शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

सिकलसेलवर पहिले ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट’; ७ वर्षाच्या मुलाला मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2023 21:43 IST

Nagpur News ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट फॉर हिमोग्लोबिनोपॅथी’ हा उपचार करून एका ७ वर्षीय मुलाचे सिकलसेल समूळ नष्ट केले. मध्य भारतात पहिल्यांदाच ही उपचार पद्धती वापरल्याचा दावा नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने केला आहे.

 

नागपूर : सिकलसेल म्हणजे, रक्तातील लाल पेशींचा रोग. या आजारावर अद्याप कोणतेही प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. मात्र, ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट फॉर हिमोग्लोबिनोपॅथी’ हा उपचार करून एका ७ वर्षीय मुलाचे सिकलसेल समूळ नष्ट केले. मध्य भारतात पहिल्यांदाच ही उपचार पद्धती वापरल्याचा दावा नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने केला आहे.

सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार. यात रुग्णाच्या शरीरातील रक्त पेशी गोल आकाराऐवजी विळ्याच्या आकारासारख्या होतात. जिवंतपणीच मरणयातना देणारा आजार म्हणूनही ओळखले जाते. छत्तीसगड येथील एका ७ वर्षीय मुलाला गंभीर प्रकारातील सिकलसेल होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याला ‘ब्रेन स्टोक’ आला. यामुळे प्रकृती खालावली. पालकांनी त्याला नागपूरच्या ‘न्यू इरा मदर ॲण्ड चाइल्ड हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. येथील वरिष्ठ सल्लागार व लहान मुलांचा हेमेटोलॉजी-ऑन्कोलॉजी ॲण्ड ‘बीएमटी’चे प्रमुख डॉ. आतिश बकाने यांनी तपासले. मुलाचा जीव वाचविण्यासाठी ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट फॉर हिमोग्लोबिनोपॅथी’ करण्याचा सल्ला दिला. त्यांच्याकडून परवानगी येताच या नव्या उपचार पद्धतीचा वापर करून रुग्णाला नवे आयुष्य दिले.

- मोठ्या बहिणीचे ‘स्टेम सेल’ जुळले

डॉ. बकाने यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या उपचारात रुग्णाशी जुळणारा स्टेमसेल दाता शोधणे व मोठा खर्च हे दोन मोठे आव्हान होते. सुदैवाने खर्चासाठी ‘सीएसआर’ निधी मिळाला. सोबतच रुग्णाच्या मोठ्या बहिणीचे स्टेम सेल जुळले. रुग्णावर ‘ॲलोजेनिक बोनमॅरो ट्रान्सप्लांट’ करण्यात आले. ही एक मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. परंतु हृदय शल्यचिकित्सक डॉ आनंद संचेती, हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद भुतडा यांच्या मार्गदर्शनात तज्ज्ञ डॉक्टरांसह प्रशिक्षण आणि कौशल्यप्राप्त चमूमुळे रुग्णाला नवे आयुष्य मिळाले. ३० दिवसांनंतर म्हणजे, आज सोमवारी रुग्णाला सुटी देण्यात आली.

-हिमोग्लोबीनच्या विविध आजारात आशेचे किरण

डॉ. बकाने म्हणाले, याआधी नागपुरात अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा कर्करोगाच्या रुग्णावर ‘ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट’ झाले. ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट फॉर हिमोग्लोबिनोपॅथी’ या उपचार पद्धतीमध्ये सुसंगत दात्याकडून निरोगी ‘हेमॅटोपोएटिक स्टेम सेल’चा वापर झाला. यामुळे ही नागपुरातीलच नव्हे तर मध्य भारतातील पहिली पहिली यशस्वी ‘ॲलोजेनिक बीएमटी’ ठरली. आता या उपचार पद्धतीमुळे रक्ताचा आजार असलेल्या रुग्णांना मुंबई, हैदराबादला जाण्याची गरज नाही.

टॅग्स :Healthआरोग्य