शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपुरातील फायरिंग पुर्वनियोजितच, कॅफेसमोर आरोपींनी अगोदर केली ‘रेकी’

By योगेश पांडे | Updated: April 16, 2025 22:03 IST

हिरणवार टोळीचे सदस्य फरारच : पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह

नागपूर : धरमपेठ येथील सोशा कॅफेचा मालक अविनाश भुसारी याची गोळीबारात हत्या झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात हिरणवार टोळीचा हात असल्याची बाब समोर आली आहे. आरोपींनी अविनाशची हत्या करण्याअगोदर कॅफेची सविस्तर रेकी केली होती. आरोपी अगोदर बराच वेळ कॅफेजवळ घुटमळले व फोनवरून सूचना मिळाल्यावरच आरोपींनी अविनाशवर जवळ जाऊन गोळ्या झाडल्या. आरोपींनी सोशा कॅफेतच अविनाशचा गेम करण्याची योजना बनविली होती. मात्र तो कॅफेबाहेर असल्याने रस्त्यावरच त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील हिरणवार टोळीतील आरोपी फरारच असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवर या घटनेतून सवाल उपस्थित होत आहेत.

धरमपेठमध्ये रामनगर चौक आणि लक्ष्मी भवन चौकाच्या दरम्यान अविनाशचा सोशा कॅफे आहे. मध्यरात्री १२.५० वाजता वाजता कॅफे बंद केल्यानंतर, अविनाश एका खासगी बँकेसमोर आईस गोला खाण्यासाठी सुरक्षारक्षकाला घेऊन गेला. तेथे निंबस कॅफेच्या व्यवस्थापकासोबत आईस डिश खाऊ लागला व सुरक्षारक्षकाला परत पाठविले. सुरक्षारक्षक कॅफेखाली पोहोचला असताना एक आरोपी तेथे आला व कॅफेबाबत विचारणा करू लागला. मात्र कॅफे बंद झाल्याचे सांगितल्यावरदेखील तो आरोपी तेथेच उभा होता. रात्री सव्वा वाजताच्या सुमारास आणखी दोन आरोपी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर आले व ते कॅफेच्या दुसऱ्या बाजूच्या मार्गावर जाऊन थांबले. मागे बसलेल्या आरोपीने पिस्तुल काढली व कुणाला तरी फोन लावला. हे सुरक्षारक्षकाने पाहिले होते. मात्र काही वेळातच मोटारसायकल निम्बस कॅफेकडे गेली. त्याच्या काही सेकंदअगोदर एक पांढरी मोपेडदेखील तिकडेच गेली. दोनही दुचाकींवरील मागे बसलेल्या आरोपींनी अविनाश यांच्यावर जवळून सहा गोळ्या झाडल्या. आरोपींना अविनाशच्या कॅफेतून जाण्याचा, तेथून आईस गोला खाण्याच्या वेळेची पूर्ण माहिती होती. आरोपींनी तो फोन नेमका कुणाला केला होता यातून आणखी नवीन लिंक समोर येण्याची शक्यता आहे.

पोलिसांची शोधमोहीम सुरू

शैलेश ऊर्फ बंटी विनोद हिरणवार, ऋतिक धीरज हिरणवार, शशिकांत ऊर्फ सोनू ऊर्फ जंगली दिलीप शेंद्रे, सिद्धांत भारद्वाज, सिद्धांत भारद्वाज, मोनू ऊर्फ मोन्या कालसर्पे, शक्ति राजेश यादव, बाबू हिरणवार, सिद्धू नावाचा युवक आणि इतर तीन ते चार जणांनी नियोजनबद्ध पद्धतीने अविनाशची हत्या केली. शेंद्रे आणि सिद्धांत भारद्वाज याला अटक करण्यात आली होती. मात्र इतर आरोपी फरारच आहेत.

पोलिसांची हलगर्जी भोवली

जानेवारी महिन्यात बंटीचा भाऊ पवन हिरणवार हा बाभूळखेडा सावनेर येथील बेलोरा हनुमान मंदिरातून परतत असताना शेखू टोळीने त्याची गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणात सावनेर पोलिसांनी शेखू आणि अविनाशच्या चुलत भावाला अटक केली होती. तडीपार असतानादेखील हिरणवार टोळीतील सदस्य शहरात सक्रिय होते. पोलिसांचा त्यांच्यावर वॉच नव्हता का हा मोठा प्रश्न यातून उपस्थित होत आहे.

टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस