शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
6
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
7
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
8
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
9
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
10
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
12
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
13
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
14
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
15
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
17
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
18
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
19
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
20
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका

सिकलसेलवर पहिले ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट’; ७ वर्षाच्या मुलाला मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2023 21:43 IST

Nagpur News ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट फॉर हिमोग्लोबिनोपॅथी’ हा उपचार करून एका ७ वर्षीय मुलाचे सिकलसेल समूळ नष्ट केले. मध्य भारतात पहिल्यांदाच ही उपचार पद्धती वापरल्याचा दावा नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने केला आहे.

 

नागपूर : सिकलसेल म्हणजे, रक्तातील लाल पेशींचा रोग. या आजारावर अद्याप कोणतेही प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. मात्र, ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट फॉर हिमोग्लोबिनोपॅथी’ हा उपचार करून एका ७ वर्षीय मुलाचे सिकलसेल समूळ नष्ट केले. मध्य भारतात पहिल्यांदाच ही उपचार पद्धती वापरल्याचा दावा नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने केला आहे.

सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार. यात रुग्णाच्या शरीरातील रक्त पेशी गोल आकाराऐवजी विळ्याच्या आकारासारख्या होतात. जिवंतपणीच मरणयातना देणारा आजार म्हणूनही ओळखले जाते. छत्तीसगड येथील एका ७ वर्षीय मुलाला गंभीर प्रकारातील सिकलसेल होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याला ‘ब्रेन स्टोक’ आला. यामुळे प्रकृती खालावली. पालकांनी त्याला नागपूरच्या ‘न्यू इरा मदर ॲण्ड चाइल्ड हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. येथील वरिष्ठ सल्लागार व लहान मुलांचा हेमेटोलॉजी-ऑन्कोलॉजी ॲण्ड ‘बीएमटी’चे प्रमुख डॉ. आतिश बकाने यांनी तपासले. मुलाचा जीव वाचविण्यासाठी ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट फॉर हिमोग्लोबिनोपॅथी’ करण्याचा सल्ला दिला. त्यांच्याकडून परवानगी येताच या नव्या उपचार पद्धतीचा वापर करून रुग्णाला नवे आयुष्य दिले.

- मोठ्या बहिणीचे ‘स्टेम सेल’ जुळले

डॉ. बकाने यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या उपचारात रुग्णाशी जुळणारा स्टेमसेल दाता शोधणे व मोठा खर्च हे दोन मोठे आव्हान होते. सुदैवाने खर्चासाठी ‘सीएसआर’ निधी मिळाला. सोबतच रुग्णाच्या मोठ्या बहिणीचे स्टेम सेल जुळले. रुग्णावर ‘ॲलोजेनिक बोनमॅरो ट्रान्सप्लांट’ करण्यात आले. ही एक मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. परंतु हृदय शल्यचिकित्सक डॉ आनंद संचेती, हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद भुतडा यांच्या मार्गदर्शनात तज्ज्ञ डॉक्टरांसह प्रशिक्षण आणि कौशल्यप्राप्त चमूमुळे रुग्णाला नवे आयुष्य मिळाले. ३० दिवसांनंतर म्हणजे, आज सोमवारी रुग्णाला सुटी देण्यात आली.

-हिमोग्लोबीनच्या विविध आजारात आशेचे किरण

डॉ. बकाने म्हणाले, याआधी नागपुरात अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा कर्करोगाच्या रुग्णावर ‘ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट’ झाले. ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट फॉर हिमोग्लोबिनोपॅथी’ या उपचार पद्धतीमध्ये सुसंगत दात्याकडून निरोगी ‘हेमॅटोपोएटिक स्टेम सेल’चा वापर झाला. यामुळे ही नागपुरातीलच नव्हे तर मध्य भारतातील पहिली पहिली यशस्वी ‘ॲलोजेनिक बीएमटी’ ठरली. आता या उपचार पद्धतीमुळे रक्ताचा आजार असलेल्या रुग्णांना मुंबई, हैदराबादला जाण्याची गरज नाही.

टॅग्स :Healthआरोग्य