शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

लग्नाच्या नावाखाली दोनवेळा साैदा; उपराजधानीतील तरुणीची गुजरातमध्ये दोन वेळा विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 11:05 IST

Nagpur News लग्नाच्या नावाखाली साैदा करून एका गरीब कुटुंबातील तरुणीची दोन वेळा विक्री केल्याचे संतापजनक प्रकरण पुढे आले आहे.

ठळक मुद्दे लैंगिक शोषणानंतर सोडले वाऱ्यावर नऊ महिने नरकयातनासामाजिक कार्यकर्त्यांमुळे प्रकरण उजेडातटोळीकडून अनेक महिला-मुलींची विक्री

नरेश डोंगरे ।

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - लग्नाच्या नावाखाली साैदा करून एका गरीब कुटुंबातील तरुणीची दोन वेळा विक्री केल्याचे संतापजनक प्रकरण पुढे आले आहे. ‘लोकमत’ने केलेल्या प्राथमिक चाैकशीत तरुणीची विक्री करणाऱ्यांमध्ये नागपूरसह गुजरातमधील दलालांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. या टोळीने यापूर्वीही अनेक तरुणींची अशाच प्रकारे विक्री केल्याचा एकूणच घडामोडीवरून संशय निर्माण झाला आहे.

पीडित तरुणी सीमा (नाव बदललेले, वय २२) बिडीपेठ, सक्करदऱ्यात राहते. तिच्या कुटुंबात दोन भाऊ आणि आईवडील आहेत. घरची परिस्थिती जेमतेम आहे. चुणचुणीत अन् दिसायला बऱ्यापैकी असलेल्या या तरुणीकडे तरुणींना फूस लावून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीतील बेबी ठाकरेची नजर गेली. ऑगस्ट २०२० मध्ये तिने सीमाच्या आई कल्पना (काल्पनिक नाव)वर जाळे फेकले. गुजरातमध्ये एका चांगल्या कुटुंबातील इंजिनियर मुलगा लग्नासाठी तयार असल्याचे ठाकरेने सांगितले. एवढ्या दूर मुलीला द्यायचे नाही, असे सांगून कल्पनांनी तिचा प्रस्ताव ठोकरला. त्यामुळे ठाकरेने सीमाला फूस लावली. इंजिनियर मुलगा नवरा म्हणून मिळेल. चांगले घर आणि त्यामुळे तू सुखी होशील.तुझ्या कुटुंबीयांनाही आधार देऊ शकशील, असे म्हटले. सीमाला ते पटले अन् नंतर पहिल्याच फेरीत ठाकरेसोबत सीमा, तिची आई कल्पनासह अहमदाबाद (गुजरात)ला पोहचली. तेथे शांताबाई पटेलच्या मध्यस्थीने धवलकुमार भाईचंद्र पटेल नामक व्यक्तीसोबत १८ सप्टेंबरला सीमाचे लग्न लागले.

सहा महिन्यानंतर भंडाफोड

काही दिवस चांगले गेल्यानंतर रुळलेली सीमा घरात हक्क दाखवू लागल्याने तिच्या घरात कुटुंबकलह वाढला. दिराने तिला हक्क दाखवू नको, तुला दोन लाख रुपये मोजून विकत घेतले, असे म्हटले. त्यामुळे सीमाने आईला फोन करून येथे बेबी ठाकरेने आपल्याला विकल्याचे सांगितले. त्यावरून बेबी ठाकरेला जाब विचारल्यानंतर कल्पना तडक अहमदाबादला पोहचल्या. तेथे शांताबाई पटेलच्या घरी लग्नाच्या नावाखाली सीमाची खरेदी विक्री झाल्याचे उघड झाले. यानंतर पोलिसांत जाऊ नये म्हणून शांताबाईने कल्पना यांच्या हातात जबरदस्तीने २० हजार रुपये ठेवून प्रकरण दडपले. कल्पना नागपुरात परतल्या अन् तिकडे सीमाचा छळ वाढतच गेला. तो असह्य झाल्यामुळे सीमा २७ मार्च २०२१ ला माहेरी परतली.

दुसऱ्या अंकाची सुरुवात

दीड-दोन महिने झाल्यानंतर सीमाची समजूत काढून तिला सासरी परतण्यासाठी आईने तयार केले. या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असलेली पार्वतीबाई त्रिपाल हिने आपल्याला राजकोटला जायचे आहे म्हणून मायलेकीची सोबत धरली. सीमा, तिची आई अन् पार्वताबाई अशा तिघी सीमाच्या कथित सासुरवाडीत अहमदाबादला ५ मे रोजी पोहचल्या. सीमाच्या घरी वाद सुटण्याचे नाव घेत नव्हते. अशात १८ मे रोजी पार्वताबाई सीमाच्या घरी पोहचली अन् तिने सीमा तसेच तिच्या आईला वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जाऊ असे सांगून राजकोटला नेले. घोडाजी गावात पार्वताबाईची साथीदार बेबी पराते आणि रेखा कुसरे एका पुरुषासोबत आली. त्यांनी सर्वांनी मिळून दीड लाखात सीमाला बिपीन पटेलला विकले. मायलेकींनी विरोध केला असता त्यांना बलात्कार करून मारून टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्या.

कल्पना यांनाही विकण्याचा प्रस्ताव

मुलीला सासरी पोहचविण्याच्या हेतूने नागपुरातून निघालेल्या कल्पना यांना या घटनेमुळे प्रचंड मानसिक धक्का बसला. राजकोट जवळच्या घोडाजी गावात सीमाला अनोळखी गुंडांच्या तावडीत ठेवून त्या नागपूरकडे निघाल्या. सोबत पार्वतबाई त्रिपाल, बेबी पराते आणि रेखा कुसरे होत्या. धावत्या रेल्वेेत कल्पना यांनी या तिघींना मुलीला विकल्याबद्दल त्यांच्यावर तोंडसुख घेतले. यावेळी आरोपी महिलांनी तिला धावत्या रेल्वेतून फेकून देण्याची धमकी दिली. काही वेळानंतर तुझे वय जास्त नाही. तू इंदोरला चल, तेथे तुला ५० हजारात एकाला विकतो. आम्ही ३० हजार ठेवू तुला २० हजार देऊ असे सांगून कल्पना यांनाही विकण्याचा प्रस्ताव ठेवला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी