शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

शाळेत मंदिर शोधा ‘राम’ मिळेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 11:27 AM

सोन्याचा मुकुट चढवून टेकडी गणेशाचा जीर्णोद्धार केला जात आहे. महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत ?

जितेंद्र ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसोन्याचा मुकुट चढवून टेकडी गणेशाचा जीर्णोद्धार केला जात आहे. महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत ?हायकोर्टाच्या आदेशानंतर नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळावर महापालिकेच्या वतीने बुलडोजर चालविला जात आहे. मात्र मंदिर तोडणे हा हिंदू धर्मावर आघात असल्याचे कारण देत भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेविरुद्ध बजरंग दलाचे ‘हनुमान’ मैदानात उतरले आहेत!गोरगरीब विद्यार्थ्यांचे मंदिर आणि श्रद्धास्थान असलेल्या महापालिकेच्या ३५ शाळा बंद पडल्या तरी याविरुद्ध ना बजरंग दलाने लोकआंदोलन उभे केले ना मराठीचा लळा असलेल्या शिवसेना आणि मनसेने! मराठी शाळा वाचविण्यासाठी नागपुरात कृती समितीची उभारणी झाली. या समितीत बोटावर मोजण्याइतक्याच लोकांचा सहभाग आहे. त्यामुळे बंद पडलेल्या मराठी शाळांचा जीर्णोद्धार करण्यासाठी महापालिकेकडून करण्यात येत असलेली कृतीही तितकीच ‘शून्य’ आहे.देशात, राज्यात आणि नागपुरात सत्ता असलेल्या भाजपचा डिजिटलायझेशनवर भर आहे. ‘स्टार्ट अप इंडिया’च्या माध्यमातून सरकारने विकासाचा मंत्र दिला आहे. मात्र १५ वर्षांची सत्ता उपभोगूनही भाजपला बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळा ‘स्टॅण्ड अप’ का करता आल्या नाही ? याबाबत मन की बात करण्यासाठी भाजपचा एकही नेता पुढे येत नाही. चार वर्षांत ४,१६१ विद्यार्थी कमी होणे. त्यामुळे ३५ शाळा बंद पडणे ही बाब ‘इनोव्हेटिव्ह सिटी’चा नंबर १ पुरस्कार पटकाविणाऱ्या नागपूरसाठी निश्चितच लाजिरवाणी आहे. त्यामुळे महापालिका आणि सरकार सीबीएसई शाळामालकांच्या समर्थनात तर नाही ना, असा कुणी आरोप केल्यास तो चुकीचा ठरेल का? बंद पडलेल्या मनपा शाळांच्या जीर्णोद्धारासाठी भाजपचे शिक्षक आमदार नागो गाणार, ज्येष्ठ गोंधीवादी विचारवंत लीलाताई चितळे कृती समितीच्या आंदोलनात दिसल्या. मात्र या आंदोलनाला लोकांचा फारसा पाठिंबा मिळाला नसल्याने सत्ताधाऱ्यांनी आणि सीबीएसईवाल्यांनी यात ‘आनंद’ मानला. पालिकेप्रमाणे जि.प. शाळांची हीच अवस्था आहे. राज्यात आजही काही अशा सरकारी शाळा आहेत, त्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे ‘कुलदैवत’ आहेत. यात पंढरपूरच्या पांढरेवस्ती येथील जि.प.शाळेचा नंबर लागतो. ही शाळा ३६५ दिवस सुरू असते. रविवारची सुटी नसते. औरंगाबादच्या सांजखेडा येथील जि.प. शाळाही त्यातलीच एक आहे.सीबीएसई शाळेच्या विद्यार्थ्याला लाजवेल त्यापेक्षाही चांगले इंग्रजी या शाळेचे विद्यार्थी बोलतात. पंढरपूर, औरंगाबाद आणि भंडारा जिल्ह्यातील खराशीच्या जि.प. शाळात हे शक्य आहे तर ‘इनोव्हेटिव्ह’ आणि स्मार्ट नागपुुरात हे का होत नाही ?शाळेच्या विकासासाठी निधी कमी पडत असल्यास नागपुरात दानदात्यांचीही कमतरता नाही. गिरीश गांधींसारख्या सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेतल्यास तासाभरात हे होऊ शकते. शिर्डीच्या साई संस्थानने एका झटक्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील मेडिकल कॉलेजच्या विकासासाठी ७१ कोटींचे दान दिले. कोट्यवधीच्या दानाच्या बळावर नागपुरातही टेकडीच्या गणेशाला सोन्याचा मुकुट चढवून जीर्णोद्धार केला जात आहे. लोकसभा तोंडावर आल्याने यूपीत योगी आदित्यनाथांनी ‘राम’जप सुरू केला आहे. मात्र महापालिकेच्या शाळांना मंदिर समजून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मनात ‘राम’ असण्याची गरज आहे. यासाठी बजरंग दलाचे ‘हनुमान’ रान का पेटवत नाहीत?

टॅग्स :Schoolशाळा