शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

घाटावर अंत्यसंस्कारही सुखाने नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होत आहेत. परंतु ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होत आहेत. परंतु नुसते प्रमुख रस्ते चकाचक झाल्याने शहराचा चौफेर विकास होणार नाही. उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा उपलब्ध असणे तितकेच महत्त्वाचे आहे. जरीपटका भागातील रस्ते चांगले झाले आहे. परंतु लगतच्याच नारा घाटावरील सुविधांकडे मात्र महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. येथे मुतारीची व्यवस्था नाही. पाण्याचा नियमित पुरवठा होत नाही. लाकूड ठेवण्याच्या गोदामाचे छत जीर्ण झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसात लाकडे ओली होतात. यामुळे अंत्यसंस्कार करताना लाकडे रॉकेल ओतूनही पेटत नाही. बाजूच्या नदीची भिंत तुटली असल्याने येथे डुकरांचा मुक्त संचार आहे. परिसराची स्वच्छता ठेवली जात नाही. घटावरील विहिरीत कचरा साचला आहे. विहीर स्वच्छ ठेवल्यास येथील पाण्याचा वेळप्रसंगी वापर करता येईल. पण याकडे दुर्लक्ष आहे. लगतच्या नारा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. गॅस गोडाऊन लगत वाहणाऱ्या नाल्याची सफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. नाल्याला संरक्षक कठडे नसल्याने रात्रीच्या अंधारात वाहन थेट नाल्यात पडून अपघाताचा धोका आहे. एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.

....

लाकडाच्या गोदामाचे छत जीर्ण

नारा घाटावर लाकूड ठेवण्यासाठी असलेल्या गोदामाचे टिनाचे छत जीर्ण झाले आहे. पावसाच्या पाण्याने लाकडे ओली होतात. अंत्यसंस्कार करताना मृतांच्या नातेवाईकांना त्रास होतो. ते तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे. येथे पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. गोदामाच्या बाजूला अंत्यसंस्कारासाठी असलेले लोखंडी छत जीर्ण झाल्याने वापरता येत नाही. त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. बाथरुमची व्यवस्था नाही. परिसरात नियमित साफसफाई होत नाही. याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

- कमल चूहडमल मोटवानी, महासचिव सिंधी पंचायत

...

बाथरुमची व्यवस्था करावी

नारा घाटावर अंत्यंसस्कारासाठी महिलाही येतात. येथे बाथरुमची व्यवस्था नसल्याने महिलांची कुचंबणा होते. घाटावर दर्शनीभागात सेवाभावी संस्थेने लावलेल्या नळांना पाणी राहत नाही, याकडे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच संरक्षण भिंत दुरुस्तीची गरज आहे. परिसरात डागडुजी होणे गरजेचे आहे.

- रमेश खोब्रागडे

...

नारा रोडची दुरुस्ती नाही

नारा घाटापासून नारा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची मागणी काही वर्षांत दुरुस्ती झालेली नाही. गॅस गोडाऊन जवळ रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात येथे पाणी साचते. बाजूच्या नाल्याची साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. डासांचा त्रास वाढला आहे. तक्रार करूनही मनपा प्रशासन याकडे लक्ष देत नाही.

-कमल मोहिया

...

नाल्याला कठडे नसल्याने अपघाताचा धोका

गॅस गोडाऊन लगत वाहणाऱ्या नाल्याला संरक्षक कठडे नसल्याने रात्रीच्या अंधारात अपघात होण्याचा धोका आहे. पावसाळाच्या दिवसात नाल्याला पूर आल्यास आजूबाजूला पाणी साचते. येथील रस्त्याची मागील ८-१० वर्षात दुरुस्ती झालेली नाही. धुळीमुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. यासंदर्भात तक्रार करूनही मनपा प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही.

- विजय सिंग

.....

डुकरांचा त्रास

नारा परिसरातून वाहणारी पिवळी नदी व तीन नाल्यांची साफसफाई होत नसल्याने डुकरांचा मुक्त संचार आहे. यामुळे आजूबाजूच्या वस्त्यातील नागरिकांना त्रास होतो. डुकरांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या परंतु मनपा प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नसल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

....

जागोजागी कचरा साचून

पसिरात दररोज कचरा उचलला जात नाही. पिवळी नदीकाठावर निरुपयोगी मटेरियल टाकले जाते. रस्त्याच्या बाजूला ठिकठिकाणी कचरा साचून आहे. यामुळे नागरिकांना त्रास होतो. या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यासाठी नियमित फवारणीची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले.

...

नाल्याला संरक्षण भिंत नाही

नारा परिसरातून वाहणाऱ्या नाल्याला संरक्षण भिंत नाही. पावसाळ्याच्या दिवसात वस्त्यात पाणी शिरते. संरक्षण भिंतीची वेळोवेळी मागणी करण्यात आली. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. संरक्षण भिंत नसल्याने परिसरातील कचरा नाल्यात टाकला जातो. यामुळे दुर्गंधी पसरते.