शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

परीक्षेच्या पहिल्याच दिवशी भरारी पथक फिरकलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 11:50 PM

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली. नागपूर बोर्डाने स्थापन केलेल्या भरारी पथकाच्या अहवालानुसार इंग्रजीच्या पेपरला कॉपीची केवळ ११ प्रकरणे पुढे आली. या अहवालाच्या आधारावर बोर्डाचे अधिकारी कॉपीमुक्त अभियान यशस्वी झाल्याचा दावा करीत असले तरी, अधिकाऱ्यांचा दुसरा वर्गाने या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहे. सोबतच विभागातील अनेक परीक्षा केंद्रात मोठ्या प्रमाणात कॉपी चालल्याचा दावाही केला आहे. त्यांनी खाजगीत खुलासा केला की, पहिल्याच दिवशी भरारी पथकाने केवळ खानापूर्ती केली.

ठळक मुद्देतरीही बोर्डाच्या अधिकाऱ्यांचा दावा, कॉपीवर लावला लगामबारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली. नागपूर बोर्डाने स्थापन केलेल्या भरारी पथकाच्या अहवालानुसार इंग्रजीच्या पेपरला कॉपीची केवळ ११ प्रकरणे पुढे आली. या अहवालाच्या आधारावर बोर्डाचे अधिकारी कॉपीमुक्त अभियान यशस्वी झाल्याचा दावा करीत असले तरी, अधिकाऱ्यांचा दुसरा वर्गाने या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहे. सोबतच विभागातील अनेक परीक्षा केंद्रात मोठ्या प्रमाणात कॉपी चालल्याचा दावाही केला आहे. त्यांनी खाजगीत खुलासा केला की, पहिल्याच दिवशी भरारी पथकाने केवळ खानापूर्ती केली.बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार परीक्षेच्या दरम्यान कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी ४५ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. सोबतच विभागीय कार्यालयाकडून ५ दक्षता पथकाची नियुक्ती केली होती. शिवाय एका पथकाला परीक्षा केंद्राच्या चित्रीकरणाची जबाबदारीही दिली होती. ४५ पैकी ३५ भरारी पथकांनी कॉपीमुक्त अभियान यशस्वी झाल्याचा अहवाल बोर्डाला दिला आहे. पथकाने दिलेल्या अहवालाची बोर्डाने तपासणी केली काय, असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला असता, बोर्डाचे विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी कुठलेही उत्तर दिले नाही. हे सुद्धा स्पष्ट केले नाही, की भरारी पथक कुठल्या केंद्रावर गेले होते. यासंदर्भात बोर्डाच्या अधिकाऱ्याकडे माहिती नाही. सूत्रांनी सांगितले की, बहुतांश भरारी पथकांनी निरीक्षणाच्या नावावर केवळ खानापूर्ती केली. आजूबाजूच्या केंद्राला भेटी देऊन अहवाल दिला. काही भरारी पथकाने दिवसभरात एक अथवा दोन केंद्रालाच भेट दिली.सूत्रांच्या मते गोंदिया जिल्ह्यात गोंदिया शहर, सडकअर्जुनी, आमगाव हा भाग कॉपीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर भंडारा जिल्ह्यातील तुमसर, लाखनी, वरठी, साकोली व भंडारा शहरात सुद्धा कॉपी मोठ्या प्रमाणात होतात. वर्धा जिल्ह्यात देवरी, आष्टी, वर्धा शहर, समुद्रपुर, नांदगाव तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी कॉपीसाठी प्रसिद्ध आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक, पारशिवनी, मौदा, काटोल, जलालखेडा, हिंगणा, कुही, कामठी, नरखेड या भागात सुद्धा कॉपी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे बोर्ड या क्षेत्रातील परीक्षा केंद्रावर विशेष लक्ष ठेवते. यावेळी या सर्व भागातून कॉपी सापडल्याचे एकही प्रकरण पुढे आले नसल्याचा दावा करण्यात येत आहे. पण बोर्डाच्या अधिकाऱ्यांना या दाव्यावर विश्वास नाही.सर्व काही ठिक आहेयासंदर्भात बोर्डाचे विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांच्याशी संपर्क केला असता, अहवालाचा हवाला देत म्हणाले की, आतापर्यंत आलेल्या अहवालाच्या आधारे कॉपी सापडल्या नाही.इंग्रजीचा पेपर आणि ११ कॉपीसूत्रांच्या मते इंग्रजीचा पेपर विद्यार्थ्यांसाठी कि लर ठरतो. यावर्षी तर इंग्रजीच्या अभ्यासक्रमाचा पॅटर्न बदलला आहे. नवीन पॅटर्न असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीती होती. गेल्या वर्षी इंग्रजीच्या पेपरला अनेक केंद्रावर पोते भरून कॉपी निघाल्या होत्या. परंतु यावर्षी केवळ ११ कॉपी सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.कुठे उत्तरपत्रिका तर कुठे प्रश्नपत्रिका कमी पडल्यासूत्रांच्या मते परीक्षा सुरू झाल्यानंतर विभागात २१ केंद्रावर उत्तर पत्रिका कमी पडल्या तर ७ केंद्रावर प्रश्नपत्रिका कमी पडल्या. काही केंद्रावर विद्यार्थ्यांना दिलेल्या उत्तर पत्रिका कमी दर्जाच्या होत्या. विद्यार्थ्यांनी त्याची माहिती पर्यवेक्षकांनाही दिली. केंद्र संचालकांनी याची माहिती बोर्डाकडे दिली. पण विद्यार्थ्यांना त्याच उत्तरपत्रिकेवर पेपर सोडविण्यास सांगण्यात आले.कॉपीमुक्त अभियानाचा दबावसूत्रांचे म्हणणे आहे की, बोर्डाने कॉपीमुक्त अभियान राबविले आहे. या अभियानात स्वत:ला यशस्वी ठरविण्यासाठी बोर्डाने परीक्षेत होणाऱ्याकॉपीकडे दुर्लक्ष केले आहे.

 

टॅग्स :Schoolशाळाexamपरीक्षा