजूला अंत्यसंस्कारासाठी असलेले लोखंडी छत जीर्ण झाल्याने वापरता येत नाही. त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. बाथरुमची व्यवस्था नाही. परिसरात नियमित साफसफाई होत नाही. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

- कमल चूहडमल मोटवानी, महासचिव सिंधी पंचायत

...

बाथरुमची व्यवस्था करावी

नारा घाटावर अंत्यंसस्कारासाठी महिलाही येतात. येथे बाथरुमची व्यवस्था नसल्याने महिलांची कुचंबणा होते. घाटावर दर्शनीभागात सेवाभावी संस्थेने लावलेल्या नळांना पाणी राहत नाही, याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच संरक्षण भिंत दुरुस्तीची गरज आहे. परिसरात डागडुजी होणे गरजेचे आहे.

- रमेश खोब्रागडे

...

नारा रोडची दुरुस्ती नाही

नारा घाटापासून नारा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची मागणी काही वर्षांत दुरुस्ती झालेली नाही. गॅस गोडाऊन जवळ रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात येथे पाणी साचते. बाजूच्या नाल्याची साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. डासांचा त्रास वाढला आहे. तक्रार करूनही मनपा प्रशासन याकडे लक्ष देत नाही.

-कमल मोहिया

...

नाल्याला कठडे नसल्याने अपघाताचा धोका

गॅस गोडाऊन लगत वाहणाऱ्या नाल्याला संरक्षक कठडे नसल्याने रात्रीच्या अंधारात अपघात होण्याचा धोका आहे. पावसाळाच्या दिवसात नाल्याला पूर आल्यास आजूबाजूला पाणी साचते. येथील रस्त्याची मागील ८-१० वर्षात दुरुस्ती झालेली नाही. धुळीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. यासंदर्भात तक्रार करूनही मनपा प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.

- विजय सिंग

.....

डुकरांचा त्रास

नारा परिसरातून वाहणारी पिवळी नदी व तीन नाल्यांची साफसफाई होत नसल्याने डुकरांचा मुक्त संचार आहे. यामुळे आजूबाजूच्या वस्त्यातील नागरिकांना त्रास होतो. डुकरांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या परंतु मनपा प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

....

जागोजागी कचरा साचून

पसिरात दररोज कचरा उचलला जात नाही. पिवळी नदीकाठावर निरुपयोगी मटेरियल टाकले जाते. रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी कचरा साचून आहे. यामुळे नागरिकांना त्रास होतो. या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यासाठी नियमित फवारणीची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.

...

नाल्याला संरक्षण भिंत नाही

नारा परिसरातून वाहणाऱ्या नाल्याला संरक्षण भिंत नाही. पावसाळ्याच्या दिवसात वस्त्यात पाणी शिरते. संरक्षण भिंतीची वेळोवेळी मागणी करण्यात आली. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. संरक्षण भिंत नसल्याने परिसरातील कचरा नाल्यात टाकला जातो. यामुळे दुर्गंधी पसरते.