शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सिकलसेलवर पहिले ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट’; ७ वर्षाच्या मुलाला मिळाले जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2023 21:43 IST

Nagpur News ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट फॉर हिमोग्लोबिनोपॅथी’ हा उपचार करून एका ७ वर्षीय मुलाचे सिकलसेल समूळ नष्ट केले. मध्य भारतात पहिल्यांदाच ही उपचार पद्धती वापरल्याचा दावा नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने केला आहे.

 

नागपूर : सिकलसेल म्हणजे, रक्तातील लाल पेशींचा रोग. या आजारावर अद्याप कोणतेही प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. मात्र, ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट फॉर हिमोग्लोबिनोपॅथी’ हा उपचार करून एका ७ वर्षीय मुलाचे सिकलसेल समूळ नष्ट केले. मध्य भारतात पहिल्यांदाच ही उपचार पद्धती वापरल्याचा दावा नागपुरातील एका खासगी हॉस्पिटलने केला आहे.

सिकलसेल हा एक आनुवंशिक आजार. यात रुग्णाच्या शरीरातील रक्त पेशी गोल आकाराऐवजी विळ्याच्या आकारासारख्या होतात. जिवंतपणीच मरणयातना देणारा आजार म्हणूनही ओळखले जाते. छत्तीसगड येथील एका ७ वर्षीय मुलाला गंभीर प्रकारातील सिकलसेल होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याला ‘ब्रेन स्टोक’ आला. यामुळे प्रकृती खालावली. पालकांनी त्याला नागपूरच्या ‘न्यू इरा मदर ॲण्ड चाइल्ड हॉस्पिटल’मध्ये दाखल केले. येथील वरिष्ठ सल्लागार व लहान मुलांचा हेमेटोलॉजी-ऑन्कोलॉजी ॲण्ड ‘बीएमटी’चे प्रमुख डॉ. आतिश बकाने यांनी तपासले. मुलाचा जीव वाचविण्यासाठी ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट फॉर हिमोग्लोबिनोपॅथी’ करण्याचा सल्ला दिला. त्यांच्याकडून परवानगी येताच या नव्या उपचार पद्धतीचा वापर करून रुग्णाला नवे आयुष्य दिले.

- मोठ्या बहिणीचे ‘स्टेम सेल’ जुळले

डॉ. बकाने यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या उपचारात रुग्णाशी जुळणारा स्टेमसेल दाता शोधणे व मोठा खर्च हे दोन मोठे आव्हान होते. सुदैवाने खर्चासाठी ‘सीएसआर’ निधी मिळाला. सोबतच रुग्णाच्या मोठ्या बहिणीचे स्टेम सेल जुळले. रुग्णावर ‘ॲलोजेनिक बोनमॅरो ट्रान्सप्लांट’ करण्यात आले. ही एक मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. परंतु हृदय शल्यचिकित्सक डॉ आनंद संचेती, हॉस्पिटलचे संचालक डॉ. आनंद भुतडा यांच्या मार्गदर्शनात तज्ज्ञ डॉक्टरांसह प्रशिक्षण आणि कौशल्यप्राप्त चमूमुळे रुग्णाला नवे आयुष्य मिळाले. ३० दिवसांनंतर म्हणजे, आज सोमवारी रुग्णाला सुटी देण्यात आली.

-हिमोग्लोबीनच्या विविध आजारात आशेचे किरण

डॉ. बकाने म्हणाले, याआधी नागपुरात अनेक हॉस्पिटलमध्ये रक्ताचा कर्करोगाच्या रुग्णावर ‘ऑटोलॉगस ट्रान्सप्लांट’ झाले. ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट फॉर हिमोग्लोबिनोपॅथी’ या उपचार पद्धतीमध्ये सुसंगत दात्याकडून निरोगी ‘हेमॅटोपोएटिक स्टेम सेल’चा वापर झाला. यामुळे ही नागपुरातीलच नव्हे तर मध्य भारतातील पहिली पहिली यशस्वी ‘ॲलोजेनिक बीएमटी’ ठरली. आता या उपचार पद्धतीमुळे रक्ताचा आजार असलेल्या रुग्णांना मुंबई, हैदराबादला जाण्याची गरज नाही.

टॅग्स :Healthआरोग्य